Home Blog Page 1433

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा :पुण्याच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम

कुपवाड (सांगली)-
अश्विन कुमार गुरु, कौस्तुभ गिरगावकर शौरेन सोमण यांनी मुलांच्या गटात तर रुचिता दारवटकर व सई कुलकर्णी या पुण्याच्या खेळाडूंनी शानदार विजय मिळवित राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत चौथी फेरी गाठली.सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत आहे.


मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात अश्विन याने आपला सहकारी व नवव्या मानांकित श्रेयस माणकेश्वर याला ११-१३,११-९, ८-११,११-५,११-६ असे पराभूत केले. हा सामना अतिशय चुरशीने खेळला गेला. शेवटच्या दोन गेम्स मध्ये अश्विन याने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला आणि विजय मिळविला. सातव्या मानांकित कौस्तुभ याने रिशित बंसल याला ११-३,११-४,९-११,११-९ असे हरविले. तिसरी गेम रिशितने घेत सामन्यातील उत्सुकता वाढली मात्र शेवटच्या गेम मध्ये त्याला मोक्याच्या क्षणी गुण मिळवता आले नाहीत. तिसऱ्या मानांकित शौरेन याने टी एस टी मुंबई संघाच्या रिशान कनानी याच्यावर ११-९,११-३,११-४ असा सफाईदार विजय मिळवला. त्याच्या आक्रमक खेळापुढे कनानी याला फारशी संधी मिळाली नाही. पुण्याच्या आदित्य सामंत यानेही विजयी वाटचाल कायम ठेवली. त्याने कोल्हापूरच्या मृथिय कळमकर याच्यावर १-११,११-९,१४-१२,११-९ अशी मात केली. मुलांच्याच विभागात ठाण्याच्या प्रत्युष बौवा, कुश पाटील, ध्रुव वसईकर या मानांकित खेळाडूंनी चौथ्या फेरीकडे वाटचाल केली.

मुलींच्या गटात सातव्या मानांकित रुचिता हिने ठाण्याच्या सात्विका बौवा हिचा ११-१,११-६,११-४ असा दणदणीत पराभव केला आणि चौथी फेरी गाठली. एकतर्फी लढतीत तिने टॉप स्पिन फटके आणि चॉप्स असा अष्टपैलू खेळ केला. अकरावी मानांकित खेळाडू सई कुलकर्णी हिला टी एस टी संघाची खेळाडू त्रिशा लुदबे हिच्या विरुद्ध विजय मिळवताना संघर्ष करावा लागला. तिसऱ्या फेरीचा हा सामना तिने ११-९,१२-१०,९-११,११-८ असा जिंकला.  

MAHARASHTRA STATE TABLE TENNIS ASSOCIATION

1st Maharashtra State Ranking Table Tennis Tournament, 2023Sangli

Venue – Krishna Valley School, Kupwad MIDC, Sangli

19th to 23rd July 2023

Organised By – Suraj Foundation & Sangli District Table Tennis Association

Boys Under 13
RoundNamePlayerNameScore
Round – 2Nilay Pattekar(THN)  [Seed – 1] Bt Yuvraj Khandwala(TST)11/3,11/7,11/7
Round – 2Rishi Bhangadia(TST) Bt Rishabh Samag(TST)11/6,11/3,11/3
Round – 2Aaradhaya Tidke(THN) Bt Mann Parmar(TST)11/9,11/5,11/9
Round – 2Mohil Thakur(PNA) Bt Harshal Patil(THN)11/4,12/10,11/8
Round – 2Aakarshan Yadav(TST)  [Seed – 9] Bt Shreeparna Mahorkar(AUR)11/5,11/5,11/6
Round – 2Karan Kashyap(NGP) Bt Anav Yadav(THN)11/9,11/6,14/12
Round – 2Moksh Shahri(TST) Bt Swanand Kulkarni(SNG)13/11,11/5,11/6
Round – 2Sharang Gavali(PNA)  [Seed – 8] Bt Pushpam Shah(KOL)11/4,11/2,11/5
Round – 2Zain Shaikh(TST)  [Seed – 5] Bt Yash Bhandari(NSK)11/8,11/9,11/7
Round – 2Aarav Vora(TST) Bt Ridant Verulkar(TST)11/4,5/11,11/6,11/8
Round – 2Nivaan Sheth(TST) Bt Saarth Shastry(NGP)6/11,11/8,12/10,12/10
Round – 2Shlok Jhaveri(MCD)  [Seed – 12] Bt Aavish Kevalramani(NSK)11/3,11/3,11/7
Round – 2Juned Magdum(KOL)  [Seed – 13] Bt Devansh Soman(THN)11/4,11/7,11/3
Round – 2Swaraj Redkar(TST) Bt Aadit Sonawane(TST)11/9,11/8,11/6
Round – 2Arnav Sarpotdar(PNA) Bt Darsheel Pawar(PNA)11/3,11/6,11/3
Round – 2Prateek Tulsani(THN)  [Seed – 4] Bt Vedant Khalade(SOL)11/2,11/3,11/4
Round – 2Param Bhiwandkar(TST)  [Seed – 3] Bt Adhish Pednekar(SND)11/7,11/1,11/5
Round – 2Harshad Kadam(PNA) Bt Archis Athawale(AUR)11/7,11/9,6/11,11/7
Round – 2Pranil Ajgaonkar(THN) Bt Aarush Tathe(PRB)11/1,11/7,13/11
Round – 2Pushkar Chakradeo(PNA) Bt Ansh Patel(AUR)11/1,11/7,11/9
Round – 2Ekansh Madane(THN)  [Seed – 11] Bt Jay Kunte(PNA)11/7,6/11,11/6,8/11,11/6
Round – 2Aarav Keniya(THN) Bt Nirav Mulye(PNA)4/11,11/6,11/7,7/11,11/7
Round – 2Elvis Tom(PNA) Bt Shivam Dakh(PRB)11/2,11/3,11/4
Round – 2Purab Singh Renu(NGP)  [Seed – 6] Bt Parth Bhanushali(THN)11/1,11/7,11/5
Round – 2Vihaan Haldankar(THN) Bt Rishikesh Patil (ngp)(NGP) [Seed – 7]12/10,11/8,12/10
Round – 2Ayaan Athar(TST) Bt Harsh Naidu(THN)11/4,11/3,11/6
Round – 2Zihan Beddingwala(TST) Bt Tanveer Singh(THN)11/7,11/6,11/5
Round – 2Ishaan Naik(TST)  [Seed – 10] Bt Abeer Rokde(THN)11/7,9/11,11/5,11/13,11/8
Round – 2Hridhaan Vora(TST) Bt Malhaar Talwalkar(TST)9/11,11/9,6/11,11/6,11/7
Round – 2Anuj Phulsundar(PNA) Bt Rajveer Gaikwad(KOL)11/3,11/2,11/5
Round – 2Vihaan Ghatkar(PNA) Bt Ved Kulkarni(THN)4/11,11/5,4/11,11/8,11/9
Round – 2Shreyas Mankeshwar(PNA)  [Seed – 2] Bt Sankalp Bandivdekar(KOL)11/7,11/8,11/6
Girls Under 13
RoundNamePlayerNameScore
Round – 2Naisha Rewaskar(PNA)  [Seed – 1] Bt Kavya Shejwal(STR)11/1,11/2,11/5
Round – 2Vedankita Patil(SOL) Bt Shravani Main(STR)9/11,11/9,11/7,11/7
Round – 2Ayaana Beddingwala(TST) Bt Spruha Gogate(THN)11/2,11/6,11/3
Round – 2Aarohee Chafekar(THN)  [Seed – 8] Bt Shrinika Umekar(PNA)11/2,11/5,11/7
Round – 2Arshia Rai(TST)  [Seed – 5] Bt Anika Nene(THN)11/6,11/3,14/12
Round – 2Samiksha Wagh(THN) Bt Vedika Jaiswal(TST)4/11,11/6,14/12,11/9
Round – 2Purvi Renu(NGP) Bt Dnyanashree Tarde(THN)11/5,11/2,11/7
Round – 2Myraa Sangelkar(TST)  [Seed – 4] Bt Avani Mane(KOL)11/9,11/3,11/13,11/4
Round – 2Aadya Baheti(PRB)  [Seed – 3] Bt Aarushi Naik(THN)9/11,11/6,11/5,11/2
Round – 2Sara Ramaiya(TST) Bt Owee Baheti(PRB)7/11,11/9,11/9,6/11,11/5
Round – 2Vidhii Kumre(NGP) Bt Adhvika Prabhune(THN)11/4,10/12,12/10,11/8
Round – 2Trissha Ludbe(TST)  [Seed – 6] Bt Palakh Jhawar(TST)11/9,11/6,11/7
Round – 2Prisha Daga(TST) Bt Spruha Borgaonkar(PNA)11/6,11/2,11/9
Round – 2Nirank Patil(THN) Bt Navya Shejwal(STR)3/11,6/11,11/7,11/5,11/5
Round – 2Sanvi Puranik(THN)  [Seed – 2] Bt Jinaya Vadhan(THN)11/3,11/6,11/7
Girls Under 15
RoundNamePlayerNameScore
Round – 3Divyanshi Bhowmick(TST)  [Seed – 1] Bt Prisha Daga(TST)11/2,11/3,11/2
Round – 3Annisha Patra(RGD)  [Seed – 16] Bt Anvi Karambelkar(THN) [Seed – 17]11/6,11/5,9/11,15/13
Round – 3Swara Karmarkar(NSK)  [Seed – 9] Bt Myraa Sangelkar(TST)11/7,9/11,11/5,11/3
Round – 3Kavya Bhatt(THN)  [Seed – 8] Bt Niva Chaughule(TST)11/6,10/12,11/7,11/4
Round – 3Anvi Gupte(THN)  [Seed – 5] Bt Sharwari Khobragade(NGP)11/2,11/5,11/3
Round – 3Sanvi Puranik(THN)  [Seed – 12] Bt Tanayaa Abhyankar(PNA)11/7,11/8,11/2
Round – 3Sukrati Sharma(THN)  [Seed – 13] Bt Sara Ramaiya(TST)11/5,11/6,11/3
Round – 3Riana Bhoota(THN)  [Seed – 4] Bt Samiksha Wagh(THN)11/5,11/3,11/5
Round – 3Hrithika Madhur(THN)  [Seed – 3] Bt Tanvi Chukkal(TST)11/4,11/9,12/10
Round – 3Anannya Joshi(KOL)  [Seed – 19] Bt Varsha Parulekar(SND)11/4,11/0,11/4
Round – 3Saee Kulkarni(PNA)  [Seed – 11] Bt Trissha Ludbe(TST)11/9,12/10,9/11,11/8
Round – 3Vaishnavi Jaiswal(TST)  [Seed – 6] Bt Anushka Kothari(BID)11/2,11/4,11/4
Round – 3Ruchita Darvatkar(PNA)  [Seed – 7] Bt Saanvika Bauva(THN)11/1,11/6,11/4
Round – 3Ayaana Beddingwala(TST) Bt Swarada Sane(JAL)11/7,7/11,8/11,11/4,12/10
Round – 3Anvi Thorat(THN)  [Seed – 15] Bt Anvaya Ranade(THN)11/6,11/6,11/2
Round – 3Ikshika Umate(NGP)  [Seed – 2] Bt Palak Jeswani(PNA)11/5,11/7,11/5
Boys Under 15
RoundNamePlayerNameScore
Round – 3Pratiyush Bauva(THN)  [Seed – 1] Bt Aarya Panchal(TST)6/11,11/7,11/6,11/3
Round – 3Vivaan Thakkar(TST) Bt Akanksh Sahoo(TST)11/4,11/9,11/8
Round – 3Ashwin Kumaraguru(PNA) Bt Shreyas Mankeshwar(PNA) [Seed – 9]11/13,11/9,8/11,11/5,11/6
Round – 3Kaustubh Girgaonkar(PNA)  [Seed – 7] Bt Rishit Bansal(PNA)11/3,11/4,9/11,11/9
Round – 3Kush Patil(THN)  [Seed – 6] Bt Yash Bhandari(NSK)11/3,11/4,8/11,11/7
Round – 3Vivek Rohera(TST) Bt Samyak Jain(THN)12/10,11/2,11/5
Round – 3Param Bhiwandkar(TST) Bt Sahil Mohite(MCD)12/10,11/6,11/3
Round – 3Aditya Samant(PNA) Bt Mrithey Kalamkar(KOL)1/11,11/9,14/12,11/9
Round – 3Shouren Soman(PNA)  [Seed – 3] Bt Rishaan Kanani(TST)11/9,11/3,11/4
Round – 3Zihan Beddingwala(TST) Bt Ekansh Madane(THN)11/6,11/8,11/4
Round – 3Ishaan Mane(KOL) Bt Swaroop Bhadalkar(PNA)12/10,10/12,11/9,9/11,11/6
Round – 3Dhruv Vasaikar(THN)  [Seed – 5] Bt Arnav Wagh(MCD)11/4,11/4,11/3
Round – 3Yashwin Gade(THN) Bt Neel Navare(PNA)11/8,11/7,11/7
Round – 3Johan Cheliparmbil(THN)  [Seed – 8] Bt Arjun Kumaraguru(PNA)11/9,11/9,11/5
Round – 3Nilay Pattekar(THN) Bt Onkar Mule(SOL)11/2,11/3,11/4

5 दिवस मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसांची शक्यता,मुंबईच्या समुद्रात भरतीचा इशारा, किनारपट्टीवर ४.१४ मीटर लाटा उसळण्याची शक्यता

हवामान विभागाने मुंबईला हायटाईडचा (भरती) इशारा दिला आहे,मुंबईच्या किनारपट्टीवर ४.१४ मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा इशारा,मुंबईत आज कमी पाऊस असल्याने मोठा फटका बसणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.आज उपनगरात काही प्रमाणात पाऊस आहेतर नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबई : महाराष्ट्राला आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून पुढच्या २४ तासांत राज्यातील महत्त्वाच्या शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी सकाळपासूनच सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अशात आज ५ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई IMD ने जारी केलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या ५ जिल्ह्यांना आज २४ तासांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

अलिबाग,दि.22 :- इरशाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी. या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

इरशाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नढळ गावात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी जाऊन भेट देत उपलबद्ध सुविधांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने व संवेदनशीलतेने तात्काळ भेट दिली होती. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन विधान सभेमध्ये केले होते व प्रत्येक मृत व जखमी कुटुंबाला शासनाची सर्वोतोपरी मदत जाहिर केली होती.  विधानभवनात माझी भेट घेऊन सविस्तर माहिती ही दिली होती. या भेटी वेळी त्यांनी आपादग्रस्त लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याबाबत या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचेही सांगितले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या दरम्यान त्यांनी दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्रित येऊन दहा दहा लोकांचा समूह करून त्यातील एक जणाने सर्व आपादग्रस्त लोकांची जबाबदारी घ्यावी आणि काय वस्तू लागणार आहे त्याची यादी करावी व ती आम्हाला कळवावी. जेणेकरून आपण एक कुटुंब असल्यासारखं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो.  कोणत्याही व्यक्तीसोबत गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार मनिषा कायंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, तहसिलदार आयुब तांबोळी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, अप्पर तहसिलदार पूनम कदम, नगरसेविका शीतल म्हात्रे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलमताई जोशी, मंगेश चिवटे उपस्थित होते.

यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केयर सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ २६ जुलै रोजी खुला होणार

  • प्राईस बँड प्रति इक्विटी शेयर २८५ ते ३०० रुपये निश्चित करण्यात आला आहे.
  • आयपीओसाठी बोलीची सुरुवात २६ जुलै २०२३ रोजी होईल व शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी ऑफर समाप्त होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर मंगळवार २५ जुलै २०२३ रोजी खुली होईल.
  • कमीत कमी ५० इक्विटी शेयर्ससाठी व त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ५० च्या पटीत बोली लावता येईल.

पुणे-:  यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केयर सर्व्हिसेस लिमिटेडने (कंपनी) आपला आयपीओ बुधवार २६ जुलै २०२३ रोजी खुला करण्याचे ठरवले आहेयामध्ये प्रत्येक इक्विटी शेयरचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे. आयपीओमध्ये ४९०० मिलियन रुपयांचे इक्विटी शेयर्स नव्याने जारी करण्यात आलेले (फ्रेश इश्यू) असतीलतसेच ६५५१६९० इक्विटी शेयर्स (ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्यू व ऑफर ऑफ सेल यांना एकत्रितपणे ऑफर असे संबोधण्यात आले आहे) विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून विक्रीसाठी प्रस्तुत करण्यातय येणार आहेत. अँकर गुंतवणूकदार मंगळवार २५ जुलै २०२३ रोजी बोली लावू शकतील. बुधवार २६ जुलै २०२३ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होणारी असलेली ऑफर शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी बंद होईल.

प्राईस बँड प्रति इक्विटी शेयर २८५ ते ३०० रुपये निश्चित करण्यात आला आहे.  कमीत कमी ५० इक्विटी शेयर्ससाठी व त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ५० च्या पटीत बोली लावता येईल.

फ्रेश इश्यूच्या निव्वळ विक्रीमधून जे फंड्स उभारले जातील त्यांचा वापर पुढीलप्रमाणे करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे – (१) कंपनीच्या काही कर्जांची परतफेड/मुदतपूर्व परतफेड१००० मिलियन रुपयांपर्यंत; (२) कंपनीच्या उपकंपन्या एकेएस मेडिकल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (एकेएस) आणि रामराजा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (रामराजा) यांनी घेतलेल्या काही कर्जांची परतफेड/मुदतपूर्व परतफेड – १४५० मिलियन रुपयांपर्यंत (३) नोयडा हॉस्पिटल व ग्रेटर नोयडा हॉस्पिटल या दोन रुग्णालयांसाठी कंपनीच्या भांडवली खर्चांना फंडिंग करणे – २५६.४४ मिलियन रुपयांपर्यंत (४) एकेएस आणि रामराजा या कंपनीच्या उपकंपन्यांकडून चालवल्या जात असलेलया हॉस्पिटलसाठी भांडवली खर्चांचे फंडिंग – १०६९.६६ मिलियन रुपयांपर्यंत (५) अधिग्रहण व इतर धोरणात्मक उपक्रमांमार्फत इनऑरगॅनिक वृद्धी उपक्रमांना फंडिंग – ६५० मिलियन रुपयांपर्यंत आणि (६) उरलेली रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी खर्च केली जाईल. 

विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या ऑफरमध्ये विमल त्यागी यांच्याकडून ३७४३००० पर्यंत इक्विटी शेयर्सप्रेम नारायण त्यागी यांच्याकडून २०२१२०० पर्यंत इक्विटी शेयर्स आणि नीना त्यागी यांच्याकडून ७८७४९० पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे. (या सर्वांना मिळून प्रमोटर ग्रुप सेलिंग शेयरहोल्डर्स असे संबोधण्यात आले आहे)

१८ जुलै २०२३ रोजी कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीजनॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अँड हरियाणा यांच्याकडे रेड हेररिंग प्रॉस्पेक्टस सादर केले असून त्यानुसार हे इक्विटी शेयर्स ऑफर केले जात आहेत.  हे इक्विटी शेयर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.  ऑफरसाठी बीएसई हे डेसिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज आहे.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम१९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार,  संशोधित (“एससीआरआर”)सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(१) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईलयासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.

नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी शेअर्स हे क्यूआयबीना वाटपासाठी उरलेल्या क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. या नेट ऑफरमधील कमीत कमी १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहेपण त्यासाठी अशा उप-विभागांपैकी एकातील सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग  नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सच्या इतर उप-विभागातील अर्जदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार वाटून दिला जाईल. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरपैकी कमीत कमी ३५% भाग हा सेबी आयसीडीआर नियमांनुसार रिटेल व्यक्तिगत बिडर्सना (“रिटेल पोर्शन”) सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे.

सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या  खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलवार माहितीसाठी आरएचपीचे पान क्रमांक ३८४ वर “ऑफर प्रोसिजर” वाचावे.

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स इन्टेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडऍम्बीट प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे आहेत.

मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या स्टार्टअप यंत्रणेला सक्षम करण्यासाठी – सिंपल पुढील २-३ वर्षांत ४००० उद्योजकांचा कंपनीच्या नेटवर्कमध्ये समावेश करणार

अत्याधुनिक चेकआउट नेटवर्क आणि या क्षेत्रात प्रथमच उपलब्ध करण्यात आलेल्या पेमेंट सुविधेच्या मदतीने राज्यातील डीटुसी ब्रँड्स व उद्योजकांना सक्षम करण्याचे ध्येय

पुणे२२ जुलै २०२३ – सिंपल या भारतातील आघाडीच्या चेकआउट नेटवर्कने आज महाराष्ट्रातील डायरेक्ट-टु-कस्टमर (डीटुसी) ब्रँडस ४००० उद्योजकांचा आपल्या नेटवर्कमध्ये समावेश करणार असल्याचे जाहीर केले. पुढील २ ते ३ वर्षांत कंपनीच्या फुल-स्टॅक चेकआउट नेटवर्कमध्ये हा समावेश केला जाणार आहे. या धोरणात्मक योजनेद्वारे राज्यातील वेगाने विस्तारत असलेल्या स्टाईट- अप यंत्रणेतील हजारो उद्योजकांना सक्षम करण्याचे ध्येय आहे. ऑनलाइन संवाद वाढवून आणि रिटर्न्सचे प्रमाण कमी करून हे साध्य करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.

महाराष्ट्र राज्यात काही वेगाने विकसित होत असलेल्या डीटुसी ब्रँड्स कार्यरत असून राज्यातर्फे त्यांना आपल्या कामात नाविन्य आणण्यासाठीआपल्या उद्योन्मुख व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत. सिंपलने या उद्योजकांना अत्याधुनिक चेकआउट- नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. या तंत्रज्ञानामध्ये या क्षेत्रात प्रथमच उपलब्ध करण्यात आलेल्या वन टॅप पेमेंट सुविधेचा समावेश आहे. राज्यातील काही उद्योग आणि डीटुसी उद्योजक उदा. नर्सरी लाइव्ह हा बागकाम क्षेत्रात कार्यरत असलेला भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्मआद्या हा चांदीचे अँटिक व हँडमेड दागिने बनवणारा ब्रँडफॅबाऊ हा व्हिगन स्किनकेयर ब्रँड ग्राहकांना जास्त चांगली सेवा देण्यासाठी सिंपलच्या चेकआउट नेटवर्कवर अवलंबून राहातात. म्हणूनच कंपनीने नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रातील अस्तित्व विस्तारण्याचे ठरवले आहे. हे उद्योजक वस्त्रप्रावरणेफुटवेयरकिराणा व गॉर्मेपर्सनल केयर आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांतील असतील.

या घडामोडीविषयी सिंपलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नित्या शर्मा म्हणाले, डीटुसी क्षेत्राचे सखोल आकलन आम्हाला आहे आणि त्याच्या मदतीने या उद्योगाला नाविन्यपूर्ण सुविधा देत त्यांना आपल्यासमोरच्या आव्हानावर मात करण्यासाठी मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अत्याधुनिक चेकआउट नेटवर्क आणि वन टॅप पे सारखी क्रांतीकारी सुविधा यांच्या मदतीने आम्ही संवाद वाढवण्याचे आणि कॅश-ऑन-डिलीव्हरी व रिटर्न्सचे प्रमाण कमी करून उद्योजकांचे काम सोयीस्कर करण्याचे ठरवले आहे. या दरम्यान त्यांना लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठीही मदत केली जाणार आहे. आमच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचे व उद्योजकतेच्या समृद्ध संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योजकांना पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातूनच पुढील २ ते ३ वर्षांत ४००० स्टार्ट- अप्सना ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाटी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

आज पुण्यात सिंपलच्या पहिल्या डीटुसी अनलॉक्डच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. ब्रँडच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात पुण्यातील प्रमुख डीटुसी उद्योजक सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्याच्या माध्यमातून ब्रँड उभारणी व विस्तार यावर चर्चा केली. या कार्यक्रमात शहरातील संस्थापकही सहभागी झाले होते व त्यात नंदू सिंगसंस्थापक – नर्सरी लाइव्ह, अनुष्का अय्यरविगल या बहुमाध्यमिक पेटकेयर ब्रँडच्या संस्थापकचांदीच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड आद्याच्या संस्थापक सायली मराठे यांचा समावेश होता.

विविध उद्योग आणि डीटुसी ब्रँड्ससह २६,००० उद्योजक तसेच देशभरात पसरलेले १० दशलक्ष युजर्स यांचा समावेश असलेले सिंपलचे नेटवर्क व प्लॅटफॉर्मला उद्योजक तसेच व्यापाऱ्यांची पसंती असते. संवाद वाढवण्यासाठी तसेच ऑनलाइन चेकआउट अनुभव सुरळीत होण्यासाठी ब्रँडला प्राधान्य दिले जाते.

भारतातील डीटुसी क्षेत्राने लक्षणीय विकास अनुभवला असून ग्राहक वेगाने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मकडे वळत आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाचाही लक्षणीय प्रभाव आहे. मोर्डो इंटेलिजन्सच्या अहवालानुसार डीटुसी क्षेत्र २०२२ ते २०२७ दरम्यान ३४.५ टक्के सीएजीआरने वाढेल असा अंदाज आहे. सिंपलने या क्रांतीकारक बदलाच्या आघाडीवर राहाण्याचे, बदल घडवून आणण्याचे आणि पुण्यातील डीटुसी उद्योजकांना सक्षम करत यश मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे.

कात्रजचे टोयाटो शोरुम रूम फोडून चोरट्यांनी साडेआठ लाखाची रोकड पळविली

पुणे- कात्रजचे टोयाटो शोरुम रूम फोडून चोरट्यांनी साडेआठ लाखाची रोकड पळविली . याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात योगेश पवार, वय ४० वर्षे, रा. गोकुळनगर कात्रज पुणे यांनी तक्रार नोंदविली आहे.
दि.२०/०७/२०२३ रोजी रात्री २०/३० ते दि. २१/०७/२०२३ रोजी ०९/३० वा दरम्यान हि घरफोडी घडली . सर्वे नंबर
३४/०७,३४/१४/१६ हिस्सा नं १६, कात्रज देहु बायपास रोड आंबेगाव कात्रज पुणे येथे असलेल्या शोरूमची खिडकीची स्लायडींगची काच कोणीतरी अज्ञात इसमांनी कशाचेतरी सहाय्याने उघडुन आत प्रवेश करुन कॅशिअर रुममधील रोख ८,४८,०००/- रु किं.चा ऐवज घरफोडी चोरी करून नेला. पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे मो.नं. ९६८९५९७११६
याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

भारती विदयापीठ व हडपसर परिसरातुन सव्वातीन लाखाचे अंमली पदार्थ पकडले, दोघांना अटक

पुणे- अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१, गुन्हे शाखा पुणे शहर,गुन्हे शाखेकडुन ३,२२,६५०/- रु किचे अंमली पदार्थ त्यामध्ये १५० ग्रॅम अफिम व ६३२ ग्रॅम गांजा असे अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करुन दोघांना भारती विदयापीठ व हडपसर परिसरातुन अटक केली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार,सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कर यांचे विरुध्द माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना दिले होते.त्याअनुशंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक २०/०७/२०२३ रोजी पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार, प्रविण उत्तेकर व संदिप शिर्के यांना माहिती मिळाली की, मांजरी गुंढवा रोडवरील सर्व्हे नंबर १५६ / ६, साई कॉर्नर, गवळी वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे येथील सार्वजनिक रोडवर एक महिला गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने, त्याबाबत कायदेशिर सोपस्कार पार करुन छापा कारवाई केली असता, सदर महिला ही तिचे ताब्यात १२,६५० /- किचा ६३२ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना मिळुन आली असुन, तीचेविरुध्द हडपसर पो स्टे येथे गुरनं. १०६७/२०२३,एन डी पी एस अॅक्ट ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
तसेच दि. २१/०७/२०२३ रोजी भारती विदयापीठ पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार,पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना माहिती मिळाली की, भारती विहार सोसायटी गेट समोरील सार्वजनिक रोडवर, भारती विद्यापीठ पुणे येथे इसम नामे वीरमाराम कोजाराम विश्नोई हा अफिम हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे. त्याबाबत कायदेशिर सोपस्कार पार करुन छापा कारवाई केली असता, इसम नामे वीरमाराम कोजाराम विश्नोई, वय – ३० वर्षे, रा. नरेश चौहान यांचे रुममध्ये, गल्ली नं. ३ टिळेकरनगर, कोंढवा, पुणे मुळ रा. विश्नोईयोंकी ढाणी, शोभाला जैतमाल, ता. घोरीमन्ना, जि. बाडमेर राज्य राजस्थान याचे ताब्यात ३,१०,००० /- रु किचा ऐवज त्यामध्ये १५० ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ ३,००,०००/- रु किचा, तसेच १०,०००/- रुकिंचा एक विवो कंपनीचा मोबाईल असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला. म्हणुन त्याचेविरुध्द भारती विदयापीठ पो स्टे गुरनं. ४८४/२०२३, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ), १७ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद प्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१ मार्फत मागील दोन दिवसात सातत्याने अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन एकुण ३,२२,६५०/- रु किचे अंमली पदार्थ, त्यामध्ये १५० ग्रॅम अफिम व ६३२ ग्रॅम गांजा व इतर ऐवज जप्त करुन एक इसम व एक महिला यांना भारती विदयापीठ व हडपसर परिसरान केले जेरबंद केले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी हीपोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे,सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – ०१, सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.

इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

अलिबाग,दि.22 :- इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे  दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नढळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांनी पालकत्व स्वीकारल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी आमदार मनीषा कायंदे, आमदार महेंद्र थोरवे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

या मुलांशी संवाद साधताना डॉ.गोऱ्हे यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले. काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याकरिता स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला. तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी मुलांना केली.

दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडी मध्ये एकूण 1 ते 18 वयापर्यंतचे 31 मुल- मुले असून त्यापैकी 21 जण आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने या इरशाळवाडी दुर्घटनेतील या अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारले आहे. ही मुले 18 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी संस्थेने घेतली असून त्यांच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही स्वयंसेवी आहे  खा.डॉ.शिंदे यांनी यावेळी दूरध्वनीद्वारे संबंधितांशी संवाद साधला. स्वतः मुख्यमंत्री  या संपूर्ण घटनेवर आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत मदत कार्य सुरू राहील, असा विश्वास यावेळी दुर्घटनाग्रस्त मुलांना देण्यात आला. तसेच मदत साहित्याचे वितरण करण्यात आले. आमदार मनीषा  कायंदे व स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना देखील यावेळी मुलांशी संवाद साधला.

राज्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेब यांनी यापूर्वी देखील 2020 साली महाड येथील तारीक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावलेल्या दोन लहान बालकांचे संपूर्णता पालकत्व स्वीकारले होते. तसेच 2021 साली पालघर येथे रोजगाराअभावी आत्महत्या केलेल्या कामगार दाम्पत्यांच्या 2 मुलांचे होते.

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांची व्हिएतनाम भेट

भारतीय नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे व्हिएतनामच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आज, 22 जुलै 2023 रोजी भारतीय नौदलातील कृपाण हे जहाज सेवामुक्तीनंतर व्हिएतनाममधील कॅम रॉन येथे व्हिएतनाम पीपल्स नेव्ही (VPN) कडे सुपूर्द केले जाणार असून, भारतीय नौदल प्रमुख या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

भारतीय नौदलाकडून व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे स्वदेशी बनावटीचे, क्षेपणास्त्र सज्ज जहाज आयएनएस कृपाणचे हस्तांतरण, हे समविचारी भागीदारांना त्यांची क्षमता आणि कार्यकुशलता वाढवण्यासाठी मदत करण्याची भारताची वचनबद्धता अधोरेखित करते. हे हस्तांतरण भारत सरकारच्या ‘ॲक्ट ईस्ट’ तसेच सागर (SAGAR) अर्थात ‘प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास‘ या धोरणांशी सुसंगत आहे. मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या एखाद्या राष्ट्राला भारताकडून संपूर्णपणे सक्रिय असणारी युद्धनौका भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

19 जून 2023 रोजी व्हिएतनामला पूर्णपणे सक्रिय असलेली क्षेपणास्त्र सज्ज युद्धनौका भेट देण्याच्या संरक्षणमंत्र्यांच्या घोषणेला अनुसरून, स्वदेशी बनावटीचे खुकरी-श्रेणीची ही आयएनएस कृपाण युद्धनौका व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे सुपूर्द केली जात आहे. या हस्तांतरणासाठी आयएनएस कृपाण भारतीय तिरंगा फडकवत 28 जुन 2023 रोजी भारतातून व्हिएतनामकडे रवाना झाली आणि 8 जुलै 2023 रोजी व्हिएतनाममधील कॅम रॉन येथे दाखल झाली.

अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे व्हिएतनाम पीपल्स नेव्हीच्या मुख्यालयात, सीआयएनसी व्हाइस ॲडमिरल तन तनहा नेगिम यांच्याशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. तसेच ते व्हिएतनामच्या संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत.

भारतीय नौदल प्रमुखांचा हा दौरा भारतीय नौदल आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही यांच्यातील उच्चस्तरीय द्विपक्षीय सहकार्याचे महत्व अधोरेखित करणारा असून भारताच्या क्षेत्रातील आसियानच्या मध्यवर्ती भूमिकेप्रति आदर व्यक्त करणारा आहे.

यवतमाळमध्ये 45 जण पुरात अडकले, हवाईदलाच्या Mi-17 हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्याला प्रारंभ

यवतमाळ

राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. विदर्भात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. यवतमाळमध्ये पावसाचा जोर वाढल्याने आनंदनगर तांडा येथे 45 जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तर, घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्यासाठी राज्य शासनाने हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरर्स मागवले. हवाईदलाच्या Mi-17 हेलिकॉप्टरने आता बचावकार्याला सुरूवात झाली आहे.संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार मुळे संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. या परिणामी बावनबीर, टूनकी गावांचा संपर्क तुटला असतानाच घरात पाणी घुसले आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून हजेरी लावली आहे.

पैनगंगा नदीला पूर

मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला आहे. पुराने परिसरात वेढा घातल्याने अनेक जण पाण्यात अडकलेत. महागाव तालुक्यातील आनंद नगर येथील नागरिक पुराच्या पण्यात अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

परिसराला नदीचे स्वरुप
नदीचे पाणी आनंद नदरमध्ये शिरल्याने संपूर्ण परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर कंबरेच्यावर पाणी साचले आहे. आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे वाहून गेली आहेत. बचाव पथक पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेची नोंद घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

महागाव तालुक्यातील हिवरा संगम गट ग्रामपंचायतमधील आनंद नगर येथे पाणी वाढत चालल्याने काही नागरिक बोटीवर बसलेत. या 45 जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता पुराच्या पाण्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नव्याने भर्ती झालेल्या तरुणांना पंतप्रधानांच्या हस्ते 70 हजाराहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर तसेच नागपूर येथे झालेल्या मेळाव्यांमध्ये राज्यातील तरुणांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

मुंबई 22 जुलै 2023

केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 70 हजाराहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित देखील केले. रोजगार मेळाव्यांच्या आयोजनाची ही सातवी फेरी आहे.

देशभरात 44 ठिकाणी आज अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून तेथे उपस्थित केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरांमध्ये हे मेळावे आयोजित करण्यात आले.

मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात आज झालेल्या  रोजगार मेळाव्यात केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 25 तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली तर विभाग प्रमुखांच्या हस्ते 74 तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. 267 उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली. मुंबईतल्या सीमा  शुल्क विभाग, सीजीएसटी विभाग, केंद्रीय जल आयोग, ईपीएफओ, नौदल, भारतीय टपाल विभाग, बँक ऑफ इंडिया तसेच भारतीय अन्न महामंडळ यांमध्ये देशभरातील विविध राज्यांतून निवडण्यात आलेल्या 342 उमेदवारांना  सामावून घेण्यात आले. यावेळी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला जनतेचा प्रधान सेवक असे संबोधत देशसेवेचे कार्य करत तुम्हाला देखील देशसेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे असे केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. 140  कोटी लोकसंख्येच्या या देशात नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणे हा तुम्ही तुमचा सन्मान समजला पाहिजे असे त्यांनी नवनियुक्त तरुणांना सांगितले. तुम्हां सर्वांना मिळालेली ही संधी केवळ गणवेषापुरती मर्यादित नसून व्यक्तिगत तसेच सामुहिक आकांक्षांचा आविष्कार करणारी ही एक सेवा आहे असे त्या म्हणाल्या. आज तुमच्यापैकी प्रत्येकजण हा संविधानाला जबाबदार असलेला प्रतिनिधी आहे आणि तुम्ही लोकशाही आणि प्रशासन यांच्याप्रती सामान्य लोकांचा आशावाद जिवंत ठेवावा ही अतिरिक्त जबाबदारी घटनेने आज तुमच्यावर टाकली आहे असे यावेळी नियुक्तीपत्रे मिळालेल्या तरुणांना उद्देशून त्या म्हणाल्या. सीमा शुल्क विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त प्रमोदकुमार अग्रवाल आणि प्रधान आयुक्त सुनील जैन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

मुंबईमध्ये, मुंबई शेअर बाजार येथे आयोजित करण्यात आलेल्या आणखी एका रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की आता देशात पारदर्शकतेला आणि उत्तम प्रशासनाला महत्त्व देणारे सरकार आहे, अशा वेळी सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांना देश उभारणीची मोठी संधी मिळालेली आहे. आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून टपाल विभागात 68 हजारांहून अधिक तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी प्रधान मुख्य आयकर आयुक्त गीता रविचंद्रन यांनी देखील उपस्थित उमेदवारांना संबोधित केले. आगामी 25 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत निर्माणाचे स्वप्न साकार करण्यात या सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे त्या म्हणाल्या.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय विकास प्रबोधिनी अर्थात यशदा येथे आज पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एकंदर 198 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. हे उमेदवार केंद्रीय सीमाशुल्क, वस्तू आणि सेवा कर, सीमा रस्ते, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, बँका, टपाल, संरक्षण मंत्रालय, इत्यादी विविध विभागांमध्ये रुजू होणार आहेत. भारताच्या सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचे आवाहन यावेळी डॉ. भारती पवार यानी उपस्थित तरुणांना केले. जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक वातावरणात मिळालेल्या या सरकारी नोकरीचा उपयोग केवळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी न करता आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि अखेरीस देशासाठी कसा करता येईल यादृष्टीने विचार करून कर्तव्य बजावण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले. नोकरी करताना देखील शिकण्याची जिद्द कायम ठेवून आणि आपल्यातील संशोधनाची वृत्ती जागरूक ठेवून बदलत्या भारताच्या विकास प्रक्रियेत आपले मोलाचे योगदान देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत केली. याप्रसंगी उपस्थित उमेदवारांना संबोधित करताना ते म्हणाले की युवकांनी शासकीय सेवा बजावताना पारदर्शकता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, कालबद्ध निर्णय प्रक्रिया या गोष्टी लक्षात ठेवाव्या. नागपूर येथील धरमपेठच्या  वनामती सभागृहात झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. केंद्र सरकारमध्ये लालफितीच्या जाळ्यात अडकलेल्या पदभरती प्रक्रियेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विभागांनी मुक्त करून प्रलंबित भर्तीचे काम युद्ध स्तरावर पूर्ण करण्याचे ठरवले आहे, असे गडकरींनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी नगर येथील आयसीएआय भवन येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केंद्रीय  रेल्वे, कोळसा आणि खाण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते 25 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण 125 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. आयकर विभागाच्या नाशिक विभागाचे मुख्य आयुक्त राहुल करणा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

”मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

पुणे-स्त्रीला “देवी “म्हणून पुजा करणाऱ्या आपल्या भारत देशात सुमारे ७० दिवसांपासून मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. देशाची राजसत्ता उपभोगत जगभर डंका पिटनारे मोदी सरकार मात्र हातावर हात ठेऊन बसले आहे.

भारतात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत त्यांच्यावर सतत अत्याचार व जीवघेणे हल्ले होत आहेत. ज्या लोकांचा मतांवर आपण सत्ता उपभोगत आहात, ज्यांच्या टॅक्सच्या पैश्यावर हा देश चालतो, त्या लोकांची जर आपण रक्षा करू शकलो नाही, तर हे आपण चालवत असलेल्या शासनाचे अपयश आहे, अशा प्रकारे शासन करणाऱ्या चालविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.
या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप,काकासाहेब चव्हाण, डॉ.सुनील जगताप, मृणालिनीताई वाणी,सुषमा सातपुते,शिल्पाताई भोसले, किशोर कांबळे,विक्रम जाधव,उदयजी महाले, आप्पासाहेब जाधव,गणेश नलावडे,अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,फहीम शेख,मंगेश मोरे,हेमंत बधे,सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी पूर्णत: मोफत पीक विमा, डिजिटल पत्रकार संघटनेचा उपक्रम

बार्शी – यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. आता, बार्शी तालुका डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी मोफत पीक विमा नोंदणी करून देण्यात येत आहे. संघटनेच्यावतीने रविवारी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शी तालुका कृषि अधिकारी एस.एस.कोयले, आगळगावच्या सरपंच पुतळा गरड, उपसरपंच आणि संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी असणार आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार केवळ १ रुपयांत शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल. मात्र, पोर्टलवर भरणा करताना त्यांच्याकडून कॉम्प्युटर फी म्हणून १०० ते २०० रुपये घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच, पीक विमा भरण्याची मुदतही संपुष्टात येत आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्दर्शनानुसार बार्शीतील आगळगाव या गावी रविवार २३ जुलै रोजी पीक विम्यासाठी मोफत नोंदणी कॅम्पचे आयोजन केले आहे. त्यात, केवळ कागदपत्रांची पूर्तता (७/12, ८ अ, बँक पासबुक व आधारकार्ड) करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्णत: मोफत केली जाणार आहे. याकामी, बार्शी तालुका कृषी विभागाचीही मदत मिळणार असल्याचे संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष दिनेश मेटकरी यांनी सांगितले.

दरम्यान, आगळगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोफत पीक विमा कॅम्प आणि पीक विमा भरण्यासंदर्भातील अडचणींची माहिती मिळणार आहे. त्यासाठी, आगळगाव व आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शिबिराच्या माध्यमातून नोंदणी करावी, असे आवाहनही संघटनेच्यावतीने मेटकरी यांनी केले आहे.

गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के मतदार नोंदणीसाठी सदस्यांनी पुढे यावे-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. २२: निवडणूक प्रक्रियेविषयी असणारी उदासीनता दूर करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांनी सहकार्य करावे आणि पुणे जिल्हा मतदान प्रक्रिया व हक्कांबद्दल जागरूक आहे हे दाखवून द्यावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्तव्यभावनेने सुटीच्या दिवशी आपल्याकडे मतदार नोंदणीसाठी येत असताना त्यांना प्रतिसाद देऊन १०० टक्के मतदार नोंदणी करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

हिंजवडी येथील ब्लू रिज गृहनिर्माण संस्था येथे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे आयोजित ‘गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियाना’च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार रणजित भोसले, ब्लू रिज गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन राजेंद्र कुमार, सचिव पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे म्हणाले, देश जेव्हा प्रतिकूल परिस्थितीतून किंवा वेगळ्या स्थित्यंतरातून जात असताना मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. लोकशाही प्रक्रियेत सर्वसमावेशकता आणि मतदारांचा सहभाग असल्यास लोकशाही यशस्वी ठरते. त्यासाठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आवश्यक आहे. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात असताना केवळ १३ टक्के युवा मतदारांची नोंदणी झाली आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

मतदारांनी निवडणूक आयोगाचे ॲप आणि संकेतस्थळाचा वापर करून मतदार यादीतील नाव तपासून घ्यावे. २१ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत नागरिकांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हा निवडणूक प्रक्रियेचा कणा आहे त्यांच्या प्रयत्नांना गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांनी साथ द्यावी आणि राज्य व देशाला मार्गदर्शक काम पुणे जिल्ह्याने करून दाखवावे, असेही आवाहन त्यांनी केले.

भारतातील पहिली निवडणूक १९५२ मध्ये घेण्यात आली. त्यावेळी देशात ही लोकशाही पद्धत टिकणार नाही असे भाकीत करण्यात आले. मात्र हे खोटे ठरवत भारतीय नागरिकांनी एकत्रितपणे निवडणूक प्रक्रिया यशस्वी करून दाखवली. देशातील लोकशाही प्रक्रियेच्या यशस्वी प्रवासावर आधारित ५ भागांची निवडणूक प्रक्रियेचे यश सांगणारी मालिका लवकरच दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे, असेही श्री.देशपांडे म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, भारतीय लोकशाही बळकट करण्यात भारत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सुधारणा केल्या आहेत. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासोबत आता सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यावर तसेच निवडणुका मतदारांच्यादृष्टीने सुविधाजनक होतील यावर भर देण्यात येत आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठ्या संख्येने युवा मतदारांना अद्याप नोंदणी करण्याची संधी आहे. निवडणूक प्रक्रियेत सुशिक्षित नागरिकांची भूमिका मार्गदर्शक असावी आणि त्यांनी मतदान प्रक्रियेत पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने मतदार नोंदणीकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे सचिव श्री.पाटील यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.कचरे यांनी केले. मतदार नोंदणीसाठी ब्लु रिज सोसायटीने चांगले सहकार्य केल्याचे सांगून त्यांनी नागरिकांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात छायाचित्र मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आणि मतदार नोंदणी अर्ज स्वीकारून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाभरातील १ हजार १६८ गृहनिर्माण संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोथरुडच्या जिगरबाज पोलिसांचा सत्कार

कोथरुड पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचा पुणेकरांना अभिमान!

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोद्गार

पुणे- काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वातील सर्व टीमचा विशेष सत्कार करुन अभिनंदन केले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून फरार म्हणून घोषित केलेल्या दोन दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे पकडण्यात यश आले. या कारवाईत पोलिस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नजन यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, पोलीस अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शिरकाल यांनी अतिशय शिताफीने दोघांना पकडले.

कोथरुड पोलिसांच्या या कारवाईचे संपूर्ण देशभरातून कौतुक होत असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान करुन, त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी भाजपा नेते शैलेश टिळक, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी हे देखील उपस्थित होते.