उद्धवसाहेब आणि राजसाहेब ठाकरे
हिंदूहृद्यसम्राट , सरसेनापती , बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही दोघे वारसदार आहात . नुसते वारसदारच नाही तर बाळासाहेबांचीच परंपरा तुम्ही पुढे चालवाल अशी तमाम मायमराठी जनतेची अपेक्षा आहे अर्थात ज्याचे मराठी आणि आपल्या मायभूमी वर खरे प्रेम आहे, श्रद्धा आहे, अशा जुन्या जाणत्या बाळासाहेबांवरही प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची हीच अपेक्षा आहे जो स्वार्थी नाही जो कुठल्या पडला हपापलेला नाही , लोलपू नाही
बाळासाहेबांची ताकद मोठ्ठी होती , वकृत्व आणि शक्ती त्यांच्याकडे होती , धनशक्ती फारशी नव्हतीच , पण त्यांच्या शब्दावर मान कापून हातावर घेणारी मराठी तरुणाई ची ताकद बाळासाहेबांजवळ होती . त्याच ताकदीने त्यांनी शिवसेना घडवली मराठी माणसाच्या स्वाभिमानाची मशाल पेटविली हीच मशाल तुम्हालाही तेवत ठेवायची आहे . आता बाळासाहेबांचे नाव , त्यांचे असामान्य कर्तुत्व त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे . ती सोबत घेवून घरदार – कुटुंब – आणि मन-धन विसरून … बाळासाहेबांकडे जी ताकद होती ती ताकद तुम्हाला मिळवायची आहे .तुमच्या जवळ असणारी माणसे निष्ठावान,शक्तिशाली असावीत लालसी नसावीत याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे , सारे काही अर्पण करून मरठी अस्मितेसाठी , मराठी स्वाभिमानासाठी तुमची कवचकुंडले होवून लढणारी असावीत आणि अशाच माणसांच्या मनाशी तुमची थेट -भेट रुजलेली असावी . राजकीय घोडेबाजार – सौदेबाजी यात कधी हि पडायचे नाही कोणत्याही पदाची लालसा ठेवायची नाही पण महारष्ट्र घडवायचा मराठी स्वाभिमानाची मशाल तेवत ठेवायची जबाबदारी -परंपरा आता तुम्हाला चालवायची आहे . ती व्यवस्थित चालविली तर बाळासाहेबांचे नाव आणि कर्तुत्वाला शोभेल असा वारसा मराठी साम्राज्याला मिळाला याची नोंद निश्चित होईल. गद्दारीची हिम्मत करणारी मतलबी माणसे जवळ नसलेली बरी … अशा माणसांच्या शक्तीमुळे मराठी अस्मिताही बाजारात बसेल . तेव्हा अशांची साथ नकोच . शिवसेनेचे गतवैभव कुठल्या मार्केटिंग ने नाही तर मावळा -मावळा जोडा अभियानाने परत मिळवावे लागेल . बाळासाहेबांची नुसती वाणी नको नीती चा हि अवलंब करा . वाघासारखे जगा … सत्तेच्या मोहापायी । कुणाच्या दबावा पायी तुम्ही इकडे -तिकडे कराल तर … बाळासाहेबांची पुण्याई देखील कधी न कधी तुमची साथ सोडेल… वादळात सापडलेल्या नौकेला दीपस्तंभाप्रमाणे इशारा समजा आणि हीच घडी आहे अखेरची वेळ आहे आता मराठी बाणा ,मराठी स्वाभिमान जपा … … वेळ आलीच आहे तर विरोधी बाकावर बसा , पण वाघासारखे रहा , बाळासाहेबांसारखे जगा ,त्यांचाच वारसा चालवा… त्यातच मराठी महाराष्ट्राचे हित आहे आणि तीच बाळासाहेबांना हि सलामी असेल .
—————————–
फेसबुक वर गाजणारे हे चित्र पहा …