पुणे-स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे शहरात जनसंघर्ष यात्रेची सुरूवात
झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराजजी चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, उल्हास
पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे, आ. शरद रणपिसे, अनंतराव गाडगीळ, अमर राजुरकर, डॉ. विश्वजीत
कदम, मोहन जोशी, आबा बागुल,अविनाश बागवे ,अजित दरेकर ,ॲड. अभय छाजेड, महिला अध्यक्षा
सोनाली मारणे,सतिश पवार, जयकुमार ठोंबरे व इतर मान्यवर उपस्थित होते. पर्वती विधानसभा मतदार
संघातअप्पर इंदिरा नगर मार्गे ही यात्रा बिबवेवाडी, तळजाई वसाहत, अरण्येश्वर, राजीव गांधी ई लर्निंग
सेंटरमार्गे सारस बाग चौक येथून कसबा विधानसभा मतदार संघात पोहचली. त्या ठिकाणी महापौर सौ.
कमल व्यवहारे, डॉ. रोहित टिळक, नीता रजपूत, अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, डॉ. सतिश देसाई,
गोपाळ तिवारी, प्रविण करपे व इतर पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. दत्तवाडी, बाजीराव रस्ता मार्गे
यात्रा शनिवार वाड्यापर्यंत पोहचली.
यानंतर यात्रा बालगंधर्व चौक मार्गे ज्ञानेश्र्वर पादुका चौक, दिपबंगला चौक, गोखले नगर मार्गे
चतु:श्रृंगी, पुणे विद्यापीठ चौक, कस्तुरबा वसाहत, ब्रेमन चौक येथून बोपोडी व खडकी बाजार येथे
पोहचली. यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, मनिष आनंद,
मुकारी अलगुडे, दत्ता बहिरट, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर, सुरेश कांबळे,
दुर्योधन भापकर, अभय सावंत, अजीज सैय्यद, राजेंद्र भुतडा आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकरावजी चव्हाण म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य
सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे देश व राज्यातील जनता वैतागली आहे. नोटबंदी, जी.एस.टी. मुळे
अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. तसेच महिलांच्या सुरेक्षबद्दल सुध्दा प्रश्न उद्भवत आहेत.
बिघडलेल्या सामाजिक सलोख्यामुळे दलित व अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहे, पेट्रोल, डिझेल व
गॅस दरवाढीमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या
आत्महत्या, विचारवंतावर होणारे प्राणघातक हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ही संघर्ष यात्रा
जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने काढलेली आहे. देशामध्ये लोकशाही व राज्य घटनेचे संरक्षण
करण्यासाठी आणि सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला पुण्यासह संपूर्ण
देशात व राज्यात जनतेने सत्ता द्यावी असे आवाहन करीत आहे.’’
तसेच सार्वजनिक ठिकाणी तमाम महिला वर्गाचा बेजबाबदार वक्तव्य करून अपमान करणाऱ्या
भाजपचे आमदार राम कदम यांचा खरपुस शब्दात चव्हाण यांनी समाचार घेतला. यावेळी संपूर्ण यात्रा
मार्गावर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य जनतेने देखील उत्स्फुर्त स्वागत केले.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘मोदी सरकारच्या चूकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य
जनता त्रस्त झाली असून देशात आणि राज्यात सरकार विरोधात प्रचंड असंतोष असून त्याचे रूपांतर
आगामी निवडणुकांमध्ये सत्तातंर झाल्याशिवाय राहणार नाही. समाजातील विविध घटकांना बरोबर
घेऊन जाणारा व लोकशाहीचे संरक्षण करणारा काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष असून पुणे शहरातील
लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागांवर पुणेकरांनी काँग्रेसला निवडून द्यावे असे आवाहन केले.’’
यानंतर जनसंघर्ष यात्रा वाकडेवाडी येथून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात पोहचली
आर.टी.ओ. मार्गे ताडीवाला रोड, ढालेपाटील रोड, पुणे स्टेशन येथे जनसंघर्ष यात्रेचे कार्यकर्त्यांनी
जल्लोषात स्वागत केले. यावेळी पुणे मनपाचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, लता
राजगुरू, रफिक शेख, सुजाता शेट्टी, चाँदबी नदाफ, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर जनसंघर्ष यात्रा वानवडी येथून हडपसर विधानसभा मतदार संघात पोहचली त्यावेळी
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी नगरसेवक शिवाजी केदारी, अभिजीत शिवरकर, प्रशांत तुपे,
साहिल केदारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या जनसंघर्ष यात्रेचा समारोप जाहिर सभेने हडपसर विधानसभा मतदार संघात होणार आहे.