मुंबई : राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यापार्श्वभूमीवर काल शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. तसेच पहिल्याच दिवशी त्यांनी तातडीनं अॅक्शन मोडमध्ये येत, ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक घेतली. फडणवीसांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच काही भाजपचे नेते मंडळी उपस्थित होती.
सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानं ते टिकवण्यासाठी मविआ सरकार कुठेतरी चाचपडताना दिसत होती. पण आता केंद्रात आणि राज्यातही भाजपच सरकार आल्यानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

