पुणे- नरेंद्र मोदी गरीबांतून आलेले पंतप्रधान आहेत. त्यामुळे गरीबांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. गेली पाच वर्षे गरीबांसाठी विकास योजना राबविल्या. गेल्या पन्नास दिवसांत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी यांना सक्षम करणारे आणि सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्र सरकारने घेतले. प्रत्येक घरात शुद्ध पाणी देण्याची योजना सुरू केली आहे. कॉंग‘ेसने गरीबीचे समान वाटप केले तर भाजप सरकार समृद्धीचे समान वाटप करीत आहे. हा या दोन पक्षांतील राज्य कारभारातील फरक आहे. म्हणून जगात दबदबा निर्माण करणार्या, अर्थव्यवस्था पुढे नेणार्या सर्वसामान्य नागरिकांची प्रगती करणार्या आणि गरीबांना सामर्थ्यवान करणार्या मोदी सरकारला देशात मोठा पाठिंबा मिळत असल्याचे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपा सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करताना श्री. जावडेकर बोलत होते. राजीव गांधी पार्क रस्ता आणि साम‘ाज्य सोसायटीमध्ये हे अभियान राबविण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, अल्पना वरपे, हर्षाली माथवड, मंडल अध्यक्ष प्रकाश बालवडकर, अजय मारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. जावडेकर पुढे म्हणाले, ‘भाजप हा जगातील सर्वांत जास्त सभासद असणारा राजकीय पक्ष आहे. सध्या भाजपची सदस्य संख्या अकरा कोटी इतकी आहे. या वर्षी ती सात कोटीने वाढविण्याचा संकल्प आहे. भाजप हा असा एकमेव पक्ष आहे जो जनतेमध्ये जाऊन सभासद नोंदणी करतो. त्यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जात आहे. मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद यात्रांच्या आयोजनातून जनसंवाद साधला जात आहे. आमचे सर्व खासदार, मंत्री, बूथस्तरावरील कार्यकर्ते सात दिवस सभासद नोंदणी अभियानात सहभागी झाले आहेत. जनतेची पक्षाशी असलेली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न आहे. त्याला नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.’