Home Blog Page 1091

निवेदिता आणि यशोधन यांच्या लग्नसोहळ्यात मोठा ट्विस्ट.

सोनी मराठी एक नवी मालिका, ‘निवेदिता, माझी ताई!’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली. ही गोष्ट एका अशा नात्याची आहे जी घराघरांत घडते.. एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं… एक असं निरपेक्ष नातं, जे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं… ते नातं म्हणजे… बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातं. बहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर आधारित अशी गोष्ट म्हणजे ही संपूर्ण मालिका आहे. असीम आणि निवेदिता यांची ही प्रेमळ गोष्ट प्रेक्षकांना विशेष आवडते आहे. पण मालिकेत एक रंजक वळण आलं आहे. ते म्हणजे निवेदिताचं लग्न. निवेदिताचं लग्न झाल्यावर ती असीमपासून दुरावली जाणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण निवेदिताचं लग्न मकरंदसोबत ठरलं आहे. मकरंदला निवेदितासोबत लग्न करायचं आहे, पण तो सायको असल्याचं यशोधनला समजतं. यशोधन पुरावे जमा करतो आणि निवेदिता आणि मकरंद यांच्या लग्नात येऊन मकरंदचं पितळ उघडं पाडतो..

             ऐन लग्नात धमाल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. निवेदिताचं लग्न कसं‌ पार पडणार, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मकरंदसोबतचं लग्न मोडून मकरंदचा प्लॅन हाणून पाडण्यात यशोधनला यश मिळेल का? त्याचं निवेदितावर असलेलं प्रेम यातून त्याला व्यक्त करता येईल का, हे आपल्याला पाहायला मिळेल. मकरंदने रचलेला प्लॅन अखेर निवेदिता आणि त्याच्या लग्नाच्या दिवसापर्यंत येऊन ठेपला आहे. पण त्याचं या आधीचं लग्न आणि त्याने आखलेला प्लॅन यांबाबत निवेदिता आणि तिच्या घरचे अजूनही अनभिज्ञ आहेत. यशोधन सगळे पुरावे जमा करून मकरंदचा प्लॅन भर लग्नात सगळ्यांसमोर उघड करेल, पण यामुळे निवेदिता आणि मकरंद यांचं लग्न मोडण्यात त्याला यश मिळेल का? यापुढे मोठा प्रश्न उभा राहणार आहे तो म्हणजे निवेदिताच्या लग्नाचा. यशोधन सगळ्यांसमोर आपलं प्रेम व्यक्त करून निवेदितासोबत लग्नाला उभा राहणार असून निवेदिता आणि यशोधन यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडणार आहे. पण या सगळ्यांत असीमची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उभा राहणार आहे. यशोधन असीमची जबाबदारी नक्की घेईल, असा निवेदिताचा समाज आहे.

सनी तिच्या होमग्रोन व्हेंचरद्वारे महिलांना कसे सक्षम करते याची अनोखी गोष्ट 

 सनी लिओनीने अभिनेत्री तर आहे पण तिने अनेक गोष्टी पुढे जाऊन भारतातील एक महिला उद्योजक म्हणून स्वतःची ओळख संपादन केली आहे. तिने ज्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे ते अधिक महिलांना सक्षम बनवत आहे. तिच्या अपवादात्मक उद्योजकीय प्रवासाने अनेकांना विशेषत: महिलांना भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक मदतीचा हात मिळाला आहे. 

 अभिनेत्रीने विविध उद्योगांमधील अनेक यशस्वी उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि काहींमध्ये ती एक पायनियर असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. 2018 मध्ये तिने ‘स्टारस्ट्रक बाय सनी लिओन’ या तिच्या जागतिक उद्योगाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. Affetto Fragrances नावाची परफ्यूमची यशस्वी ओळ देखील आहे ज्यात 24 SQU आहेत जे संपूर्ण भारतात 500 पेक्षा जास्त आउटलेटमध्ये विकले जाते. 

StarStruck हा भारतातील पहिला 100% सेलिब्रिटी मालकीचा आणि ऑपरेट केलेला कॉस्मेटिक ब्रँड आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, सनी लिओन गेल्या 10 वर्षांपासून जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड चेहऱ्यांपैकी एक आहे आणि सतत 6 वर्षांपासून सर्वाधिक डिजिटल शोधले जाणारे नाव आहे. 2018 मध्ये सुरू झालेले, StarStruck 260 पेक्षा जास्त SKU च्या मनाला चकित करणाऱ्या श्रेणीसह जागतिक स्तरावर विकसित झाले आहे.

 एक ब्रँड, जो प्रत्येकासाठी लक्झरी निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला होता, त्याच्या मूळ विचारधारेसह वाढत आहे – जाणून घ्या आपण काय परिधान करता! वर्षानुवर्षे अभिनेत्रीने हे देखील व्यक्त केले आहे की तिला स्वयंपाकाची आवड कशी आहे आणि जगभरातील स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतात. 

तिच्या जेवणावरील प्रेमामुळे सनीला वेलनेस ब्रँड, राईज बार्समध्ये एक देवदूत गुंतवणूकदार बनवले आणि तिच्या पहिल्या रेस्टॉरंट ‘चिका लोका’ सह हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही तिने पाऊल टाकले. नोएडामधील तिच्या उद्घाटन रेस्टॉरंटचे भव्य लाँच हा एक ग्लॅमरस कार्यक्रम होता, महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेसह, Chica Loca लवकरच अधिक भारतीय शहरांमध्ये दिसेल. 

 बहुआयामी अभिनेत्रीने ब्रेकिंग ऍडव्हान्सद्वारे नेहमीच नाविन्याचे समर्थन केले आहे आणि तिची स्वतःची AI प्रतिकृती लॉन्च करून तिची डिजिटल उपस्थिती सुरक्षित केली आहे, ती भारतीय उद्योगातील पहिली अभिनेत्री बनली आहे जिची स्वतःची AI आवृत्ती आहे! सनी केवळ बिझनेस जगतच नाही तर रुपेरी पडद्यावरही राज्य करणार आहे. कामाच्या आघाडीवर, सनी ‘केनेडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. ती ‘कोटेशन गँग’मधून तमिळ सिनेमात पदार्पण करणार आहे, तर ती ‘ग्लॅम फेम’ची जजही करणार आहे. सनी सध्या स्प्लिट्सविलाचा नवीनतम सीझन होस्ट करताना दिसत आहे.

तमन्ना भाटिया हिच्या हॅपी डेज आणि पैया झाले पुन्हा रिलीज

 अभिनेत्री तमन्ना भाटियाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे आणि यावेळी तिने तिचा सर्वात लोकप्रिय तेलुगू चित्रपट ‘हॅपी डेज’ आणि तमिळ चित्रपट ‘पैया’ च्या पुन्हा रिलीजद्वारे हे सिद्ध केलं आहे. ज्याचे मूळ थिएटरमध्ये रिलीज झाले होते. 

2007 आणि 2010 मध्ये ‘पैया’ 11 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल झाला, तर ‘हॅपी डेज’ 19 एप्रिलला पुन्हा रिलीज होणार आहे. पॅन इंडिया स्टार ही एकमेव दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जिच्या दोन पुन्हा रिलीज झाल्या आहेत. ज्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

चित्रपट काळाच्या कसोटीवर कसे उभे राहिले आणि पडद्यावर तशाच प्रकारची जादू विणत राहिले हे व्यक्त करण्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडिया हँडलवर घेतले. अभिनेत्रीचा सिनेमॅटिक प्रवास तिच्या अष्टपैलुत्वाचा आणि तिच्या कलेबद्दलच्या समर्पणाचा पुरावा आहे. 
तिचे चित्रपट तिच्या चिरस्थायी आकर्षण आणि कालातीत आकर्षणाचा पुरावा म्हणून काम करतात. कामाच्या आघाडीवर, तमन्ना तिचा तेलगू चित्रपट ‘ओडेला 2’ च्या रिलीजची वाट पाहत आहे. ती बॉलिवूड चित्रपट ‘वेद’ आणि तमिळ चित्रपट ‘अरनमानाई 4’ मध्ये देखील दिसणार आहे.

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा- डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १६: आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आदी उपस्थित होते.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून ही बाब समाधानाची आहे, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, पुणे जिल्ह्यात संसाधनांची कमतरता नाही तसेच शेतकरीही प्रगतीशील आणि कल्पक आहेत त्यामुळे विभागाने कृषी विकासासाठी लघुकालीन आणि दीर्घकालीन कार्यवाहीकडे लक्ष द्यावे. बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण आणि त्यासाठी परिसंस्था निर्माण केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला चालना मिळणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत.

खत निर्मिती कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत बफर साठ्यासाठी त्यांना निश्चित करुन दिलेला पुरवठा करावा. खतांच्या वाहतुकीबाबत योग्य ते नियोजन करावे. युरिया खताच्या पुरवठ्याबाबत नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

खरीपातील सर्व पिकांच्या बियाणे उपलब्धतेबाबत आढावा घेऊन सोयाबीन लागवडीला चालना देताना घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला असून त्याचे मार्केट लिंकेज केल्यास शेतकरी बांबू लागवडीस पुढे येतील.

पारंपरिक दृष्टीकोनातून बाहेर येत फळबागांमध्ये सर्वसाधारण भागांमध्ये पेरु तसेच पुरंदर आदी भागांमध्ये सीताफळ, अंजीर जिथे शक्य तेथे ड्रॅगनफ्रुट लागवडीवर भर दिल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर होईल. कमी धोका घेत एक्झॉटिक भाजीपाल्याच्या लागवडीलाही चालना देता येईल. शेतकऱ्यांना शाश्वत पिके घेण्यास प्रोत्साहित करावे, असेही ते म्हणाले.

पुणे, मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळ असताना दर्जेदार कृषीमालाला मोठी मागणी आहे. कृषीमाल निर्यातीबरोबरच देशांतर्गत व जवळच्या मोठ्या बाजारपेठांसाठी दर्जेदार शेतमाल, फळे, भाजीपाला कृषीमाल पुरवल्यास त्याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल हे शेतकऱ्यांना पटवून दिले पाहिजे.

पीक कर्जवाटपात पुणे जिल्ह्याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली असून पुढेही अशीच कामगिरी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. नायकवडी यांनी भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीलसाठी व्हेजनेट आणि फ्रुटनेट सुविधेबाबत माहिती दिली. खते कंपन्यांनी विभागाच्या सूचनेनुसार आवश्यक तेथे खतांचा पुरवठा करावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. काचोळे यांनी सादरीकरणात सांगितले, जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३० हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ३६ हजार क्विंटलच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी आवंटनानुसार खताचा पुरवठा होत आहे. युरियाची होणारी मागणी पाहता शासनाने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यात खतांचा १० हजार ३३० मे. टन. संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार युरियाचा ९ हजार ४६० मे. टन आणि डीएपीचा ८७० मे. टनचा बफर साठा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीएम- किसान योजनेची ई-केवायसी, निविष्टा गुणवत्ता नियंत्रण, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, राष्ट्रीय कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, कृषीपंप वीजजोडणी, जिल्ह्यातील धरणप्रकल्पातील पाणीपरिस्थिती, अवेळी पाऊस आणि अन्य कारणामुळे मार्चअखेर झालेल्या नुकसानीचे पैसे वितरण, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून देण्यात आलेले अनुदान आदी माहिती देण्यात आली.

श्री. हिरेमठ यांनी आत्मा यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या शेतीशाळा, सेंद्रीय शेती प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.
0000

पुणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीवर भर द्या-डॉ.राजेंद्र भोसले

पुणे दि. १६: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत पुणे शहरातील मतदानाचे प्रमाण वाढविण्याससाठी पुणे महानगरपालिकेतर्फे मतदार जागृती अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेद्र भोसले यांनी दिले.

पुणे महानगरपालिका येथे मतदार जनजागृतीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, उप आयुक्त महेश पाटील, राजू नंदकर, राहुल जगताप, नितीन उदास, कर संकलन प्रमुख सुनील मते आदी उपस्थित होते.

बैठकीत पुणे शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुणे महानगपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. डॉ.भोसले म्हणाले, मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती देण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी 1 मे पासून प्रत्येक प्रभाग कार्यालयात ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ ही हेल्पलाईन सुरू करावी. हॉटेल, दुकाने व व्यापारी आस्थापनेतील कामगारांना मतदान करता यावे यासाठी त्यांना किमान दोन तास मतदानासाठी सुटी मिळेल याची खात्री करावी आणि त्यांना निवडणुकीविषयी माहिती द्यावी.

प्रभाग अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार जागृती करावी. या विभागाकडील वाहनांद्वारेदेखील मतदार जागृतीवर भर देण्यात यावा. मतदार जागृती उपक्रमात युवकांना सहभागी करून घेत पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावे. मतदान केंद्र परिसरात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. पीएमपीएमएलकडील बसेसवर आणि बस थांब्यावर मतदानाचे आवाहन करणारे आणि माहिती देणारे संदेश लावावेत.

आरोग्य विभागाने दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरचे सूक्ष्म नियोजन करावे. आकाशचिन्ह विभागाने 200 ठिकाणी मतदारजागृतीचे संदेश लावावे. बँकांनीदेखील आपल्याकडील मोकळ्या जागेत मतदार जागृतीचे संदेश लावावे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी खाजगी बसेस आणि उद्योगसंस्थांच्या बसेसच्या माध्यमातूनही जनजागृती करावी, असे निर्देश डॉ.भोसले यांनी दिले.

येत्या 5 मे रोजी कमी मतदान असलेल्या मतदान केंद्र परिसरात मोटर सायकल रॅलीद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील बचत गटाच्या सदस्यांद्वारे जनजागृती करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
0000

महाराष्ट्रातील 87 हून अधिक उमेदवार यशस्वी

केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, : केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम, देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी 81 वा क्रमांक पटकावला आहे.

एक नजर निकालावर

समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (190) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषेक प्रमोद टाले (२४९) समर्थ अविनाश शिंदे (२५५) मनीषा धारवे (२५७) शामल कल्याणराव भगत (२५८) आशिष विद्याधर उन्हाळे (२६७) शारदा गजानन मद्येश्वर (२८५) निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (२८७) समिक्षा म्हेत्रे (३०२) हर्षल भगवान घोगरे (३०८) वृषाली संतराम कांबळे (३१०) शुभम भगवान थिटे (३५९) अंकेत केशवराव जाधव (३९५) शुभम शरद बेहेरे (३९७) मंगेश पाराजी खिलारी (४१४) मयूर भारतसिंग गिरासे (४२२) अदिती संजय चौगुले (४३३) अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी (४३७) क्षितिज गुरभेले (४४१) अभिषेक डांगे (452) स्वाती मोहन राठोड (४९२) लोकेश मनोहर पाटील (४९६) सागर संजय भामरे (५२३) मानसी नानाभाऊ साकोरे (५३१) नेहा नंदकुमार पाटील (५३३) युगल कापसे (५३५) हर्षल राजेश महाजन (५३९) अपूर्व अमृत बालपांडे (५४६) शुभम सुरेश पवार (५६०) विक्रम जोशी (593) प्रियंका मोहिते (595) अविष्कार डेरले (604) केतन अशोक इंगोले (६१०) राजश्री शांताराम देशमुख (६२२) संस्कार निलाक्ष गुप्ता (६२९) सुमित तावरे (655) सुरेश लीलाधरराव बोरकर (६५८) अभिषेक अभय ओझर्डे (६६९) नम्रता घोरपडे (675) जिज्ञासा सहारे (681) श्रृति कोकाटे (685) अजय डोके(687) सूरज प्रभाकर निकम (706) श्वेता गाडे (711) अभिजित पखारे (720) कृणाल अहिरराव (732) हिमांशु टेभेंकर (738) सुमितकुमार धोत्रे (750) गौरी देवरे (759) प्रांजली खांडेकर (७६१) प्रितेश बाविस्कर (767) प्रशांत डांगळे (775) प्रतिक मंत्री (786) मयुरी माधवराव महल्ले (७९४) राहुल पाटील (804) सिध्दार्थ तागड (809) प्राजंली नवले (815) सिध्दार्थ बारवळ (823) ओमकार साबळे (844) प्रशांत सुरेश भोजने (८४९) प्रतिक बनसोडे (862) चिन्मय बनसोड (893) निखील चव्हाण (900) विश्वजीत होळकर (905) अक्षय लांबे (908) निलेश डाके (918) किशनकुमार जाधव (923) ऐश्वर्या दादाराव उके (९४३) स्नेहल वाघमारे (945) शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (९६३) गौरव हितेश टेंभुर्णीकर (९६६) मयांक खरे (९६८) शिवानी वासेकर (९७१) श्रावण अमरसिंह देशमुख (९७६) श्रुती उत्तम श्रोते (९८१) सुशीलकुमार सुनील शिंदे (९८९) आदित्य अनिल बामणे (१०१५)

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी – एप्रिल 2024 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –347, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 115, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 303, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 165, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 86 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 37 दिव्यांग उमेदवारांचा (16 ऑर्थोपेडिकली अपंग, 06 दृष्टीहीन, 05 श्रवणदोष आणि 10 एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 240 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 120, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 36, इतर मागास वर्ग -66, अनुसूचित जाती- 10, अनुसूचित जमाती – 04 उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण चार दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 73, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 17 इतर मागास वर्ग (ओबीसी) –49, अनुसूचित जाती (एससी) – 27, अनुसूचित जमाती (एसटी) 14 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – 37 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 16, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04, इतर मागास वर्ग (ओबीसी) – 10, अनुसूचित जाती (एससी) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 02 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 32, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 613 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 258, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 64 , इतर मागास प्रवर्गातून – 160, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 86 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –45 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 113 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 47, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 10 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 29, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -12 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 355 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.


मोदींनी जनतेला खोटी आमिषे दाखवून, फसवून निवडणुका जिंकल्या

पुणे: मोदींनी जनतेला गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करू,महागाई रोखू, रोजगार देऊ, भ्रष्टाचार हटविण्याची कामगिरी करू असे सांगून जनतेला खोटी आमिषे दाखवून, फसवून निवडणुका जिंकल्या आणि 10 वर्षे सत्ता काबीज केली. एका बाजूला ज्यांनी ज्या कुटुंबाने अनेक वर्षे स्वातंत्र्याआधी आणि नंतर देशाची सेवा केली असे गांधी, नेहरू या कुटुंबातील व्यक्तींच्या हातात सत्ता द्यायची आहे कि फसव्या आणि देशातल्या माणसा- माणसात, जाती-जातींमध्ये, धर्मा- धर्मामध्ये, भाषे-भाषेमध्ये एक प्रकारचा दुरावा आणि अंतर वाढवण्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे.याचा निर्णय आता मतदारांना घ्यायचा आहे असे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

बारामतीच्या इंदापूर येथे अप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपस्थितांना पवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले “आजचा दिवस इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये गेली अनेक वर्षे इंदापूर तालुक्यातील जनतेची सेवा ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने केली आणि ज्यांचा सहकारी संस्थेमध्ये अतिशय चांगला लौकिक आहे, असे आपल्या भागातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब जगदाळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर शंकररावजी पाटील, सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शेठ शहा, ज्यांचे घर गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला अतिशय परिचित आहे त्याचबरोबर निरा भीमा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, त्याचबरोबर कृषी बाजार समिती इंदापूर याचे चेअरमन विलासराव माने, प्रतापराव पालवे, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्यांची या ठिकाणी भाषणे झाली ते सगळे सहकारी येथे उपस्थित आहेत. सबंध देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत. देशाची सत्ता ही कोणाच्या हातामध्ये द्यायची? हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. एका बाजूला ज्यांनी ज्या कुटुंबाने अनेक वर्षे स्वातंत्र्याआधी आणि नंतर देशाची सेवा केली असे गांधी, नेहरू या कुटुंबातील व्यक्तींच्या हातात सत्ता द्यायची आहे कि तर देशातल्या माणसा- माणसात, जाती-जातींमध्ये, धर्मा- धर्मामध्ये, भाषे-भाषेमध्ये एक प्रकारचा दुरावा आणि अंतर वाढवण्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे.

पवार पुढे म्हणाले, मी अनेक राज्यांमध्ये हिंडत असतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असतो. मी बघतोय की यावेळी लोकांशी मनस्थिती ही एका वेगळ्या दिशेने आहे. काल मी साताऱ्याला होतो. शशिकांत शिंदे एक कामगार नेता, माथाडी कामगारांच्यात काम करणारा त्याचा फॉर्म भरायचा होता आणि मी बघितलं मी की पंधरा ते वीस हजार लोक भर उन्हामध्ये रस्त्याने चालत होते आणि या तरुणाच्या पाठीमागे त्यांनी आपली शक्ती उभी केली. ही स्थिती महाराष्ट्रात सगळीकडे आहे, त्याचे कारण हे आहे की, लोकांना आता लक्षात आलं आहे की या देशाची सत्ता आता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही. मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी बारामतीला एकदा येऊन भाषण केलं, त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो. मोठी गमतीची गोष्ट आहे, देशाचा प्रधानमंत्री माझे बोट धरून येतो, कसा विश्वास ठेवायचा? अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, अनेक आश्वासने दिली. आज ते सांगतात ज्याचा उल्लेख एका वक्त्याने भाषणात केला की शेतकऱ्यांच्या खिशात ६ हजार रुपये मी टाकले. एका बाजूला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशात टाकायचे, दुसऱ्या बाजूला खतांचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे, विजेचे दर वाढवायचे, दुसऱ्या बाजूला ती रक्कम काढून घ्यायची.

तुम्ही या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आलात. तुम्ही मोटरसायकलवर आला असाल, कोणी चार चाकी गाडीने आलं असेल, कोणी दोस्ताच्या गाडीतून आलं असेल हा प्रवास ज्या वाहनांनी तुम्ही करता, त्याला पेट्रोल लागतं. मोदी साहेबांनी २०१४ ला सत्तेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा दर आज ७१ रुपये लिटर आहे, २०१४ ला. ५० दिवसांमध्ये मी याचा दर ५० टक्क्यांनी कमी करतो. लोकांना वाटलं चांगलं आहे, आजचा पेट्रोलचा दर तो जो होता तो ५० दिवसात हे कमी करतात. आज काय झालं आहे? २०१४ ला मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव ५० टक्के कमी करतो त्याला आज ३ हजार ६५० दिवस झाले. ३ हजार ६५० दिवसांपूर्वी मोदींचे हे आश्वासन होते, झाले का ५० टक्के भाव? आज पेट्रोलचा भाव काय आहे १०६. म्हणजे ते आणणार होते ५० टक्के कमी तर त्याचा भाव किती वाढलेला आहे.

आमच्या आया बहिणी इथे बसल्या आहेत, स्वयंपाक करायला गॅसचा सिलेंडर वापरतात. २०१४ ला मोदींनी सत्ता हातात घेतली तेव्हा सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती. आज किती आहे? आज १ हजार १६० झाली. ४१० वरून १ हजार १६० सिलेंडरची किंमत कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? मोदींनी सांगितलं २०१४ ला या देशातील बेकारी आम्ही घालवणार आणि त्यासाठी दरवर्षी २ कोटी मुलांना रोजंदारी देणार असं आश्वासन दिलं. आज काय दिसतंय, आज हिंदुस्थानामध्ये जे एकंदर तरुण आहेत, बेकार आहेत, त्या शंभरातल्या बेकार तरुणांपैकी ८७ तरुणांना आज नोकरी नाही. आज अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये काळा पैसा आणि नोटबंदी मी करणार.२०१६ रोजी ८ नोव्हेंबरला एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं, ते धोरण काय होतं? नोटबंदी. १०० रुपये, ५०० रुपये आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्या आणि सांगितलं की काळा पैसा संपेल. नुसता काळा पैसा संपणार नाही तर गरिबांच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी १५ लाख रुपये जमा करणार. घडलं काय? १५ लाख सोडा, पण १५ रुपये सुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये पडलेले नाही. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की मला सत्ता द्या, मी भ्रष्टाचार संपवतो. आज देशामध्ये झालंय काय? जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जवळ घेतात, मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात. आज मोदींचे सरकार भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झालंय. जसा सदरा क्लिनिंग मशीन मध्ये टाकतात मळका आणि तो बाहेर येतो तसं भ्रष्टाचारी, त्याला या क्लिनिंग मशीन मध्ये टाकला आणि बाहेर काढला आणि सांगितलं आता स्वच्छ झाला. भ्रष्टाचार नाही संपला मग केलं काय यांनी?

पवार म्हणाले,मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी अप्पासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय महत्त्वाचा निकाल घेतला. मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. एक विधायक काम करणारा नेता आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काही मागितलं नाही, पद मागितलं नाही. त्यांनी एकच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी पडल्यानंतर कमी किमतीमध्ये आरोग्य सेवा ही मिळावी आणि ती मिळण्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल काढत असाल तर त्यासाठी दोन एकर जमीन मी स्वतःची द्यायला तयार आहे. हे आज या ठिकाणी त्यांनी सांगितलं. याचा अर्थ हा आहे की आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते जनतेची सेवा करण्यासाठी येतात, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला झळ द्यायची ही सुद्धा त्यांची तयारी आहे. आज इंदापूर मध्ये दोन अडीच एकर जमीन घ्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. एवढं समाजासाठी काम करू पाहणारा नेता आज या ठिकाणी आला आहे, तुम्ही आणि मी त्यांचे सन्मानाने या ठिकाणी स्वागत केले पाहिजे. मी एवढेच सांगू इच्छितो.

आम्ही लोकांनी निकाल घेतला आहे, आतापर्यंत आम्ही लक्ष देत नव्हतो. मारामारी नको, मतभेद नको ही भूमिका होती. आता हे ठरवलंय की जसं बारामती असेल, महाराष्ट्राची अनेक मोठी गाव असतील तिथे अनेक कार्यक्रम आम्ही राबवली, अनेक धोरण राबवली, अनेक संस्था उभ्या केल्या. हाच दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा आहे. इथे काही लोकांना मदत केली. हल्लीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने एका माणसाला तिकीट दिलं, त्याला निवडून आणलं, त्याला मंत्री केलं. अपेक्षा ही होती की सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा वापर इंदापूर तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या आणि तरुणांच्या हितासाठी ते वापरतील, पण हे काम त्यांनी केले नाही. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो त्यांच्या योजना आणि त्यांचा लाभ हा व्यक्तीश: कसा घेता येईल? असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि याच्याबद्दलची नाराजी आज इंदापूरकरांच्या मनात आहे. ते दुरुस्त करायचं असेल तर या लोकांना त्यांचे स्थान दाखवले पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे.

आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी ३ वेळेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं. देशामध्ये जे एकंदर खासदार आहेत, त्या खासदारांमध्ये पहिले २ खासदार जे नित्याने हजर असतात, संसदीय चर्चेमध्ये भाग घेतात, लोकांच्या प्रश्नांची मांडणी करतात, त्या पहिल्या ३ आणि ३ मध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव हा संबंध हिंदुस्थानामध्ये आहे आणि म्हणून देशाचे काम ते करतात. कशाचीही अपेक्षा करत नाही, कसलाही डाग विरोधकांनी सुद्धा कधी अंगावर टाकला नाही असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा आज निवडणुकीच्या रूपाने तुम्हा सर्वांसमोर उभी आहे. या वेळेला त्यांची खूण बदलली त्यांची खूण आज तुतारीची आहे. माझी खात्री आहे की हा तुतारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या कानात जाईल त्याच्यातून तो जागृत होईल, त्या जागृतीच्या जोरावर जे काही परिवर्तन करायचं आहे ते परिवर्तन तुमच्या पाठिंब्याने आपण नक्की करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि या सगळ्या कामाला अप्पासाहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सगळे सहकारी या सगळ्यांच्या मागे पूर्ण ताकतीने मी स्वतः उभा राहील ही खात्री या ठिकाणी देतो असे ते म्हणाले.

 ‘जप राम  ‘ नृत्य कार्यक्रमातून उलगडला प्रभू श्रीरामाचा जीवनप्रवास

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम 
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘जप राम  ‘ या  भरतनाट्यम नृत्य सादरीकरण  कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवार  दि.१६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी आयोजन   करण्यात आले होते. परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटरच्या  वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला.
भरतनाट्यम नर्तक डॉ.परिमल फडके यांच्या विद्यार्थिनी सई शेटये,दीप्ती डोळे,तितली घटक,सायली देवधर,विद्या धिडे,रेवती खराडे,नीती नायर,अनुष्का देव यांनी  नृत्य सादरीकरण केले.डॉ.परिमल फडके यांनी निवेदन केले.भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.भरतनाट्यम रचनांद्वारे रामायणातील काही महत्त्वाच्या घटनांना अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाची  सुरुवात एका अनवट रचनेने झाली. ज्यामध्ये कौसल्या छोट्या श्रीरामाच्या  नर्तनाचे अति सुंदर वर्णन करते . पुढच्या रचनेत सीतेची सखी स्वयंवराच्या आदल्या दिवशी रामाला भेटते आणि सीता  पहिल्या नजर भेटीत त्यांच्या प्रेमात पडली हे सत्य सांगते .रामाच्या विरहाचे उत्कट दर्शन वर्णम ह्या  रचनेत घडले . वाल्मिकी रामायणातील  राम विरहाचे सुंदर चित्रण या  रचनेत होते .  सीतेचे अपहरण झाल्याचे जटायूकडून कळते. हनुमान प्रभू रामाला भेटतात आणि सीतेला आश्वासनाचा संदेश  देऊन लंकेला भेट देतात.अरण्यकांडातील अशा काही महत्वपूर्ण प्रसंगांचा समावेश या  नृत्यरचनेत होता.हनुमानाच्या रामावरील भक्तीचा महिमा वर्णन करणाऱ्या रचनेने   प्रेक्षक भारावून  गेले.कार्यक्रमाची सांगता  आगळ्या वेगळ्या रचनेनी  झाली .’अन्न हेच राम, कृष्ण आणि विठ्ठल ‘ याचे रूप आहे आणि ह्या अन्नातून मिळणारी अद्वैताची चव खरा भक्त चाखतो , असा भावार्थ त्यातून रसिकांपुढे आला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०२ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा सत्कार केला.

नऱ्हे गावात सुनेत्रा पवार यांचं जल्लोषात स्वागत..

नऱ्हे, पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या.आज दिवसभर वडगाव बुद्रूक परिसरात भेटीगाठी व नागरीकांशी संवाद साधला.. त्यानंतर त्या नऱ्हे येथे आल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करत भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली.. या दरम्यान, ठिकठिकाणी त्यांचं जेसीबीतून हार घालत स्वागत करण्यात आलं.. तसेच फिक्स खासदार अशा आशयाचे फलकही लावल्याचं पहायला मिळालं..

बारामतीत आपण चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून येणार असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली आहे असेही त्या म्हणाल्या

दादांना आणि मला तुमची साथ हवी आहे. तुमची साथ असेल तर मी विकासकामे करू शकेल.तुमची साथ आवश्यक तुम्ही फक्त मला साथ देणं गरजेचं आहे, असे सुनेत्रा पवार यांनी आवाहन केले.

मतांसाठी प्रभू रामाचा गैरवापर करणाऱ्या भाजपाच्या नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा: अतुल लोंढे

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा.

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणारा निवडणूक आयोग भाजपावर का कारवाई करत नाही?

मुंबई, दि. १६ एप्रिल
भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

राज्य निवडणुक अधिकारी यांनी लिहलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून धार्मिक मतदारांचे ध्रुवीकरण करणारा आहे. भाजपाने या पोस्टर्सचा वापर काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला गेला आहे. भाजपा व नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुक आयागाने तात्काळ त्यांची उमेदवारी रद्द करणे आणि भाजपवर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी.
भारतीय जनता पक्षाचे सर्व नियम धुडकावत असताना निवडणुक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरची तपासणी केली पण भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणुक आयोगा दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा संतप्त सवालही लोंढे यांनी विचारला आहे.

खासदार बारणे यांच्या ‘हॅटट्रिक’चा खोपोलीतील महायुती कार्यकर्त्यांचा निर्धार

खोपोली, दि. 15 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज खोपोली शहरातील शिवसेना व भाजप कार्यालयांसह शहरातील विविध मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विक्रमी मताधिक्यसह खासदार बारणे यांच्या हॅटट्रिकचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला.

खासदार बारणे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोलीत मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. शिवसेना कार्यालयात शहर प्रमुख संदीप पाटील, समन्वयक राजू गायकवाड संघटक तात्या रिठे, माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल, महिला आघाडी प्रमुख प्रिया जाधव, उद्योग सेनेचे जिल्हाप्रमुख हरेश काळे, सल्लागार अरुण पाटील, युवा सेनेचे जिल्हा सचिव सिद्धांत शेलार, कार्याध्यक्ष अनिल मिंडे, उपशहर प्रमुख निखिल पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख मोहसीन शेख, कृष्णकांत विचारे, संपर्कप्रमुख प्रसाद वाडकर आधी पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाके वाजून खासदार बारणे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, इंदरशेठ खंडेलवाल, विजय तेंडुलकर, हेमंत नांदे, शोभाताई काटे, डॉ. बबनराव नागरगोजे, रामू पवार, सुनील नांदे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

खोपोलीतील आतिकभाई खोत यांच्या घरी मुस्लिम बांधवांनी खासदार बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी अशपाकभाई लोगडे, निजाम जळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार बारणे व आमदार थोरवे यांनी यावेळी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला.

माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, रामदास शेंडे तसेच इब्राहिम पाटील, यशवंत साबळे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आदींची खासदार बारणे यांनी भेट घेतली. सर्व ठिकाणी बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे – पुनीत बालन

‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’चे आयोजन

पुणे, ता. १६ – मतदाराच्या एका मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा यासाठी कंटेट क्रिएटर्सनी मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे, असे आवाहन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले.

मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे पुण्यात ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ, लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंटेट क्रिएटर उपस्थित होते. सध्या सोशल मिडीयाची ताकद प्रचंड असून तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरीक सोशल मिडियाचा एक भाग बनले आहेत. या ताकदीचा वापर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मिडियातील कंटेट क्रिएटर्सनी सक्रिय योगदान देण्याची गरज असल्याचे मत पुनीत बालन यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘‘सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद होतो. त्यांचे प्रश्न जाणून घेता येतात आणि त्यावर उपाययोजनाही करता येतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावी काम करता येते.’’ यावेळी त्यांनी मतदानाबद्दल जागृती करण्याचेही आवाहन केले.

मतदान जनजागृतीसाठी कंटेट क्रिएटर्ससोबत सहभाग घेणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते श्री प्रवीण तरडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘चित्रपट पोहोचवण्यासाठी क्रियेटर्स यांची भूमिका सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. काही सेकंदाच्या कंटेंटमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम अवघड असते. परंतु कंटेट क्रिएटर्स आपल्या प्रतिभेतून आणि निरीक्षण शक्तीद्वारे हे काम सहज करु शकतात. असेच काम त्यांनी मतदानाबाबत जागृती करण्यासाठी केले तर ते राष्ट्रीय कार्य होईल, यात काही शंका नाही.’’


‘‘सोशल मिडियाच्या माध्यमातून कंटेट क्रिएटर्सनी लोकांमध्ये सकारात्मकता पसरवणे गरजेचं आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती केली तर मतदानाचे प्रमाण वाढेल आणि या मतदानाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना देशाच्या विकासाचे भागीदारही बनता येईल. तसेच मतदारांनीही मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून घरी न बसता जागरूक नागरिक म्हणून मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं. तरंच त्यांना सरकारवर बोलण्याचा अधिकार उरेल.’’

  • पुनीत बालन
    (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

भारतीय तटरक्षक दलाने कारवारजवळच्या समुद्रात अडकलेल्या मासेमारी नौकेला पुरवले सहाय्य

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2024

भारतीय तटरक्षक दलाने 16 एप्रिल 2024 रोजी, कर्नाटक मधील कारवार जवळच्या समुद्रात अंदाजे 215 सागरी मैल अंतरावर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे संकटात सापडलेल्या आयएफबी रोझरी या भारतीय मासेमारी नौकेची यशस्वीपणे सुटका केली. आयएफबी रोझरी या नौकेने 13 एप्रिल 2024 रोजी आपत्कालीन मदतीसाठी दिलेल्या हाकेला भारतीय तटरक्षक दलाच्या सावित्रीबाई फुले या नौकेने त्वरित प्रतिसाद दिला आणि प्रतिकूल हवामानावर मात करत संकटग्रस्त नौकेशी  संपर्क प्रस्थापित केला. 

संकटग्रस्त नौकेवर पोहोचल्यावर भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजावरील  बोर्डिंग पथकाने नौकेचे इंजिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निष्फळ ठरल्यावर तटरक्षक दल जिल्हा मुख्यालयाच्या (कर्नाटक) आणि मत्स्य विभागाच्या सहकार्याने ही मासेमारी नौका  कारवारच्या दिशेने नेण्यात आली.  आयएफबी लक्ष्मी नारायण यांच्याकडे ती  सुपूर्द करण्यात आली , त्यांनी ती सुरक्षितपणे कारवार बंदरात नेली .  

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2023 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2023 च्या लेखी परीक्षेचा निकाल, आणि जानेवारी-एप्रिल, 2024 दरम्यान व्यक्तिमत्व चाचणीसाठी झालेल्या मुलाखतींच्या निकालाच्या आधारावर, गुणवत्तेनुसार, पुढील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे:

i.भारतीय प्रशासकीय सेवा;

ii.भारतीय परराष्ट्र सेवा;

iii.भारतीय पोलीस सेवा; आणि

iv.केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’.

1.एकूण 1016 उमेदवारांची नियुक्ती साठी शिफारस करण्यात आली असून त्याचे तपशील पुढील प्रमाणे आहेत:

GENERALEWSOBCSCSTTOTAL
347(incl.07 PwBD-1,    04 PwBD-2,03 PwBD-3 &02 PwBD-5)115(incl.01 PwBD-1,     Nil PwBD-2,01  PwBD-3 & Nil PwBD-5)303(incl.07 PwBD-1,     02 PwBD-2,01 PwBD-3 & 01 PwBD-5)165(incl.01 PwBD-1,     Nil PwBD-2,Nil PwBD-3 &Nil PwBD-5)86(incl.Nil PwBD-1,     Nil PwBD-2, Nil PwBD-3 & Nil PwBD-5)1016(incl.16 PwBD-1,      06 PwBD-2, 05 PwBD-3 &03 PwBD-5)

2.नागरी सेवा परीक्षा नियम 2023 च्या नियम 20 (4) आणि (5) अनुसार, आयोगाने पुढील प्रमाणे उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे:

GENERALEWSOBCSCSTPwBD-1PwBD-2TOTAL
120366610040202240

3.परीक्षेच्या नियमांमधील तरतुदींचा विचार करून, उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार विविध सेवांमध्ये नियुक्ती केली जाईल. केंद्रसरकार द्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची यादी पुढील प्रमाणे:

SERVICESGENEWSOBCSCSTTotal
I.A.S.7317492714180
I.F.S.160410050237
I.P.S.8020553213200
Central Services Group ‘A’258641608645613
Group ‘B’ Services4710291512113
Total474115303165861143*

*PwBD अंतर्गत भरली जाणारी 37 रिक्त पदे समाविष्ट आहेत (16 PwBD-1, 06 PwBD-2, 05 PwBD-3 आणि 10 PwBD-5)

4.शिफारस करण्यात आलेल्या 355 उमेदवारांचे अर्ज तात्पुरते राखून ठेवण्यात आले आहेत.

5. युपीएससी च्या कॅम्पसमध्ये परीक्षा हॉलजवळ एक “मदत केंद्र” आहे. उमेदवारांना त्यांची परीक्षा / भरती याबाबतची कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 ते 17:00 या वेळेत थेट अथवा 23385271 / 23381125 / 23098543 या दूरध्वनी क्रमांकावर मिळवता येईल. निकाल युपीएससी च्या http//www.upsc.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर गुण उपलब्ध होतील.

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव ; महोत्सवात राहुल देशपांडे यांचे सुश्राव्य गायन
पुणे : ‘लक्ष्मी वल्लभ दिनानाथा पद्मनाभा’, ‘तुका म्हणे भोगे पीडा’, ‘केली धावे देव’, ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग‘ अशा शास्त्रीय. उपशास्त्रीय संगीतासह भजन आणि संगीताचा आनंद रसिकांनी घेतला.

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीमध्ये त्यांनी शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतासह अभंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

‘प्रभू मोरे रे मै ना, की तू जाऊ रे’ या गीताने राहुल देशपांडे यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. राहुल देशपांडे यांचा भावपूर्ण आवाज, तबल्यावरील ठेका, संवादिनीचे स्वर आणि त्याचबरोबर या मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी दिलेली दाद यामुळे जंगली महाराज मंदिरातील वातावरण भक्तीमय आणि संगीतमय झाले होते.

‘सावरे माया जाऊ जमुना किनारे’, ‘तुका म्हणे भोगी पीडा ‘, ‘ वल्लभ दिनानाथा पद्मनाभा’, ‘सुख वसे तुझे पाय’ या गीतांनी राहुल देशपांडे यांनी हिंदुस्तानी संस्कृतीतील भक्तीरसाची रसिकांना अनुभूती दिली. ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’ या अभंगाने रसिक अक्षरशः  दंगून गेले, टाळ्यांच्या स्वरूपामध्ये रसिक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीमध्ये सहभागी झाले.