दिल्ली-आठवडाभरापासून देश घरातच वावरतो आहे. पण, सुरक्षित राहायचं असेल तर घरातच बसा, असं सांगणारी आकडेवारी समोर येत आहे. राजधानी दिल्लीत रविवारी म्हणजे एकाच २३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू झाला. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.