Home Blog Page 321

हडपसरच्या वाहतूक कोंडीची अजितदादांना झाली आठवण,म्हणाले, अत्याधुनिक तंत्र वापरा,पण कोंडी सोडवा

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा-उपमुख्यमंत्री

पुणे, दि.१४ सप्टेंबर : रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

श्री. पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता स्थळ पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, खराडी ते केशवनगर पुलाचे काम करतांना अत्याधुनिक, दर्जेदार साहित्य वापरावे. या पुलामुळे चंदननगर, केशव नगर, खराडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार असल्याने कामे गतीने पूर्ण करावे.

या भागातील नागरिकांनी पाणी, रस्ते, पथदिवे, कायदा व सुव्यवस्था, बसेस व्यवस्था आदींच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या असता त्या प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

मूढंवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व पर्याय विचारात घेऊन पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासन, पीएमपीएल, लोकप्रतिनिधींनी मिळून बैठक आयोजित करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना श्री. पवार यांनी केली.

लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट !!

0

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा साक्षात्कार घडवणाऱ्या संग्रहालयाचा देखील मनपूर्वक अभ्यास केला.

भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२१–२२ या काळात विद्यार्थीदशेत या वास्तूत वास्तव्यास होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला आदराने पुष्पांजली अर्पण करत सपकाळ कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

भूतकाळातील दुर्मीळ छायाचित्रे, वैयक्तिक वस्तू, हस्तलिखिते व संविधानाच्या प्रतिकडे पाहताना त्यांनी भावना व्यक्त केल्या की, ही वास्तू केवळ एक स्मारक नसून प्रेरणास्थान आहे. बाबासाहेबांच्या अभ्यासाच्या खोलीत बसून त्यांनी नमूद केले की, “ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला.”

या प्रसंगी मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या ‘सकपाळ’ या आडनावाचा संदर्भ देत, बाबासाहेबांचे पूर्वीचे आडनाव ‘सकपाळ’ होते, याची आठवण करून दिली.

बाबासाहेबांच्या विचारांची आजही देशाला नितांत गरज असून, त्यांच्या मार्गाने चालण्याचे तेथील आंबेडकरी जनतेला आवाहन केले. माझी लंडनची भेट आता खरी सार्थक झाली असून मी ती कधीही विसरणार नाही असे प्रकर्षाने सांगितले. बाबासाहेब हे फक्त ऐका समाजाचे तसेच देशाचे नसून ते सर्व जगाचे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीच्या निमित्ताने लंडनस्थित आंबेडकरी अनुयायांनी हर्षवर्धन सपकाळ यांचे पुष्पगुच्छ आणि “महामानव” हे पुस्तक देऊन हार्दिक स्वागत केले.

कोथरुडकरांनो मेट्रोला जायचंय… गाडी कशाला बस मोफत वापरा!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम

लास्ट माईल कनेक्टिविटीसाठी बससेवेसोबतच रिक्षा सेवा देखील उपलब्ध करुन देणार!- ना. पाटील

पुणे:

कोथरुडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे. कारण कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे. ना. पाटील आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत या बसचे लोकार्पण करण्यात आले. लास्ट माईल कनेक्टिविटीसाठी रिक्षा सेवा देखील उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याची घोषणाही ना. पाटील यांनी यावेळी केली.

यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, विठ्ठलआण्णा बराटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, मतदारसंघ समन्वयक नवनाथ जाधव, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, वृशाली चौधरी, नगरसेवक जयंत भावे, रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर यांच्यासह उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने 2022 पासून पुणे मेट्रोची सेवा शहरात कार्यरत आहे. सदर सेवा सुरु झाल्यापासून पुणेकरांचा वेळ आणि पैसा यामध्येही बचत होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. तरीही वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने, अनेकजण या सुविधेचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

त्यामुळे कोथरुडकरांनी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करावा; यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मोफत शटल बससेवा सुरु करण्यात येत आहे. या सुविधेमुळे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच, कोथरुड मधील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.

सदर सेवा सोमवार ते शनिवार सुरु राहणार असून, नागरिकांच्या मागणीनुसार, बसचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. या सेवेमुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अधुनिक, सुरक्षित आणि आरमदायी सार्वजानिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या पुणे मेट्रोच्या उद्देशास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी नागरिकांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निवडून दिला जातो. त्यामुळे लोकाभिमुख सेवेची शिकवण असल्याने जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. मेट्रोसाठी लास्ट माईल कनेक्टिविटी निर्माण करण्यासाठी आणि मेट्रो प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी रिक्षा सेवा देखील सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

ना. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली पहिली शटल बस सेवा राजाराम पूल- माळवे चौक, वनदेवी- कर्वेनगर, डहाणूकर- कर्वे पुतळा- करिश्मा चौक- एसएनडीटी मार्गावर रोज सकाळी ८.३० ते १ आणि सायंकाळी ४ ते ८ वेळेत सुरु असणार आहे. दरम्यान, सार्वजानिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा, यासाठी अशा पद्धतीने मोफत शटल बससेवा सुरु करण्याच्या ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपक्रमाचे कोथरुडमधून कौतुक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात!

अजित दादा पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून पूरग्रस्तांना मदतीचा ट्रक रवाना
पुणे : पंजाब राज्यातील अनेक भागांत आलेल्या महापुरामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, असंख्य नागरिक बेघर आणि अन्न-पाण्याविना संकटात सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर “माणुसकी हीच खरी ताकद” या तत्त्वाधिष्ठित भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाणी, गहू, तांदूळ, कांदे, बटाटे, डाळी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची मदतगाडी पंजाबकडे रवाना करण्यात आली.

ही मदत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली.
राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे, सौ. शोभा नांगरे तसेच मार्केट यार्डमधील व्यापारी व आडत बांधवांच्या माध्यमातून ही मदत पाठविण्यात आली.

“लाडकी बहिण” योजनेतून महिलांचा मतदानातील सहभाग वाढला-डॉ. नीलम गोऱ्हे

बेंगळुरू-“लाडकी बहिण” योजनेतून राजकारणात महिलांचा मतदानातील सहभाग वाढलाच .त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा महिलांसाठी चार धोरणांचा प्रवास महिलांसाठी ठोस आणि दूरगामी धोरणात्मक वाटचाल करणारा ठरला असे मत येथे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. बेंगळुरू येथे पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदिय मंडळ अखिल भारतीय परिषदेच्या सत्रात आपल्या भाषणातून त्यांनी लोकशाहीची खरी ताकद ही विधायक, फलदायी आणि जनाभिमुख चर्चेत असल्याचे ठामपणे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक चौथ्या महिला धोरणाला तसेच नमो शक्ती विधेयकाला विशेष अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, परिस्थिती आणि काळानुसार महिलांसाठी धोरणे तयार करून त्यांची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र विधीमंडळ हे देशात अग्रगण्य ठरले आहे. ही आतापर्यंतची मोठी उपलब्धी असून इतर राज्यांसाठी महाराष्ट्राने दिशादर्शक भूमिका बजावली आहे.त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राने गेल्या तीन दशकांत महिलांसाठी ठोस आणि दूरगामी धोरणात्मक वाटचाल केली आहे:१९९४ मध्ये मुलींना मुलांप्रमाणेच वारसाहक्क मिळावा याबाबतचा पहिला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.२००२ मध्ये दुसऱ्या धोरणाद्वारे जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट, महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि सर्व क्षेत्रात समान संधी यावर निर्णय झाले.२०१३ मध्ये तिसऱ्या धोरणातून अव्यवस्थित क्षेत्रातील महिला, नव्या कायद्यांचा पाया आणि कौटुंबिक न्यायालये सर्वत्र करण्याचा निर्णय झाला.२०२३ मध्ये चौथ्या महिला धोरणातून संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) आणि बीजिंग प्लॅटफॉर्म ऑफ ऍक्शन स्थानिक संदर्भात समाविष्ट करून प्रत्येक खात्यासाठी ठोस निर्देशांक ठरविण्यात आले.”ही धोरणे केवळ कागदावर नाहीत, तर विधानपरिषद आणि विधानसभेत सखोल चर्चेनंतर लोकाभिमुख मार्गाने साकार झाली आहेत. मला २०१९ मध्ये महिलांच्या सबलीकरण आणि SDGs बाबत ठराव मांडण्याचा सन्मान मिळाला होता. दोन दिवस चर्चेचा समारोप तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी केला होता. हे महाराष्ट्राच्या लोकशाही वारशाचे उदाहरण आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

“लाडकी बहिण” योजनेतून राजकारणात महिलांचा मतदानातील सहभाग वाढलाच .

महिलांसाठी आखलेल्या विविध योजनांचा उल्लेख करताना “मुलींना थेट आर्थिक मदत मिळावी, शिक्षण व सबलीकरणाचा पाया मजबूत व्हावा, हे धोरणात्मक चर्चेचे फळ आहे.”विधीमंडळातील चर्चा व त्यातुन राजकिय धोरण हा लोकशाहीचा पाया असल्याचे ना.नीलम गोर्हे यांनी नमुद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी “नमो शक्ती वंदन विधेयक” या महिलांच्या रीजकिय निर्णय प्रक्रियेत ३३ टक्के आरक्षण देणार्र्या महत्त्वपूर्ण कायद्याचा उल्लेख केला.
“मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या या विधेयकामुळे देशभरातील महिला व मुलींच्या नेतृत्वाच्या संधीस अधिक बळकटी मिळणार आहे. अशा निर्णयांमुळे शासकिय चौकट बदलतेच, महिलांच्या मनात आत्मविश्वास आणि शक्ती निर्माण होते.”

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राने केलेले योगदान केवळ कायदेशीर चौकटीत मर्यादित नाही — विधानसभेबरोबर विधानपरिषदेतही महिलांनी मांडलेले प्रश्न, उपस्थित केलेल्या मागण्या, आणि सक्रिय भागीदारी हा खरी ताकद आहे. “महिलांच्या प्रश्नांसाठी वैधानिक समितीची स्थापना हा आपल्या राज्याचा संवेदनशील आणि विधायक दृष्टिकोन आहे.”
या परिषदेबद्दल ओमप्रकाश बिर्ला ,लोकसभा अध्यक्ष, श्री हरिवंशराय तसेच सिपीए चे जनरल सेक्रेटरी स्टिफन ट्विग, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सहकार्याबद्दल अभिनंदन केले .
सत्रानंतर कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष श्री उ. त. खादर यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी विविध राज्यांतील विधानपरिषद सभापती, उपसभापती तसेच विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते, ज्यांनी या दिवशीच्या आनंदात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा गौरव वाढवला.

पाकबरोबर क्रिकेट खेळणे, म्हणजे शहिदांच्या टाळूवरचे लोणी खाणे – भाजपावर आप चा प्रहार

पुणे- ते भारतात घुसतात , आपले निष्पाप लोक मारतात , सीमेवर सैनिकांचे रक्त वाहते आणि आपणहि त्यांच्याविरोधात युध्द पुकारतो त्यांचे पाणी बंद करतो अन … दुसरीकडे .. दुसरीकडे काय त्यांच्याशी क्रिकेट खेळायचे ? कशासाठी ? हा कसला व्यापार ?हि कसली आणि कोणती व्यापारी वृत्ती? असे सवाल करत पाकबरोबर क्रिकेट खेळणे, म्हणजे शहिदांच्या टाळूवरचे लोणी खाणे अशा शब्दात आम आदमी पार्टीने येथे भाजपवर प्रहार केला आहे. आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले,अनिकेत शिंदे,सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील यांनी येथे तीव्र निदर्शने करत भाजपा सरकारचा जोरदार निषेध नोंदविला

मुकुंद किर्दत म्हणाले,’ रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे ‘एशिया कप’ या क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथे पहलगाम घाटीत २६ निष्पाप लोकांची हत्या करण्यात केली होती.या पार्श्वभूमीवर आता राजकीय लढाई पण सुरू झाली आहे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने सुद्धा हा शहिदांचा अपमान आहे ज्या देशाने पहेलगाम येथे भारतीय २६ महिलांचे कुंकू पुसले त्याच दहशतवादी देशासोबत क्रिकेट खेळण्या मागे भाजपच्या मोदी सरकारची कोणती हतबलता, मजबुरी आहे? काही ठराविक आर्थिक हितसंबंधासाठी देशप्रेमाला तिलांजली आम्ही स्वीकारणार नाही.
आम्ही सर्वांना याचा तीव्र निषेध आणि बहिष्कार करण्याचे आवाहन करतो!’ असे सांगत त्यांनी येथे आम आदमी पार्टी तर्फे पुण्यामध्ये शिवाजीनगर मेट्रो चौकामध्ये पाकिस्तानी क्रिकेट चा टी-शर्ट जाळला.

भाजपा महिला मोर्चा कडून राहुल गांधी मुडदाबाद घोषणा देत निषेध आंदोलन

बिहार कॉंग्रेसच्या AI व्हिडीओने मोदींच्या मातेचा केला अवमान

पुणे-काँग्रेस पक्षाने बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पुणे शहरात जोरदार आंदोलन केले. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” या भारतीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.असे भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. मनीषा लडकत यांनी म्हटले आहे.

या आंदोलनात सौ.स्मिता खेडकर. राजेश्री शिळीमकर. वृषाली चौधरी. अनिता शहाणे. लता धायगुडे. सुचेता भालेराव. सोनल कोद्रे. मोना गद्रे. अनिता तलाठी. सीमा लिमये. थोरविणा येणपुरे. गौरी शिरोळे. ज्योती गारवे. विद्या चव्हाण. रोहिणी रहाणे. सायली भोसले. अश्विनी दुबळे. कल्पना अय्यर. स्मिता गायकवाड. रेखा ससाणे. बाणेकर सारिका. वैजयंती पवळे. वृषाली शिंदे. प्रीति भाटीपाटील.
आदीपदाधिकारी आणि असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पुणे शहरातील अलका चौकात सकाळी १० वाजता हे आंदोलन झाले.
यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसची विचारधारा नेहमीच विष पेरणारी असून, ती नारीशक्तीचा अवमान करणारी आहे,” असा आरोप लडकत यांनी केला.त्या म्हणाल्या ,’पंतप्रधान हे देशाचे असतात आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे, तसेच त्यांचे वाईट पद्धतीने चित्र रेखाटणे हा देशातील सर्व मातांचा अपमान आहे, हे मातृशक्ती कधीही सहन करणार नाही,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनातून काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला. कोणत्याही व्यक्तीने मातृशक्तीचा अनादर केल्यास तो सहन केला जाणार नाही, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. तसेच,जनतेलाही मातृशक्तीच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

नागरीकांच्या समस्यांमध्ये वाढ;हडपसरमधून 3 हजार 700 तक्रारींचा पाऊस म्हणजेच सरकार अपयशी:जनसंवाद मध्ये स्पष्ट

पुणे- महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आता स्वत: मैदानात उतरले आहेत , महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन धमकावल्याबद्दल वादात सापडलेल्या आणि प्रतिमेला हानी पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आता ती भरून काढण्यासाठी जनसंवाद उपक्रम सुरु करण्यात येतोय. या उपक्रमाची सुरुवात आजपासून पुण्यातील हडपसर मतदारसंघातून झाली आहे. या कार्यक्रमात तब्बल 3 हजार सातशे तक्रार निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. ‘जनसंवाद’ कार्यक्रमात नागरिकांच्या प्रतिसादामध्ये इच्छुक उमेदवारांची लुडबुड दिसून आली. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इछुकांनी निवेदने देण्याचा देखील प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकांचे कॅम्पेन ज्या कंपनीला देण्यात आले त्याच कंपनीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कॅम्पेन दिलेले असून त्याच गुलाबी रंगाच्या माध्यमातून ‘जनसंवाद’ अभियानातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून आज करण्यात आला. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघात अशाप्रकारे अभियान राबविण्यात आले तरीही येथून तक्रारीचा पडलेला पाउस पाहता हे सरकार अपयशी ठरले आहे हेच यावरून स्पष्ट होते आहे.

राष्ट्रवादीच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील यांनी आयोजन केले होते. 19 विविध विभाग निहाय टेबल करुन त्याठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकारी बरोबर पक्षाचे कार्यकर्ते व कॅम्पेन राबविणाऱ्या कंपनीचे स्वयंसेवक नागरिकांना मदतीसाठी नियुक्त केलेले होते. हडपसर परिसरातील विविध भागातून नागरिकांनी उदंड प्रतिसाद या अभियानास दिला. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी बरोबर गृहनिर्माण संस्थांनी देखील या जनसुनावणीकडे धाव घेतली व वारंवार मागणी करुनही समस्यांचे निराकरण होत नाही अशा समस्या निवेदन देवून कथन केल्या. अशाप्रकारे तब्बल 3 हजार सातशे तक्रार निवेदने या कार्यक्रमात प्राप्त झाली. विविध विभागाकडे याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या व्यासपीठावरील फ्लेक्सवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लोगो नाही. मात्र अजित पवारांच्या पार्टीचा पिंक कलर सर्वत्र वापरण्यात आला आहे. तर या कार्यक्रमाला शासना मधील सर्व अधिकारी उपस्थित आहे.यामुळे हा कार्यक्रम शासनाचा की पक्षाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या कार्यक्रमापूर्वी अजित पवार  यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले,सर्वसामान्य लोकांना त्रास होत असतो. अशा कार्यक्रमामधून प्रश्न सुटायला मदत होत असते.त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठून तरी सुरुवात करायची असते म्हणून हडपसरमधून सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर अंजना कृष्णा यांच्या बाबत प्रश्न विचारताच अजित पवारांनी उत्तर देण टाळल्याचे पाहण्यास मिळाले.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी जनसुनावणी ठेवण्यात आली होती. या समस्या सोडविण्यासाठी पवार व्यक्तीश: लक्ष घालणार असल्याची जाहिरात सर्वत्र केल्याने नागरिकांनी या सुनावणीला मोठी गर्दी केली होती. या जनसुनावणीसाठी पवार यांच्या मुंबईच्या कार्यालयातून जिल्हा प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असल्याचे पत्र काढण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तब्बल ३० विभागांना आपल्या प्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांना या पक्षाच्या जनसुनावणीला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले होते. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे व्यासपीठावरच अजित पवार यांच्या समवेत उपस्थित होते. आमदार चेतन तुपे आणि अन्य पदाधिकारी मात्र, नागरिकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करत होते. सर्व ३० विभागांचे अधिकारी सभागृहात उपस्थित होते. या समस्यांमध्ये सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा तसेच काही वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या होत्या. विविध विभागांचे प्रमुख उपस्थितमात्र, जिल्हा परिषद , पिंपरी चिंचवड पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचा पूर्व भाग, पीएमआरडी, महावितरण, राज्य रस्ते मार्ग परिवहन, एमआयडीसी, राज्य रस्ते विकास महामंडळ, मत्स्य विभाग, भूमी अभिलेख, विभागीय पर्यटन कार्यालय, कृषी विभाग, अन्नधान्य वितरण अधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुरातत्त्व विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभाग खडकवासला प्रकल्प, पाटबंधारे विभाग, उपविभागीय अधिकारी हवेली, तहसीलदार हवेली, गटविकास अधिकारी जिल्हा परिषद आदी विभागांचे बहुतांश विभागप्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर व मांजरी गाव या परिसरातील नागरिकांना मूलभूत व पायाभूत समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा, रस्ते वाहतूक, रखडलेल्या पुलाच्या बाजूचा सर्व्हिस रोड, या प्रश्नांची सोडवणूक करावी याबाबत सविस्तर निवेदन अखिल महादेवनगर युवा मंच संस्थापक अध्यक्ष व मांजरी बु. ग्रामपंचायत माजी सदस्य प्रशांत पंढरीनाथ घुले यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. त्यांच्या समवेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. 

प्रशांत पंढरीनाथ घुले यांनी या भागातील पाणी पुरवठा समस्या आणि तिक्रमण व रस्ते वाहतूक समस्याबाबत निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले या निवेदनात मध्ये म्हंटले आहे कि, मांजरी गावासाठी आपण स्थानिक आमदार मा चेतन तुपे यांच्या सहयोगाने व गेली 3वर्ष पाठपुरावा करून पाणी पुरवठा स्कीम केली ती पूर्ण पण झालीं आणि गाव महानगरपालीका मध्ये गेली. सदरील पाणी पुरवठा अपुरा व अखंडित स्वरूपात होत आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही. महापालिका लष्कर पाणी पुरवठा केंद्रातून पाणी देते तो फक्त जुन्या हद्दीतील भागाला मिळते उर्वरित गावाचा भाग व परिसर पाण्यापासून वंचित आहे. झालेली पाणी योजना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नीट चालत नाही. पाणी योजना असून सुद्धा पाणी दुसरी कडे दिले गेले आहे. लोकांना रोज पाणी मिळत नाही. अंतर्गत लाईन नाही त्यामुळे पुरेसा पाणी पुरवठा होत नाही ही प्रमुख व मुख्य समस्या आहे. समाविष्ट भागातील पाणी पुरवठा सुरळीत होईल याबाबतचा प्रश्न सोडवणूक करावी तसेच मांजरी गावाला जोडणारे रस्ते रेल्वे पूल लागत सर्व्हिस रॉड कामे अर्धवट व अपूर्ण राहिलेली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच अण्णासाहेब मगर कॉलेज पासून गोपाळपट्टी व रेल्वे ब्रिज नंतर मांजरी गावापर्यंत रस्त्यावर वाहन पार्किंग आणि फेरीवाले यांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियोजन या भागात नाही. अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. विकास आराखड्यात रस्ते प्रश्न प्राधान्यांनी मार्गी लावावा. तसेच घुले वस्तीपासून साडेसतरा नळी कडे जाणारा रस्ता खराब असून अनेक दिवसांपासून काम रखडलेले आहे. वाहने कॅनॉल मध्ये जाऊन वारंवार अपघात होत आहेत. सदरील काम मार्गी लावावे अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शवून स्वतंत्रपणे मांजरी गावाला भेट देऊन सखोल समस्या जाणून घेईल व निवेदन मधील मुद्दे पाहून संबंधित यंत्रणेला सूचना करतो असे आश्वस्त केले. 

आयपीएस अंजना कृष्णा प्रकरणी अजित पवारांचे जोरदार ‘नो कमेंट्स’

म्हणाले – मी माझी भूमिका मांडलीये..पुन्हा पुन्हा तेच उगाळत बसता
पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील कथित कॉल प्रकरणावरून खळबळ उडाली आहे .अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. याबाबत त्यांना विचारले असता, त्याबद्दल नो कमेंट्स, असे अजित पवार म्हणाले. या संदर्भात मी माझी भूमिका मांडली आहे. पण माझे काम दाखवण्यापेक्षा नको त्या गोष्टी दाखवण्यात रस आहे, असा टोला माध्यामानाच अजित पवारांनी लगावला आहे . मी माझी भूमिका मांडली आहे. फेसबुकवर आणि ट्विटर मी स्पष्टीकरण दिले आहे. मी त्यावर बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचे आहे ते मी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे की, अजित पवारांनी जी भूमिका मांडायची आहे ती मांडली आहे, असेही त्यांनी म्हटले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांना कुर्डू येथील प्रकरणावर विचारणा करण्यात आली असता, “माझे काम दाखवण्यापेक्षा नको त्या गोष्टी दाखवण्यात रस आहे. मग तेच उगाळत बसता. मी मागील 35 वर्षं काम करत असताना कशाप्रकारे वागतो हे विचारा. उत्खनन बेकायदेशीर होते की नाही याबाबत सरकार निर्णय घेईल. मुख्यमंत्री खंबीर आहेत, त्यामुळे काळजी करु नका,” असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आले असता अजित पवारांनी मिश्कीलपणे प्रतिक्रिया देत, “आमच्यात नाराजी नाही, हे मी स्टॅम्पवर लिहून देऊ का? अशी विचारणा केली. आम्ही एकत्र बसतो तेव्हा कधीही तसे वाटले नाही. मुख्यमंत्री अनुभवी आहेत, ते विश्वासाने काम करतात. एकनाथ शिंदे यांचा कार्यकाल पाहिला तर हे तिन्ही नेते लोकाभिमुख प्रशासनासाठीच प्रयत्नशील आहेत. आमचे तिघांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

भारत -पाक सामन्यावरही त्यांची स्वतःची किंवा पक्षाची काहीच भूमिका स्पष्ट नाही – आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. देशात 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार आहेत. अनेकांची मते वेगळी असतात. यामध्ये दोन्ही वर्ग आहेत. दोन्ही वर्गाचे वेगवेगळे म्हणणे आहे. सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे. ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेला आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

सोलापुर जिल्ह्यातील कुर्डु गावात झालेल्या प्रकारामुळे अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याच मानलं जातं आहे. त्याची भरपाई करण्यासाठी डिझाईन बॉक्स कंपनीकडून अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाचे राज्यभर आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या उपक्रमाच्या आधी अजित पवारांना कुर्डू गावातील उत्खनन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अवैध ठरवल्याबद्दल विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा काढता पाय घेतला आहे.

नेमकं काय घडलं होतं?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)

  1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या
  2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर
  3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी
  4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
  5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी
  6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण
  7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका
  8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई
  9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका

काँग्रेस पक्षाची मंत्रालयासमोरील जागा परस्पर आरबीआयला विकण्याचा व्यवहार रद्द करा – सचिन सावंत

काँग्रेस पक्षासहित राजकीय पक्षांबरोबर रिझर्व्ह बँकेचीही मेट्रो कॉर्पोरेशन व सरकारने केली फसवणूक.
काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२५

काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विकली आहे. हा व्यवहार रद्द करून नरीमन पाईंट येथील पूर्वीच्याच जागी काँग्रेस पक्षाला कार्यालय बांधून द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, मंत्रालयासमोर नरीमन पाईंट येथे काँग्रेस पक्षाचे गांधी भवन हे कार्यालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांची कार्यालये अनेक वर्षांपासून होती. मुंबई मेट्रो टप्पा- ३ चे काम पूर्ण झाल्यानंतर फ्री प्रेस जर्नल मार्गावरील त्याच जागेत नव्याने कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करून राजकीय पक्षांना MMRDA आणि MMRC यांनी कार्यालये देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी असा शासन आदेश २१ ऑक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय हस्तांतरीत करावे असे पत्र दिनांक २ डिसेंबर २०१६ रोजी काँग्रेस पक्षाला दिले होते. आता मात्र मेट्रो कार्पोरेशन व सरकारने त्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला ३४०० कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी या व्यवहाराचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षासह सर्व राजकीय पक्षांना कार्यालये बांधून देणार असल्याच्या आश्वासनाची माहिती मेट्रो कार्पोरेशनने रिझर्व्ह बँकेला न देऊन त्यांचीही फसवणूक केली आहे. जमीन अधिग्रहण प्रकरणात सरकार जर राजकीय पक्षांची अशी फसवणूक करत असेल तर सामान्य माणसाच्या जमीन अधिग्रहणात किती फसवणूक करत असेल म्हणून जनतेचा अशा प्रकरणाच्या जमीन अधिग्रहणावर विश्वास राहिलेला नाही. नरीमन पाईंट येथील या जागेचे बाजारमूल्य ५२०० कोटी रुपये आहे पण ३४०० कोटी रुपयांचा व्यवहार करून १८०० कोटी रुपयांचे नुकसानही झाले आहे. हा व्यवहार अहंकारी, मनमानी तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो तात्काळ रद्द करावा असेही सचिन सावंत म्हणाले.

प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनीही या संपूर्ण व्यवहाराची माहिती दिली व त्यासंदर्भातील पत्रव्यवहारही दाखवला. काँग्रेस पक्षाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नरीमन पाईंट तेथील पूर्वीच्या जागीच काँग्रेस पक्षाला कार्यालय द्यावे अन्यथा न्यायालयात धाव घेऊ असा इशारा पत्राद्वारे दिला आहे, असे गणेश पाटील म्हणाले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी आदी उपस्थित होते.

“विधायक चर्चा हीच लोकविश्वासाची खरी ताकद” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बंगळुरूतील सीपीए परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विचारमंथन – विधायक चर्चेतून लोकविश्वास दृढ करण्याचा संदेश

बंगळुरू, दि. १३ सप्टेंबर – “लोकशाही व्यवस्थेचा पाया म्हणजे लोकविश्वास आणि तो दृढ ठेवण्यासाठी विधानमंडळातील विधायक चर्चा व फलदायी विचारमंथन अत्यावश्यक आहे. या प्रक्रियेत महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

बंगळुरू येथे सुरू असलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) भारत विभाग परिषदेत “सभागृहातील वादविवाद आणि चर्चा : लोकविश्वासाचा मुख्य आधार” या विषयावर झालेल्या चर्चेत त्या बोलत होत्या. या परिषदेस लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला अध्यक्षस्थानी असून, राज्यसभेचे उपसभापती श्री. हरिवंश तसेच देशातील सर्व राज्य विधानमंडळांचे पीठासीन अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “विधीमंडळ ही फक्त एक इमारत नाही, तर लोकशाहीच्या अखंड ऊर्जेचे आणि चैतन्याचे केंद्र आहे. लोकांना आपल्या प्रतिनिधींमध्ये संवाद, पारदर्शकता आणि उत्तरदायी निर्णय प्रक्रियेची अपेक्षा असते. विधायक चर्चेमुळेच विधेयकांचे रूपांतर लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या कायद्यांत होते.”

त्यांनी पुढे सांगितले की, “संवादी राजकारण, विचारांचे पुनरावलोकन आणि विधायक चर्चा हीच लोकशाहीला बळकटी देणारी खरी प्रक्रिया आहे. विधायक चर्चा हीच लोकांचा विश्वास टिकवून ठेवते आणि लोकशाही व्यवस्थेला अर्थपूर्ण बनवते.”

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या आशा, ध्येय व संघर्ष यांना प्रतिसाद देणे ही विधायक चर्चेची खरी जबाबदारी आहे. “ग्रामीण भागातील मुलींचे उच्चशिक्षणाचे स्वप्न, तरुणांचे रोजगाराचे ध्येय किंवा शेतकऱ्यांच्या किमतींची अपेक्षा – या आकांक्षा केवळ चर्चेत न राहता ठोस धोरणांत परावर्तित व्हाव्यात,” असे त्या म्हणाल्या.

आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ठळकपणे मांडला. “लोकशाहीमध्ये अर्ध्या लोकसंख्येच्या म्हणजेच महिलांच्या प्रश्नांना दुय्यम स्थान देणे ही गंभीर चूक आहे. खरी लोकशाही तेव्हाच बहरते, जेव्हा महिला समसमानतेने चर्चेत व निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी महाराष्ट्रातील पुढाकारांचा विशेष उल्लेख करताना सांगितले की, महिलांसाठी चार धोरणांची निर्मिती केली आहे. १९९४, २००२, २०१३ आणि २०२३ मधील या महिला धोरणांत संपत्तीतील हक्क, आर्थिक सक्षमीकरण, असंघटित क्षेत्रातील महिला, कौटुंबिक न्यायालये तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांचा समावेश आहे.

“२०१९ मध्ये मी विधान परिषदेत शाश्वत विकास उद्दिष्टे आणि महिलांच्या सक्षमीकरणाबाबत ठराव मांडला होता. दोन दिवसांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिलं. हा लोकशाहीतील विधायक चर्चेचा उत्तम आदर्श आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

महाराष्ट्राचा आदर्श मार्ग

महिला संघटनांची सकारात्मक भूमिका, महिला हक्क समित्यांचे कार्य आणि महिलांच्या सक्रीय सहभागामुळे महाराष्ट्राने नेहमीच प्रगतिशील वाटचाल केली आहे. “महाराष्ट्राने दाखवलेला सहिष्णुता, समानता आणि विधायक कृतीचा मार्ग हा इतर राज्यांसाठी आदर्श ठरू शकतो,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

शेवटी त्यांनी सांगितले, “विधायक चर्चेमुळेच समाजाला आशावाद मिळतो, लोकांचे स्वप्न साकार होते आणि लोकशाहीची ताकद वाढते. ही प्रक्रिया फक्त कायदे बनवण्यासाठी नसून लोकांचा विश्वास आणि सहभाग वृद्धिंगत करण्यासाठी आहे. खरी लोकशाही ही फक्त नावापुरती नव्हे, तर आत्म्यानेही प्रतिनिधिक असली पाहिजे.”

अजितदादांमुळे ‘जनसंवाद’ च्या माध्यमातून नागरिकांसाठी ३० शासकीय विभाग एकाच व्यासपीठावर..!

पुणे, १३ सप्टेंबर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हडपसर येथे “जनसंवाद” या अभियानाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक थेट शासकीय यंत्रणेशी गेले असून यामध्ये व्हॉट्सअॅ चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क्स आणि मिस्ड कॉल क्रमांकासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. पारदर्शक तक्रार निवारण प्रणालीमुळे शेकडो नागरिकांना त्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहचवता आल्या. तक्रार नोंदवणे, अधिकारी वर्गाकडे पोहोचवणे, विभागीय समन्वयातून त्यावर तोडगा काढणे आणि नियमित फॉलो-अप अशी सुसज्ज यंत्रणा जनसंवाद या अभियानात राबविण्यात आली आहे.

हे अभियान अनेक महिन्यांच्या सर्वेक्षणांनंतर आणि जनतेशी केलेल्या प्रत्यक्ष संवादानंतर तयार करण्यात आले आहे. नागरी सेवांमधील तसेच विविध विभागांच्या कामकाजातील तफावत दूर करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ‘जनसंवाद’ हे केवळ तक्रार निवारणाचे व्यासपीठ नसून या माध्यमातून पारदर्शकता व जबाबदारी निश्चित करणारी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

हडपसर येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३० शासकीय विभाग सहभागी झाले होते. या ठिकाणी नागरिकांनी ४ हजारांहून अधिक तक्रारी मांडल्या, त्यापैकी १५०० पेक्षा अधिक तक्रारींचे निराकरण जागीच करण्यात आले. तक्रारींमध्ये पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी संबंधित मुद्दे विशेषतः मोठ्या प्रमाणात नोंदविले गेले. अजित पवार यांनी स्वतः सकाळपासून, दुपारचे जेवण न घेता, दुपारी उशिरापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर स्वतः लक्ष घालून जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा काढला.
प्रत्यक्ष संवाद, शासकीय यंत्रणेचा पाठिंबा आणि अत्याधुनिक डिजिटल साधनांचा वापर या त्रिसूत्रीवर आधारलेला ‘जनसंवाद’ हा पुण्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. नागरिक, शासकीय विभाग आणि राजकीय नेतृत्व यांना एका व्यासपीठावर आणत, लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील विश्वासाची वीण अधिक मजबूत करण्याचे काम या उपक्रमातून साध्य झाले.
या मोहिमेअंतर्गत नागरिकांना विभागनिहाय डिजिटल किऑस्क्स, व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि हेल्पलाईन क्रमांकाद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रत्येक तक्रार नोंदवून तिचे नियमानुसार परीक्षण व पाठपुरावा केला जात असल्याने वेळेवर कारवाई करणे सोपे झाले आहे.

हडपसरनंतर ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून, जनतेशी सातत्यपूर्ण संवाद राखत जबाबदार शासन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा:13 ते 15 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता

0

मुंबई-बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: 14 आणि 15 सप्टेंबर रोजी कोकण-गोव्यात अतिवृष्टी होण्याचा धोका असून, 15 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा आणि शहरी भागांत पाणी साचण्याचा धोका हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य आणि शेजारील वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या प्रणालीमुळे ओडिशा, आंध्र प्रदेशासह महाराष्ट्रात दमदार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 14 व 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत व्यापक पाऊस पडणार आहे.

या काळात वारंवार वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि अल्पावधीत मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनात आणि नागरिकांना वाहतूक व दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा इशारा विशेष महत्त्वाचा आहे. 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोकण-गोवा : 14 व 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीची शक्यता.
मध्य महाराष्ट्र : 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी.
मराठवाडा व विदर्भ : 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान जोरदार सरी.

यामुळे शेतकऱ्यांना पीकसंवर्धनासाठी तातडीने पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, नद्यांमध्ये पाण्याचा अचानक वाढलेला प्रवाह, डोंगराळ भागात भूस्खलन आणि शहरांमध्ये पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग-भाजपा चे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक

पुणे- भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे श्री. विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.या पत्रकार परिषदेला पुणे शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल. मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबांच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबुती देणे हा जीएसटी करप्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल, असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते. केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिले आहे, अशा शब्दांत श्री. विश्वास पाठक यांनी या बदलाचे स्वागत केले.
सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघु उद्योगक्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवावर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल. देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जीएसटी कररचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रीत उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान यामुळे उंचावणार आहे. सध्याच्या चार स्तरीय कर रचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ १८ टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरांत नवी जीएसटी करआकारणी होणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे, असे ते म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे तब्बल ६७ वर्षे, म्हणजे २०१४ पर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिला होता. या काळात देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ २.०४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. धोरण लकवा, भ्रष्टाचार आणि महागाई गगनाला भिडली होती. कर संकलनाची प्रक्रिया क्लिष्ट होती, अर्थकारणात पारदर्शकताही नव्हती. त्यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग वाढविणे ही देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची गरज होती. मोदी सरकारने हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या व त्यांच्या अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रीत केले. एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला आत्मनिर्भर भारत उभा करण्याचे उद्दिष्ट या सुधारणांमुळे शक्य झाले आहे. जीएसटी करआकारणीचा पहिला टप्पा १ जुलै २०१७ रोजी सुरू झाला, आणि त्याआधी तब्बल १७ वर्षे देशाला अशा कररचनेची केवळ प्रतीक्षा होती. २०१७ मध्ये ती संपुष्टात आली आणि आर्थिक सुधारणांचा वेग झपाट्याने वाढला. त्यामुळेच आज देशातील २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली असून देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ही वाटचाल अधिक वेगवान झाली असून आता जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असल्याचा निर्वाळा जागतिक वित्तसंस्थांनी दिला आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकार विकासाचे राजकारण करणार

राज्यात सरकार कोणाचेही असले तरी जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना, लहानमोठ्या उद्योजकांना, प्रत्येक व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे. त्यांचे हीन दर्जाचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत रहाणार असा विश्वासही श्री. विश्वास पाठक यांनी व्यक्त केला.

स्वारगेट मेट्रो स्थानक भविष्यात पुणेकरांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब ठरेल!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विश्वास

ना. पाटील यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहाणी आणि आढावा

पुणे- आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच; कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब देखील ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ना. पाटील यांनी स्वारगेट मेट्रो स्थानकास भेट देऊन; स्थानकाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचलन व प्रणालीचे संचालक विनोदकुमार अग्रवाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, स्वारगेट बस स्थानक हे पुण्याीतल सर्वात व्यस्त बस स्थानक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक पुण्यात येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकाचाच वापर करतात. यापूर्वी स्वारगेटला आलेला प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पीएमपीएमएल किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, पुण्याच्या उदरात तयार झालेले मेट्रो स्टेशनला आताच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आराखडा अतिशय भव्य स्वरूपाचा आहे. हे स्टेशन एका मोठ्या मल्टीमोडल हबमध्ये विकसित केले जात आहे, ज्यामुळे विविध वाहतूक सेवांचे एकत्रीकरण होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कॅार्पोरेटसाठी देखील प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.