पुणे-राज्यभरात रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य आहे. हा धागा पकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ म्हणणारे आता कुठं गेलेत. त्यांनी तर ‘महाराष्ट्र माझा खड्ड्यात घालून ठेवला’ आहे.’
कोल्हापूरपासून सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या भागात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रचा अखेरच्या टप्प्याची समारोप सभा आज पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर पार पडला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात.पुणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,अरविंद शिंदे,मोहन जोशी,अविनाश बागवे,अजित दरेकर आदी आजी माजी पदाधिकारी आमदार यावेळी उपस्थित होते .
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की,आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस ने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र भाजपकडून आघाडी सरकार बाबत अपप्रचार आणि अनेक आश्वसने दिली मात्र भाजप सत्तेत आल्यावर दिलेली आश्वसने विसरले आहे. स्मार्ट सिटी म्हणून उल्लेख करणाऱ्या पुण्यासह सार्या शहरात कचरा ,वाहतूक समस्यांनी उग्र स्वरूप धारण केले असताना अशा शहरांचा गाजावाजा स्मार्ट म्हणून केला जातोय अशी समस्यांची आगरे बनलेली स्मार्ट शहरे नकोतच जनतेला .
शेतकयांच्या आत्महत्येच्या घटना बाबत राज्यात आघाडी सरकारच्या काळात भाजपचे नेते आणि सद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. आता भाजप सरकारच्या काळात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. आता कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा हे एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावे.असे विधान प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. हे केवळ खडसेच विचारू शकतात कारण ते कधी कुठे ही जातील. असेते म्हणाले .