Home Blog Page 331

राहुल गांधींचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद, न्यायाच्या लढाईत पाठीशी असल्याचे दिले आश्वासन..

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करा, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तात्काळ अटक करा: हर्षवर्धन सपकाळ

डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीआधीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याडून नाईक निंबाळकरांना क्लिन चिट.

पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार, सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी गप्प का?

मुंबई/बीड, दि. २९ ऑक्टोबर.

बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे जाऊन फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे आदी उपस्थित होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी पीडित मुलीची आई व मुंडे कुटुंबातील लोकांशी फोनवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव आणेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राहुल गांधी यांनी संपाच्या कुटुंबियांकडून व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहितीही घेतली.

याभेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चुकीचे कामे करण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता, त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. नाईक निंबाळकर यांच्या गुंडगिरीच्या अनेक घटना प्रकाशात आल्या आहेत. या घटनेतील कळस म्हणजे चौकशी करण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहिर क्लिन चिट देऊन टाकली हे संताप आणणारे आहे. या प्रकरणाची चौकशी फलटण बाहेर करावी, उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी असून काँग्रेस पक्ष मात्र गप्प बसणार नसून डॉ. संपदा मुंडेला न्याय मिळवूण देण्यासाठी रस्त्यावर उतरेल. दिल्लीत कालच युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. महिला काँग्रेसही याप्रकरणी राज्यभर आंदोलन करेल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, या प्रकरणी महिला आयोगाची भूमिकाही संताप आणणारी असून पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी होती पण त्यांनी आधी पोलीसांची भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महिला आयोगाने महिलांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन काम करणे गरजेचे आहे पण त्यांनी तसे न करता पोलिसांची वकिली केली. डॉ. संपदा मुंडे ज्या समाजाची आहे त्या समाजातील एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. बीड जिल्ह्यात मध्यंतरी काही घटना झाल्या त्यावेळी येथील सत्ताधारी पक्षाचे एक आमदार दररोज प्रसार माध्यमासमोर येऊन भूमिका मांडत होते, आज ते गप्प आहेत. पंकजा मुंडे गप्प आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा दबाव झुगारून बोलले पाहिजे. मुंबईतील एक सामाजिक कार्यकर्त्या अनेक विषयावर आक्रमक भूमिका घेत असतात त्यांनीही या विषयावर मौन बाळगलेले आहे. नारायण गड व भगवान गडाला आमचे साकडं आहे की त्यांनी या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पुढे यावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

वेदनेतून निर्माण झालेली ‘प्रक्षोभ’ कलाकृती मराठी साहित्यातील वैभव : डॉ. श्रीपाल सबनीस

डॉ. प्रकाश जाधव लिखित ‘प्रक्षोभ’ कादंबरीचे प्रकाशन

पुणे : गावकुसाच्या आतील आणि गावकुसाबाहेरील अनेक व्यक्तिरेखा डॉ. प्रकाश जाधव यांनी मनोविश्लेषणात्मक पद्धतीने ‘प्रक्षोभ’ या कादंबरीत मांडलेल्या आहेत. बुद्धिवादी संवेदनशील मनाचा प्रकाश या कादंबरीतून दिसतो आहे. वेदनेतून निर्माण झालेली ही कलाकृती मराठी साहित्यातील वैभव आहे,असे गौरवोद्‌गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. वेदनेच्या जंजाळात अडकलेल्या या नायकाने कांदबरीच्या माध्यमातून आयुष्याचे सोने करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. प्रकाश जाधव लिखित ‘प्रक्षोभ’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. २८) ज्येष्ठ लेखिका इंदूमती जोंधळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्षपदावरून बोलत होते. ज्येष्ठ लेखक भीमराव पाटोळे, सुप्रसिद्ध लेखक देवा झिंजाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, सकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगीर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ प्रकाशनतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

लेखकाने अनेक पात्रांची वास्तव भाषेत केलेली मांडणी भावते, असे सांगून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, मनोविश्लेषणात्मक केलेले लिखाण हा या कादंबरीचा आत्मा आहे.

भीमराव पाटोळे म्हणाले, जगण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या समाजासाठी ही कादंबरी मार्गदर्शक ठरणारी आहे. शालेय वयात मराठी बोलता, लिहिता न येणाऱ्या व्यक्तीला कादंबरी लिहिता येणे ही एक प्रकारे दैवी शक्ती आहे.

जगणे, भोगणे आणि लिहिणे यातील अंतर खूप कमी असलेला डॉ. प्रकाश जाधव हा माणूस आहे. लिखाणातून त्यांच्या मनाची अस्वस्थता दिसून येते. घरातूनच त्यांच्या शिक्षणाला विरोध झाला नसता तर ते लिहिते झाले नसते. आयुष्यात भोगलेल्या हालअपेष्टा लिखाणातून रिते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आयुष्यात जे घडले ते त्यांनी प्रांजळपणे मांडले आहे.

इंदूमती जोंधळे म्हणाल्या, समाजाचे देणे लागतो या भावनेने डॉ. प्रकाश जाधव यांनी स्वत:च्या शिक्षणासाठी पैसा नसतानाही २५ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली यासाठी मोठे औदार्य लागते. हलाखीची परिस्थिती असतानाही शिक्षणाद्वारे ते स्वत: प्रकाशनमान झाले त्याचप्रमाणे इतरांच्या आयुष्यातही त्यांनी प्रकाश दिला.

लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रकाश जाधव म्हणाले, शिक्षण, लिखाणामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला. मराठी भाषेची जबाबदारी केवळ अभिजनांनीच घेतलेली नाहीये तर आम्ही सुद्धा घेतली आहे, हे मुद्दाम सांगावेसे वाटते.   

शिरीष चिटणीस यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर स्वागत आशुतोष रामगीर, रश्मी जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा जोग यांनी केले. आभार डॉ. संदीप सांगळे यांनी मानले.

स्टार हेल्थची 21% वार्षिक नफ्याच्या वाढीच्या दराने 518 कोटी रु. नफ्याची नोंद

·         IFRS अंतर्गत आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये COR मध्ये 170 bps ने सुधारणा

• ताज्या रिटेल प्रीमियममध्ये 24% वाढ

• खर्चाच्या गुणोत्तरात (Expense Ratio) 31.1% वरून 29.7% वर सुधारणा (IFRS)

चेन्नई,: भारतातील सर्वात मोठी स्वतंत्र रिटेल आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) ने 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहामाहीसाठी (H1FY26 आर्थिक वर्ष 26 ची पहिली सहामाही) आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने 518 कोटी रु. चा करपश्चात नफा (PAT) नोंदवला असून IFRS अंतर्गत 21% वार्षिक वाढ आहे. ही वाढ नुकसान गुणोत्तराचे (Loss Ratio) चांगले प्रमाण आणि सुधारित कार्यक्षमतेमुळे झाली आहे.

कंपनीने दुसऱ्या तिमाही मध्येही आपली मजबूत गती कायम ठेवली असून आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 12% वार्षिक वाढ दर्शवत ग्रॉस रिटन प्रीमियम (GWP) 8,809 कोटी रु. वर (N आधारावर) पोहोचला आहे. रिटेल GWP 17% ने वाढून 8,332 कोटी रु. वर (N आधारावर) पोहोचला आहे. त्याला फ्रेश रिटेल प्रीमियममध्ये 24% वाढ आणि रिटेल हेल्थमध्ये 98% नूतनीकरण टिकाऊपणा (renewal persistency) यामुळे चालना मिळाली आहे. 32% बाजारपेठीय हिस्स्यासह कंपनी भारतातील रिटेल हेल्थ विमा क्षेत्रात अग्रणी राहिली आहे.

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आम्ही स्थिर आणि अर्थपूर्ण प्रगती केली असून IFRS प्रमाणे PAT मध्ये 21% वाढ झाली आहे. 8.3% या भक्कम गुंतवणूक परताव्याबरोबरच सुधारित लॉस रेशो आणि खर्चातील घट यामुळे नफ्यात वाढ साध्य झाली आहे.”

ग्राहकांचा अनुभव हा स्टार हेल्थच्या धोरणाचा पाया राहिला आहे. आमच्या दाव्यांवरील NPS 52 वरून 61 वर सुधारला असून, कंपनीचा एकूण NPS 59 वरून 61 वर वाढला आहे. हे निकाल आमच्या सातत्यपूर्ण कार्यप्रदर्शनाचे आणि रिटेल-केंद्रित मॉडेलच्या मजबूतीचे द्योतक आहेत.

“रिटेल हेल्थ इन्शुरन्सवर GST सूट मिळाल्याने आम्ही जोरदार सकारात्मक प्रवाह पाहत आहोत. सुरुवातीच्या प्रवाहावरून मागणीत वाढ स्पष्ट दिसत असून त्याचे प्रतिबिंब मजबूत लीड जनरेशन, नवीन पॉलिसी जारी करणे आणि ऑक्टोबरमधील GWP वाढीत दिसून येते. हे वाढत्या परवडणाऱ्या आरोग्य विम्याचे सूचक आहे.”

कंपनीचे पोर्टफोलिओ पुनर्संतुलनाचे (portfolio recalibration) परिणाम दिसून येत आहेत. नेट इन्कर्ड क्लेम्स रेशो आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 70.6% वर राहिला. तो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 30 bps ने कमी आहे. मजबूत रिटेल मिश्रण आणि अधिक नफा देणाऱ्या समूह विभागामुळे हे शक्य झाले आहे. कंपनीचे प्रमुख उत्पादन सुपर स्टार ने आपल्या पहिल्याच वर्षात 1,250 कोटी रु. च्या प्रीमियमचा टप्पा ओलांडला असून हे ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद आणि उत्पादनाच्या ताकदीचे प्रतीक आहे. कंपनी आता जसे पूर्वी जाहीर केले होते तसे वार्षिक रीप्राइसिंग धोरण अवलंबेल.

खर्चाचे गुणोत्तर (Expense Ratio) आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 29.7% वर सुधारला आहे (गेल्या वर्षी ते 31.1% होते). मनुष्यबळ उत्पादकता, प्रक्रिया कार्यक्षमता आणि शिस्तबद्ध खर्च व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले आहे. कंबाइंड रेशो (IFRS आधारावर) गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 102.1% वरून 100.3% पर्यंत सुधारला आहे, तर सॉल्व्हेन्सी रेशो नियामक आवश्यकतेपेक्षा खूपच जास्त 2.15x वर मजबूत राहिला आहे.

आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये खर्चाचे गुणोत्तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाही मधील 31.1% वरून 29.3% वर सुधारले आहे. लॉस रेशो आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाही मधील 73.7% वरून आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये 71.8% झाला आहे. कंबाइंड रेशो (IFRS आधारावर) मागील वर्षीच्या याच कालावधीतील104.8% वरून या वर्षी 101% झाला आहे.

कंपनीने आपल्या तंत्रज्ञान-आधारित ग्राहक अनुभव उपक्रमांना पुढे नेले असून, जलद आणि अखंड क्लेम सेटलमेंटसाठी AI-प्रणीत क्लेम प्लॅटफॉर्म लागू केला आहे. स्टार हेल्थ अॅपने आता 12 दशलक्ष डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे.

स्टार हेल्थ शिस्तबद्ध अंडररायटिंग, प्रगत डिजिटल आणि फसवणूक विश्लेषण (fraud analytics), तसेच रुग्णालये आणि वितरकांसोबत सखोल भागीदारी यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी जबाबदार वाढ आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पनांचा संगम साधत भारताच्या 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगतपणे आपले नेतृत्व कायम राखण्याच्या स्थितीत आहे.

लोकमान्यनगर पुनर्विकासावरील स्थगिती उठविण्यासाठी धंगेकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पुणे- येथील बहुचर्चित आणि दुमजली – तिमजली इमारतींच्या लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रकल्प पूर्ण झाला तर १० मजली इमारती होतील आणि रहिवाश्यांच्या संखेत , वाहनांच्या संख्येत दुपटी तिपटीने वाढ होईल आणि रस्त्यांची रुंदी मात्र वाढणार नाही अशा अवस्थेत होऊ पाहणाऱ्या सर्वच पुनर्विकासाच्या प्रकल्पांचा सारासार विचार व्हावा असा वाहतूक कोंडीतून ,प्रदूषणातून शहर वाचवा म्हणणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील काही लोकांचा सूर असताना आता हा पुनर्विकास प्रकल्प होऊ द्यात त्याला आडकाठी आणू नका अशी भूमिका घेत रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देऊन लोकमान्यनगर पुनर्विकासावरील स्थगिती उठवावी अशी मागणी गेल्या एक महिन्यापूर्वीच केली आहे .

धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’लोकमान्य नगर पुणे येथील म्हाडा वसाहत सन १९६१ ते ६२ च्या दरम्यान म्हणजे साधारणपणे ६० वर्षांपूर्वी पानशेत धरणाच्या पुरानंतर स्थापन करण्यात आली. या बसाहतीमध्ये सर्वसाधारण मध्यमवर्गीय नागरिक राहत असून सद्यस्थितीत सदर नागरिक हे अत्यंत दुरावस्था झालेल्या इमारतीमध्ये राहत आहेत. या ठिकाणी ५३ इमारती असून सर्व इमारतीमधील नागरिकांनी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आहेत. यातील काही गृहनिर्माण सहकारी संस्थांचा पुनविकास अंतिम टप्प्यात आला आहे.
येथील इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून मूलभूत सोयी सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाहीत. येवोल इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर झाल्यास नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे. परंतु काही घटक एकात्मिक विकासाच्या नावाखाली या ठिकाणची जागा आणि पुनर्विकासात मिळणारा लाभ विचारात घेऊन येथील रहिवाशांनी सुरू केलेले पुनर्विकासाचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटकांनी शासनाची दिशाभूल करून एकात्म विकासाचा कुठलाही आराखडा नसताना देखील पुनर्विकासाला खीळ घातली आहे. शासनाने स्वानिक रहिवाशांची भावना विचारात घेऊन पुनर्विकासाला दिलेले स्थगिती तातडीने उठवावी व स्थानिक रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मी आपणाकडे या पत्राद्वारे विनंती करीत आहे.


जैन बोर्डिंग व्यवहार : धर्मादाय आयुक्त हे लबाडीतले साक्षीदार आणि भागीदार- रवींद्र धंगेकर यांचा थेट आरोप

बुलढाणा बँकेच्या देशपांडेंच्या कारभारालाही हि धंगेकर देणार आव्हान …

लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या प्रकल्प जर बिल्डर आणि रहिवासी नियम पाळून करत आहेत तर इतरांनी त्यात पडण्याचे कारण काय ?

पुणे- जैन बोर्डिंग व्यवहाराचा विषय आमचे नेते शिंदेसाहेब आणि सामंत साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे संपण्याच्या मार्गावर आहे याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे मात्र या व्यवहारात कोणी नियमबाह्य , बेकायदेशीर काय केले याची चौकशी होणे गरजेचे आहे यात बिल्डर ,ट्रस्टी जरी माघारी घेत असतील तरी धर्मदाय आयुक्तांपासून बुलढाणा बँकेच्या देशपांडे नामक अधिकाऱ्यापर्यंत कोणी काय भूमिका कशा पद्धतीने आचरणात आणली याचा तपास झाला तर अनेकांना जेल्वारी घडेल असे धंगेकर म्हणाले आहेत . रुपेश मारणे याच्या अटकेची धंगेकर यांनी थट्टा उडविली पण म्हटले , आता मला तोंड शिवून घ्यावे लागणार आहे . सत्य सत्य बोलत राहणे आता ऐकायला थकवा येईल एवढे सत्य बाहेर येऊ शकते . पण पोलीस आयुक्त मात्र चांगले काम करताहेत त्यामुळे यावर मी काही बोलणार नाही . पूर्वी म्हणालो तसे मी आता लोकमान्य नगरच्या पुनर्विकास प्रक्लापाचा मुद्दाही हातही घेणार आहे, जर बिल्डर आणि रहिवासी म्हाडाच्या नियमानुसार पुनर्विकास करून घेत आहेत तर त्यात मध्ये अन्य कोणी पडायचे कशासाठी ? हा प्रश्न आहे.

धंगेकर पुढे म्हणाले,’ मी शिंदे साहेबांशी बोललो आणि साहेबांनी जैन धर्मियांना व मला त्यांनी शब्द दिला होता की मी दोन दिवसात विषय संपेल. तो त्याप्रमाणे आता संपल्यात जमा आहे. कारण शेवटी जनतेचा एवढा प्रचंड रेटा होता आणि त्या रेट्यामुळे जैन समाज देशा मध्येच नाही तर जगा मधल्या जैन समाजाच्यामध्ये त्यांच्या मना मध्ये या प्रकाराने काहूर निर्माण केलं त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. आणि या भावना सगळ्यांच्या लक्षात आल्या आणि आता दोन्ही पार्ट्या एका मुद्द्यावर माघारी आल्याच. पण यांच्यामध्ये जो गतिमान व्यवहार झाला, तो संशयास्पद आहे. खरेदीसाठीचे हे पैसे कुठले? कर्ज कुठल्या बँकेने दिलेत? मग या खरेदी मध्ये धर्मदाय आयुक्तांचा काय रोल का होता? प्रशासनाचा रोल काय होता? रजिस्ट्रार ऑफिसचा रोल , तहसिलदार चा रोल काय आहे? हे सगळे रोल बघता गतिमान जो व्यवहार झाला ह्याच्या मग प्रचंड पैसा पेरला गेला. म्हणजे हे काम काही बिगर पैशाचे होत नाही. आणि हा पब्लिक ट्रस्ट आहे,हा काही खाजगी ट्रस्ट नाही. त्यामुळे पब्लिक ट्रस्टवर संपूर्ण पूर्ण पणे वर्चस्व हे सरकारचं असतं. त्यामुळे ज्या पद्धतीने या ट्रस्टी ,बिल्डर, अधिकारी यांनी काही फायदा घेतलाय का? या आवारात काही तरी त्रुटी आहेत का? हे पाहिले पाहिजे म्हणून हे पहिले संचालक मंडळ बरखास्त केले पाहिजे आणि प्रशासक नेमला पाहिजे आणि प्रशासकाच्या मार्फत व समाजातील जे मान्यवर योग्य आहेत त्यांच्यामार्फत चौकशी करावी तर बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषी आहेच पण ह्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्त देखील दोषी, ह्यांच्या मध्ये रजिस्ट्रार दोषी आहेत आणि ह्या बँकेत पैसा आला कुठून? हाही प्रश्न आहेच आणि ह्या बँकेला एवढी पावर येते का एवढे पैसे द्यायची ? कि त्यांचे लागेबांधे ह्या प्रकल्पामध्ये आहेत का ? ह्या बँकेत पैसा कुठून आला? हे सारं तपासले पाहिजे .
जैन समाज दानशूर आहे. तो याच्यापेक्षा दहापट पैसे उभे करू शकतो. कारण तो समाजाला कायम देत आलाय. हे पैसे परत द्या हा व्यवहार संपवा असे म्हणून कसे चालेल . एकदा जर पोलीस केस केली तर शेवटी शासन प्रशासनाला व सरकारला फसवण्याचा उद्योग बाहेर येईलच ना ? हा काही सोपा विषय नाहीये. एकदा पोलीस केस गेले तर जेलची वारी होईल त्यांना हे लक्षात घ्या .
धर्मदाय आयुक्तांनी तर मला एक भारतीय नागरिक म्हणून बलावावे यावर बोलवल्यानंतर मी त्यांना मुद्दा सांगेन. ते तो फोडून काढू शकत नाही.
सगळी सुविधा त्यांच्याकडे जातो. धर्मादाय आयुक्त आता आपण शासन व्यवस्थेवर जास्त बोलणे योग्य नाही. पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढून का? आमचं तोंड उघडं करायला लावू नका. आता झालंय ते झालंय. पण जर त्यांनी जर अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे शोभत नाही त्यांना कारण ते ज्या संस्थेवर आहेत त्यांना कशाला द्यायचं? जर तुम्हाला न्यायसंस्थेवर नेमलं त्या चौकटीच्या बाहेर जाता येतं का? स्वतः धर्मदाय आयुक्त स्वतःला क्लीन चीट देऊ शकतात काय ?. मी जाहीर बोलतो. त्यांनी त्यासाठी माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करावा , काय? मला समज द्यावी. मी त्याला उत्तर देईन कारण ह्याच्या मध्ये न्यायसंस्था मध्ये काही लबाडी झाली. त्या लबाडी तले साक्षीदार भागिदार धर्मादाय आयुक्त आहेत
असिम सरोदे साहेब मला म्हणले कि आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एक वकील म्हणून मी आणि आमची सगळी ट्रीम. अनेक माझे वकील मित्र आहेत. सगळे म्हणले कि ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही जी बाजू मांडत आहे ती समाजाच्या हिताची म्हणजे शहराच्या हिताची. त्यामुळे तुम्ही पुणेकर म्हणून आम्ही तुम्हाला जी काही मदत करायची ती करायला तयार आहे. आणि शेवटी त्यांच्याशी मी बोलणार आहे. जे लोक माझ्या बरोबर येतील त्यांना घेऊन मी माझी बाजू मांडणार.
. त्यामुळे आता मला काही काळजी नाही. मी काही नवीन आलो नाही आणिया जनतेने मला एकदम प्रचंड प्रमाणामध्ये ताकद दिली. आशिर्वाद दिले आणि त्याच्या जोरावर जात आहे. यापुढे आपण सामाजिक जीवनामध्ये काम करताना काय काय कर्वे लागते लोकशाहीत चांगल्या माणसांना हि कधी कधी लोक शिव्या घालत असतात .
लोकमान्य नगरच्या पुनर्विकासावर बोलताना ते म्हणाले,’ पूर्वी आमचे बापट साहेब होते. आमच्या मुक्ता टिळक होत्या. आम्हीही होतो. आता आम्हाला समजत नाही असं का? आम्हाला माहिती होतं. पुनर्विकासाचा प्रयत्न काम जर रहिवासी आणि बिल्डर यांच्यात होतंय तर आपण त्यात मध्ये का पडावं ? त्यामेले काय झालं . आता शेवटी संशयाची पाल तुम्ही अंगावर घेतली. तुम्ही तो प्रकल्प वाढवला. म्हाडाचे नियम आत्ता जे आहेत त्या नियमानुसार त्यांनी तो प्रोजेक्ट चालू केला. त्याच्यामुळे त्यांनी नियम तोडून बांधकाम केले नाही हा महत्त्वाचा भाग आहे. मग तुमच्या मनात काय करायचे आहे ? १६ एकर जमिनी चे . हा बिल्डर एवढा आहे.तो बिल्डर तेवढा आहे. मग मी आणू शकतो बिल्डर . मी करू शकतो हे चाललय काय ?

भाजपच्या 36 वर्षीय महिला नेत्याला भाजयुमो प्रदेशाध्यक्षाकडून धमकी, पुण्यात 9 जणांवर गुन्हा

पुणे- भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला गेला आहे. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना चिंचवड येथे घडली आहे. या प्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह आठ जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३६ वर्षीय पीडित महिला ही भाजपमध्ये संघटनात्मक पदावर कार्यरत आहे. २६ ऑक्टोबर रोजी त्यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता तिपाले, एकविरा खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे आणि जयेश मोरे अशी आरोपींची नावे आहेत.२६ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास पीडित महिला ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या असता काही संशयितांनी त्यांना अडवले. ‘आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू इथे का आलीस? तुला जिवंत ठेवणार नाही. तुला गाडीखाली घालून संपवू. अनुप मोरेने तुला संपवायचे सांगितले आहे. तुला बदनाम करून जगणे अवघड करू,’ अशा धमक्या त्या टोळक्याने दिल्या, असे तक्रारदार महिलेच्या फिर्यादीत नमूद आहे.
या धमकीने घाबरलेली पीडित महिला परत बंगल्यात गेल्या असता, नंतर काही महिला आणि तरुणांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. नंतर त्या पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या असता, अनिता तिपाले आणि एकविरा खान यांनी पोलिस ठाण्याच्या परिसरातच त्यांच्याशी वाद घालून मारहाण आणि शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिला पोलिस ठाण्याबाहेर पडताच सुमारे शंभर जणांच्या गर्दीने पुन्हा ‘तुला ठार करू’ अशी धमकी दिली. दरम्यान, पीडित महिलेच्या जबाबात आठ जणांची नावे नमूद केली असताना सुरुवातीला अनुप मोरे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले होते. मात्र फिर्यादीने यावर आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी अनुप मोरे यांचा नाव आरोपींमध्ये समाविष्ट केल्याची माहिती मिळाली. या त्रुटीबाबत पोलिसांनी ‘नाव अनावधानाने राहून गेले’ असे स्पष्टीकरण दिले आहे. सध्या या प्रकरणामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (२९ आक्टोबर) यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या खालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
या वर्षी १८ आक्टोबर ते २७ आक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवुन या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.
एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून (₹२० कोटी ४७ लाख) त्यानंतर धुळे (₹१५कोटी ६० लाख) आणि नाशिक (₹१५ कोटी ४१ लाख ) विभागाचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या पेक्षा यंदा महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे.

सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी घरापासून दूर राहून अहोरात्र कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी अभिनंदन केले आहे.

उत्पन्नाचे अपेक्षित लक्ष गाठण्यास एसटीला अपयश

यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल व मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटी पेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १०४९ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. तथापि, ऐन दिवाळीच्या काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठण्यात महामंडळाला शक्य झाले नाही. पुणे, बीड, अहिल्या नगर अमरावती, बुलढाणा या विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते.
निर्धारित केलेल्या लक्षात पेक्षा अत्यंत कमी उत्पन्न आणणाऱ्या विभागांच्या कामगिरी बाबत मंत्री सरनाईक यांनी चिंता व्यक्त केली असून सातत्याने तोट्यात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत “आशा” चे विशेष स्क्रीनिंग

जागतिक कन्या दिनानिमित्त डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट “आशा” ची विशेष स्क्रीनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडलीमहिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली.

यावेळी निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या, “एखादी स्त्री जेव्हा घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तिला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतं — कधी घराबाहेरचा विरोध, तर कधी घराच्या आतलाच संघर्ष. तरीही ती थांबत नाही. प्रत्येक अडथळा ओलांडत, ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत पुढे जाते. ‘आशा’ चित्रपटातील नायिकाही अशीच आहे, आशा सेविका म्हणून काम करत असली, तरी ती हे फक्त नोकरी म्हणून करत नाही, तर तिच्यासाठी ते एक आवड आणि ध्यास आहे. म्हणूनच तिची कहाणी ही फक्त एका आशा सेविकेची राहत नाही, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी बनते… बाईपणाच्या संघर्षाची आणि सामर्थ्याची गोष्ट ठरते.”

“आशा” या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत.
आरोग्यसेविकांच्या सेवाभावावर आधारित हा चित्रपट महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि संघर्षाचा हृदयस्पर्शी प्रवास दाखवतो.

पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले, “सध्या मराठी सिनेमा नव्या वाटा शोधत आहे. विविध आणि आशयपूर्ण विषयांवर चित्रपट निर्माण होत आहेत, आणि प्रेक्षकही या नव्या प्रवाहाला मनापासून दाद देत आहेत. एका शिबिरादरम्यान आशा सेविकांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मनात विचार आला, अरे, या कामामागचं जग किती मोठं आणि महत्त्वाचं आहे! यावर तर नक्कीच एक चित्रपट व्हायला हवा.
ही खरं तर एका वेगळ्या जगाची गोष्ट आहे. आपल्या समाजातच राहणारा हा एक वर्ग पण ज्याच्या आयुष्याबद्दल, संघर्षाबद्दल आणि त्यागाबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं. ‘आशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. ‘आशा’ हा सिनेमा फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाही, तर घर सांभाळून, स्वतःची ओळख शोधणाऱ्या, प्रसंगी त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आणि तिच्या न थकणाऱ्या प्रवासाचा आहे. मराठी प्रेक्षकांनी नेहमीच नव्या विषयांना आणि प्रामाणिक कथांना उघड मनाने स्वीकारलं आहे. म्हणूनच, ही वेगळी, अनोखी आणि भावस्पर्शी कहाणीही त्यांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा विश्वास वाटतो.”

या सोहळ्यास डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार, शिवसेना) श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय राज्य मंत्री – आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि शायना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या, शिवसेना) उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान केला. ह्यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “
चित्रपट हे समाजप्रबोधनाचं एक प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे. समाजातील विविध प्रश्न, भावना आणि संघर्ष जर चित्रपटाच्या माध्यमातून मांडले गेले, तर त्यातून दिला जाणारा संदेश नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद सिनेमात आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आशा’ हा चित्रपट. दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माते निलेश कुवर आणि दैवता पाटील यांनी समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण आजवर दुर्लक्षित राहिलेला घटक आशा सेविका यांच्या जीवनावर हा चित्रपट साकारला आहे. आपल्या गावखेड्यात आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या या महिलांची कहाणी पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. या सुंदर उपक्रमाबद्दल आणि संवेदनशील प्रयत्नाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक.”

चित्रपटात मुख्य भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरू समवेत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते, आणि दिलीप घारे यांचा समावेश आहे. चित्रपटाचे लेखन अंतरिक्ष श्रीवास्तव आणि दीपक पाटील यांनी केले आहे तर दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील सुरेश सारंगम यांनी कॅमेराची धुरा सांभाळली आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट “आशा” ची विशेष स्क्रीनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडली

महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली.

यावेळी निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या, “एखादी स्त्री जेव्हा घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तिला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतं — कधी घराबाहेरचा विरोध, तर कधी घराच्या आतलाच संघर्ष. तरीही ती थांबत नाही. प्रत्येक अडथळा ओलांडत, ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत पुढे जाते. ‘आशा’ चित्रपटातील नायिकाही अशीच आहे, आशा सेविका म्हणून काम करत असली, तरी ती हे फक्त नोकरी म्हणून करत नाही, तर तिच्यासाठी ते एक आवड आणि ध्यास आहे. म्हणूनच तिची कहाणी ही फक्त एका आशा सेविकेची राहत नाही, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी बनते… बाईपणाच्या संघर्षाची आणि सामर्थ्याची गोष्ट ठरते.”

“आशा” या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत.
आरोग्यसेविकांच्या सेवाभावावर आधारित हा चित्रपट महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि संघर्षाचा हृदयस्पर्शी प्रवास दाखवतो.

पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले, “सध्या मराठी सिनेमा नव्या वाटा शोधत आहे. विविध आणि आशयपूर्ण विषयांवर चित्रपट निर्माण होत आहेत, आणि प्रेक्षकही या नव्या प्रवाहाला मनापासून दाद देत आहेत. एका शिबिरादरम्यान आशा सेविकांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मनात विचार आला, अरे, या कामामागचं जग किती मोठं आणि महत्त्वाचं आहे! यावर तर नक्कीच एक चित्रपट व्हायला हवा.
ही खरं तर एका वेगळ्या जगाची गोष्ट आहे. आपल्या समाजातच राहणारा हा एक वर्ग पण ज्याच्या आयुष्याबद्दल, संघर्षाबद्दल आणि त्यागाबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं. ‘आशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. ‘आशा’ हा सिनेमा फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाही, तर घर सांभाळून, स्वतःची ओळख शोधणाऱ्या, प्रसंगी त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आणि तिच्या न थकणाऱ्या प्रवासाचा आहे. मराठी प्रेक्षकांनी नेहमीच नव्या विषयांना आणि प्रामाणिक कथांना उघड मनाने स्वीकारलं आहे. म्हणूनच, ही वेगळी, अनोखी आणि भावस्पर्शी कहाणीही त्यांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा विश्वास वाटतो.”

या सोहळ्यास डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार, शिवसेना) श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय राज्य मंत्री – आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि शायना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या, शिवसेना) उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान केला. ह्यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “
चित्रपट हे समाजप्रबोधनाचं एक प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे. समाजातील विविध प्रश्न, भावना आणि संघर्ष जर चित्रपटाच्या माध्यमातून मांडले गेले, तर त्यातून दिला जाणारा संदेश नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद सिनेमात आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आशा’ हा चित्रपट. दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माते निलेश कुवर आणि दैवता पाटील यांनी समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण आजवर दुर्लक्षित राहिलेला घटक आशा सेविका यांच्या जीवनावर हा चित्रपट साकारला आहे. आपल्या गावखेड्यात आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या या महिलांची कहाणी पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. या सुंदर उपक्रमाबद्दल आणि संवेदनशील प्रयत्नाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक.”

चित्रपटात मुख्य भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरू समवेत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते, आणि दिलीप घारे यांचा समावेश आहे. चित्रपटाचे लेखन अंतरिक्ष श्रीवास्तव आणि दीपक पाटील यांनी केले आहे तर दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील सुरेश सारंगम यांनी कॅमेराची धुरा सांभाळली आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे, दि. २८: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत होती, तथापी नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत आहे.

नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार असून इतर मजकूरही ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती

मुंबई, दि. 28 : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्‍यांना होतो आहे. आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील 15 दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. अ‍ॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा: मुख्यमंत्री श्री. फडणवीस
शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दराने माल घेवून शासनाला जास्त दराने विकला जात असे. नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भावाप्रमाणे खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनाच मालाची विक्री करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.

रामेश्वर नगरीत विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनाची उभारणी

लवकरच लोकार्पण सोहळा जगभरातील मान्यवर येणार डॉ. प्रा. विश्वनाथ कराड
      पुणे :- सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर (रुई) हे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वावलंबी व आदर्श गाव म्हणून उदयास आले असून येथे भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या  ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’च्या माध्यमातून संपूर्ण जगाला ‘वसुधैव कुटुंबकम्’ व ‘एकं सत् विप्रा बहुदा वदंती’ हा मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
         राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक आदर्श व स्वयंपूर्ण खेडे कसे असावे, याची संकल्पना मांडली या संकल्पनेला अनुसरून डॉ प्रा. विश्वनाथजी कराड यांच्या पुढाकाराने रामेश्वर (रुई) येथे आदर्शवत् व स्वावलंबी असे खेडे निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांसोबत, रामेश्वर (रुई) गावाचे रूप पालटून आता त्याची विश्वधर्मी मानवता तीर्थ अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रभु श्रीराम मंदिर, जामा मस्जिद व हजरत जैनुद्दिन चिस्ती दर्गा याचे पुर्ननिर्माण रामेश्वर (रुई) गावातील समस्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन केले व सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्वाचा एक नवा आदर्श भारतासमोर ठेवला. त्याचप्रमाणे, भारतातील सर्वात मोठा लाल मातीचा कुस्ती आखाडा, ग्रामीण रुग्णालय व वाचनालय, सर्व धर्मांचा संदेश देणारा विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू, तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, रामेश्वर (रुई) चे श्रद्धास्थान असलेले संत श्री गोपाळबुवा महाराज यांचे अत्यंत सुंदर समाधी मंदिर अशा विविध समाजोपयोगी उपक्रमातून रामेश्वर (रुई) हे महात्मा गांधींच्या स्वप्नातले स्वावलंबी व आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
         विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे साकार होत असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस डॉ प्रा विश्वनाथ कराड यांच्यासह प्रगतशील शेतकरी काशीरामनाना कराड, डॉ महेश थोरवे आणि गिरीश दाते यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ प्रा विश्वनाथजी कराड म्हणाले की,
विश्वशांती, सर्वधर्मसमभाव, विश्वबंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारी एकमेवाद्वितीय वास्तु रामेश्वर (रुई) येथे साकार होत असून या वास्तूस ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ असे नामकरण करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे ‘वसुधैव कुटुंबकम्’ व ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ हे संदेश जगाला विनाशापासून वाचवू शकतात, अशी आमची धारणा आहे आणि हाच संदेश एकमेवाद्वितीय अशा ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’च्या माध्यमातून संपूर्ण जगाला देण्याचा हा प्रयत्न आहे.
       विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन हे २५० फूट लांब आणि ९० फूट रुंद एवढ्या मोठ्या छताचे उभारणी केली असून भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीकच म्हणावे लागेल. या भवनात मानवतेचा इतिहास घडविणाऱ्या अनेक थोर संत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांच्या भव्य चित्रांमधून आणि त्यांच्या संदेशांमधून मानवता भवनाचे एक आगळेवेगळे दर्शन समाजाला घडेल, यात शंका नाही या भावनाचा योग ध्यानधारणा व ओकार साधना, केंद्र, सरपंच परिषद तसेच इतर ग्रामपंचायती संबंधी कार्यक्रम, कृषी मेळावे, कुस्ती स्पर्धा तसेच टेबलटेनिस, कॅरम इ. इनडोअर खेळ, रक्तदान शिबिरे, विविध विषयांवरच्या परिषद चर्चासत्र कार्यशाळा, मुलांसाठी संस्कार शिबिर, महिला बचत गटांच्या बैठका / मेळावे, लोकशिक्षण व साक्षरता कार्यक्रम, पत्रकारांसाठीचे मेळावे, लोकोपयोगी प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, वारकरी प्रशिक्षण केंद्र, भागवत सप्ताह, भजन / कीर्तन / भारूड संबंधी कार्यक्रम, विविध वस्तूंचे प्रदर्शन
या शिवाय इतर विविध लोकोपयोगी कार्यक्रमाठी वापर केला जाणार आहे.
       सदरील रामेश्वर (रुई) येथे साकारण्यात आलेल्या ‘अद्वितीय विश्वधर्मी मानवतातीर्थ विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ या वास्तूचा लोकार्पण सोहळा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे अत्यंत अस्मरणीय असा लोकार्पण सोहळा होईल. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी काशीराम दा कराड, गिरीश दाते आणि डॉक्टर महेश थोरवे उपस्थित होते.

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधत दिले न्यायाचे आश्वासन

सातारा, दि. २८ ऑक्टोबर २०२५ :
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने (Phaltan Doctor Case) संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधून त्यांना सांत्वन दिले तसेच न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. गोऱ्हे यांनी या संवादादरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची वेदना जाणून घेतली व सांगितले की, “ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा केला जाईल.”

त्या पुढे म्हणाल्या की, “मी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच फलटण व साताऱ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेणार आहे. पीडितेने केलेल्या लेखी तक्रारीवर कोणती कारवाई झाली याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रताडना प्रतिबंध समितीने’ कोणती पावले उचलली, हे देखील तपासले जाईल.”

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे स्पष्ट केले की, “पीडित कुटुंबीयांची मागणी बीड न्यायालयात खटला चालवण्याची असल्यास, त्याबाबत विधी व न्याय विभागाशी तसेच उच्च न्यायालयाशी आवश्यक चर्चा करून निर्णय घेता येईल. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधी सचिवांनाही पत्र पाठवले जाईल.”

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या संगीता चव्हाण, माजी आमदार गोविंद केंद्रे व केशव आंधळे यांच्याशीही डॉ. गोऱ्हे यांनी चर्चा केली. त्यांनी सर्व संबंधितांना न्यायप्रक्रिया वेगाने पार पाडावी आणि पीडित कुटुंबीयांना आधार मिळावा यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलासा देत म्हटले की, “तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. मुलगी अत्यंत हुशार आणि कर्तृत्ववान होती, तिच्या आत्म्यास शांती लाभो आणि न्याय मिळावा, हे आमचे कर्तव्य आहे.”

चक्रीवादळ मोंथा आंध्रच्या किनारपट्टीपासून 50km दूर:15kmph वेगाने पुढे सरकतेय-120 रेल्वे-52 उड्डाणे रद्द

4 राज्यातील 50,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

मोंथा चक्रीवादळाचे परिणाम मुंबईतही जाणवत आहेत, जिथे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी चक्रीवादळ मोंथा साठी रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला.रेल्वे अधिकाऱ्यांना चक्रीवादळ प्रभावित भागात रेल्वे सेवा वेळेवर थांबवण्याचे, सुरक्षा उपाययोजना वाढविण्याचे आणि आवश्यक असल्यास प्रवाशांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. रेल्वेने हाय अलर्ट जारी केला आहे आणि सर्व नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असेल असे त्यांनी सांगितले.
विशाखापट्टणम चक्रीवादळ इशारा केंद्राच्या उपसंचालकांनी सांगितले की, मोंथा चक्रीवादळ आज काकीनाडा किनाऱ्यावर धडकणार आहे.
चक्रीवादळ मोंथाच्या प्रभावामुळे पुरी येथील समुद्र अत्यंत धोकादायक आणि खवळलेला आहे. अग्निशमन विभागाचे अधिकारी जिग्यांशु बेहरा म्हणाले की, अपघातांचा धोका जास्त असल्याने समुद्रात प्रवेश पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे.


बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीवादळ मोंथा मंगळवारी सकाळी तीव्र वादळात रूपांतरित झाले. सध्या ते मछलीपट्टनमपासून सुमारे १९० किमी आग्नेयेस केंद्रित आहे. त्याचा परिणाम आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बंगाल आणि ओडिशातील जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे.या राज्यांमध्ये ९० ते ११० किमी प्रतितास वेगाने वारे उसळत आहेत. भूस्खलनाच्या वेळी ५ मीटर (१६ फूट) उंचीच्या लाटा उसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. चारही राज्यांमधील किनारी भागातून ५०,००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ५५ हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याच्या मते, काकीनाडा-मछलीपट्टनम किनाऱ्याजवळ येताच वादळ तीव्र होईल. मोंथा चक्रीवादळ पुढे सरकत असल्याने काकीनाडा येथे समुद्र खवळला आहे. सध्या ते मछलीपट्टनमपासून सुमारे १९० किमी आग्नेयेस केंद्रित आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील ३ दिवस या वादळामुळे केरळ, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंडमध्ये पाऊस पडू शकतो.थायलंडने वादळाला मोंथा हे नाव दिले. थाई भाषेत याचा अर्थ सुगंधित फूल असा होतो. मंगळवारी सकाळपासून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये ९० ते ११० किमी प्रतितास वेगाने पाऊस आणि वारे वाहत आहेत.

चक्रीवादळ मोंथाच्या प्रभावामुळे विजयवाडामध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. एनटीआरच्या जिल्हाधिकारी लक्ष्मी शाह यांनी लोकांना घरातच राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.विभागीय स्तरावरील पथके आणि पोलिस दल जिल्ह्यातील गावांवर लक्ष ठेवून आहेत. रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी आणि आपत्कालीन सेवा सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

अदिदासच्या नावावर गाझियाबादच्या कंपनीचा ट्रॅकसुट मारला खेळाडुंच्या माथी..१२ कोटीच्या निधीचा अपहार

पुणे : तीन नॅशनल गेमसाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या १२ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी दिला असताना त्या निधीचा अपहार करुन खेळाडुंना निकृष्ट दर्जाचे साहित्य दुप्पट किंमतीला खरेदी केल्याचे दाखवून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव नामदेव संपत शिरगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नामदेव संपत शिरगावकर Namdev Sampat Shirgaonkar (रा. कोरोल्ला ज्युएल हौसिंग सोसायटी,मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघ या संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप उत्तमराव भोंडवे (वय ५१, रा. जाणता राजा कुस्ती केंद्राजवळ, लोणीकंद) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडुंसाठी अदिदास या कंपनीचे ट्रॅकसुट प्रत्येकी २५०० रुपयांना घेतल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु ते ट्रॅकसुट ओरीजनल कंपनीचे नसून नाझीयाबाद येथील एक्झॉटिका एलियन या कंपनीकडून प्रत्येकी १२०० रुपयांना मुंबईतील विरा स्पोर्टस यांनी खरेदी केलेले आहेत. परंतु हे ट्रॅकसुट महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांनी पुण्यातील दत्तवाडी येथील अजिंक्य सप्लायर्स यांच्याकडून २५०० रुपयांना खरेदी केल्याचे दाखविले आहे. असा प्रकार ब्लेझर, शुज, टी शर्ट, टर्कीश टॉवेल, कीट बॅग याबाबतीत देखील झाल्याचे संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच खेळाडुंच्या विमान प्रवासावर ७१ लाख ९६ हजार ८७२ रुपये इतका अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे. अपहार लपविण्यासाठी ते खोट्या व बोगस पावत्या गोळा करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते याप्रकरणी तपास करीत आहेत.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन ही खेळ संघटना महाराष्ट्रातील सर्व खेळांची शिखर संघटना आहे. तिला भारतीय ऑलिंपिक असोसिएशनची संलग्नता असल्याने राज्यातील प्राविण्यधारक खेळाडुंना पुरस्कार देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना ५ टक्के गुणांची सवलत देण्यासाठी शासनाकडे यासंघटनेची शिफारस लागत असते. तसेच प्रत्येक ४ वर्षांनी होणाऱ्या नॅशनल गेम्स करीता महाराष्ट्र शासनाकडून निधी घेऊन राज्यातील विविध खेळांचे संघ पाठवण्यासाठी जबाबदारी सुद्धा या असोसिएशनकडे असते. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे नामदेव शिरगावकर हे महासचिव म्हणून मागील ४ वर्षांपासून कामकाज पहात आहेत.शिरगावकर यांनी स्वत:चे नातेवाईक व जवळच्या व्यक्तींना सोबत घेऊन अनेक खेळ संघटना स्थापन केल्या असून ते स्वत: त्या संघटनेच्या विविध पदावर काम करतात.

नामदेव शिरगावकर यांच्या काळात २०२२ मध्ये गुजरात नॅशनल गेम्ससाठी ३ कोटी ५० लाख, ऑक्टोबर २०२३ मध्ये गोवा नॅशनल गेम्ससाठी ४ कोटी रुपये व जानेवारी २०२५ मध्ये उत्तराखंड नॅशनल गेम्ससाठी ४ कोटी ९५ लाख अशा प्रकारे ३ नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र शासनाने स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी व खेळाडुंचे कोचिंग कॅम्पसाठी १२ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनकडे वर्ग केला होता.

निधी घेतल्यानंतर त्याच्या हिशोबाची बिले व पावत्यासहीत त्या वर्षाचे अखेर ३१ मार्च अगोदर शासनास सादर करणे आवश्यक असते. परंतु, गुजरात नॅशनल गेम्स वगळता इतर २ स्पर्धांचा खर्च महासचिव नामदेव शिरगावकर यांनी अद्याप शासनाला सादर केला नाही. फक्त गुजरात नॅशनल गेम्सचा हिशोब सादर करताना लेखा परीक्षण अहवाल सादर केला आहे. त्याच्या पावत्या, बिले व पुरवठादारांना सादर केलेली कागदपत्रे इत्यादी माहिती शासनास सादर केली नाही. त्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगावकर यांना नोटीस बजावली असून त्याबाबत ३ ऑक्टोंबरपर्यंत सर्व हिशोब सादर करण्यास मुदत दिली होती. परंतु त्यांनी हिशोब सादर केला नाही.

गुजरात नॅशनल गेम्सकरीता शासनाने ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. त्याचे लेखापरिक्षण अहवाल त्यांनी सादर केला. ऑडिट रिपोर्टमध्ये जो खर्च दाखविण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनेक बाबतीत ताळमेळ बसत नाही.

महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश.

नांदेड, दि. २८ ऑक्टोबर

अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून हेक्टरी सरसकच ५० हजार रुपये दिले पाहिजे याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा व महायुती सरकारवर तोफ डागली. लोकसभातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मतांची चोरी करुन मुख्यमंत्री झाले आहेत जो माणूस स्वतः चोर मुख्यमंत्री (चो. मु.) आहे, चिप मुख्यमंत्री आहे म्हणून ते असेच चिप वक्तव्य करत आहेत. अशा पद्धतीने खालच्या पातळीवरच्या टीकेने राहुल गांधी यांचे नेतृत्व व कर्तृत्व कमी होत नाही, असे प्रत्युत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

नांदेड हा काँग्रेस विचाराचा जिल्हा असून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तो नेत्यांचा पक्ष नाही. आजही नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचाच आहे व उद्याही काँग्रेस विचाराचाच राहिल. काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. काल गडचिरोलीत आज नांदेड जिल्ह्यात तर उद्या जालना जिल्ह्यात पक्ष प्रवेश होत आहे. हा राहुल गांधी यांच्या संघर्षाचा परिणाम असून काँग्रेस विचारावर विश्वास ठेवून हे पक्ष प्रवेश होत आहेत याने पक्षाला बळ मिळत असून महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतील असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ करा, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील असे सपकाळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थिती नांदेडमध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सुमठाणकर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.