जनतेची दिशाभूल करून , खोटी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदींनी जरी केंद्रात बहुमताने सत्ता प्रस्थापित केली असली तरी फार काळ ते जनतेला फसवु शकणार नाहीत . आणि कसब्यात तर एकाच नेतृत्वाला दिलेली कायमची जहागिरी हि सामान्य माणसाच्या हिताची ठरू शकली नाही त्यामुळे राष्ट्रवादीने केलेली विकासाची कामे , समाजातील विविध घटकांना दिलेले आरक्षण , दिलेले प्रकल्प आणि विकासासाठी सातत्याने चालविलेली – राबविलेली मोहीमच जनता लक्षात घेईल आणि जनमताचा कौल राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच मिळेल असा विश्वास आमदार वंदना चव्हाण यांनी येथे व्यक्त केला कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर आयोजित केलेय मेळाव्यात त्या बोलत होत्या .
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यावेळी भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होईल असा दावा केला ते म्हणाले , उत्तर प्रदेश , बिहार . मध्य प्रदेश येथे हि स्थानिक नागरिकांनी स्थानिक पक्षांनाच स्वीकारले आणि भाजपला झिडकारले आहे .दीपक मानकर यांनी यावेळी आपण तळागाळातील , संकटातील जनतेसाठी धावून जावू त्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य देवू असे सांगितले . आमदार कमलताई ढोले पाटील , दत्ता एकबोटे , रवींद्र माळवदकर , अण्णा थोरात ,वकील म . वि , अकोलकर ,मनीषा बोडके , विनायक हनमघर ,बाबा शेख , दीपक जगताप ,सुनील खाटपे ,विजय ढेरे आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते