तुळजापूर : उद्धव ठाकरे , राज ठाकरे मोदींसह भाजपवर बरसात असताना , नारायण राणे यांच्यानंतर आता काँग्रेस चे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आता नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रावर सूड उगवू पाहत आहेत, महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणाऱ्या मोदींना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल असा सवाल करीत महारष्ट्रातील जनतेने त्यांना वेळीच योग्य उत्तर गरजेचे आहे असे म्हटले आहे
मोदी यांनी JNPT कडचा सगळा व्यापार गुजरात बंदराकडे वळविला आहे , मुंबईचे महत्व कमी करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत असे गेल्या २४ सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी म्हटले होते आता चव्हाण यांनी हि महाराष्ट्राला मोदींपासून सावध राहण्याची गरज प्रतिपादित केली आहे
तुळजापूर येथे मंगळवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले , हि सागरी सुरक्षा अकॅडमीसारखे अनेक प्रकल्प गुजरातकडे वळविले जात आहेत. अवघ्या 15 दिवसांवर निवडणूक असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून महाराष्ट्रावर सूड उगवला जात असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या मोदींना राज्यातील जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर द्यावे, राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून एकप्रकारे भाजपासोबत हातमिळवणी केली, असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणाऱ्या मोदींना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल, असा सवाल करीत गुजरातकडे जाणारी मुंबई महाराष्ट्राने १०५ जणांचे हौतात्म्य देऊन मिळविली. त्याचाच सूड मोदी उगवत असून, केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदींनी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे तीन विभाग गुजरातला नेले. मुंबईतील गोदी बंदरही गुजरातमध्ये हलविले. यामुळे अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार का? असा सवालही त्यांनी केला.
व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणो, शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, तुळजापूरचे उमेदवार मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील आदींची उपस्थिती होती.