नवी दिल्ली-मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला करून आपल्या १८ जवानांची हत्या करणाऱ्या बंडखोरांना भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराच्या विशेष दलांनी म्यानमारच्या हद्दीत घुसून या हल्ल्यात हात असलेल्या एनएससीएन (के) आणि केवायकेएल या गटांच्या २० बंडखोरांचा खात्मा केला. या मोहिमेत भारतीय पथकाची कोणतीही हानी झाली नसून, लष्कराने प्रथमच आपल्या सीमेच्या बाहेर कारवाई केली आहे.
४ जूनला मणिपुरात लष्करावर झालेल्या हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून ही कारवाई करण्यात आली. बंडखोर सीमा ओलांडून भारतात येतात, सुरक्षा दलांना लक्ष्य करून हल्ले घडवतात आणि पुन्हा सीमेपलीकडे पळ काढतात, असे लक्षात आल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सीमेबाहेर कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात लष्कराच्या १८ जवानांना ठार करणाऱ्या बंडखोरांविरोधात कडक पवित्रा घेत, भारतीय लष्कराच्या विशेष दलांनी म्यानमारच्या हद्दीत महत्त्वपूर्ण कारवाई करत या हल्ल्यात हात असलेल्या एनएससीएन (के) आणि केवायकेएल या गटांच्या १५ बंडखोरांना कंठस्नान घातले. भारतीय लष्कराने प्रथमच आपल्या सीमेच्या बाहेर लष्करी कारवाई केली आहे.