विकासकामे करूनही जनतेने अपेक्षित कौल दिला नाही, यावर चिंतन करणार – चंद्रकांत पाटील

Date:

कोल्हापूर – विकासकामे करूनही जनतेने आम्हाला कौल का दिला नाही असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनतेला केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. दरम्यान महायुतीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत अपेक्षित न मिळाल्याने भाजप चिंतन करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विकासकामे करूनही आम्हाला जनतेने अपेक्षित कौल दिला नाही. मात्र जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आमचं नेमकं काय चुकले हे जनतेने सांगावे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यासोबतच भाजप-शिवसेना दोघांनाही बंडखोरी शमवता आली नाही. बंडखोरीमुळेच आम्हाला अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच उदयनराजे भोसले यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान सत्ता भाजप-शिवसेनेचे येणार हे सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘अब की बार 220 पार’ असा नारा दिला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे हे स्वप्न भंगले. निवडणुकीत भाजपला 105 आणि शिवसेनेला 56 जागा जिंकता आल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई--पुण्याच्या नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे अवघ्या राज्यात संतापाची...

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

उल्लेखनीय सेवेचा गौरव मुंबई: दि. ५ मे २०२६ - महावितरणच्या कार्यकारी...

३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द – महापौरांचे निर्देश

मान्सूनपूर्व पाणीपुरवठा नियोजन आढावा बैठक पुणे_ : आगामी मान्सूनच्या...