.काँग्रेस पक्षाची पदे भोगून मानसन्मान मिळविलेल्या माजी महापौर दत्ता गायकवाड यांनी केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी अचानकपणे काँग्रेसची साथ सोडली गायकवाड यांच्या पत्नी संगीता गायकवाड या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. मात्र, पती दत्ता गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सौ. गायकवाड यांनी आपल्या नगरसेविका पदाचा राजीनामा द्यावा आणि राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान विनायक निम्हण यांनी गायकवाड यांना दिले. अचानकपणे काँग्रेसची साथ सोडल्यामुळे औंधकर नागरीक नाराज झाले आहेत. अशा मनोवृत्तीला औंधमध्ये अजिबात थारा नाही. अशा प्रवृत्तींना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका अॅड. तानाजी चोंधे यांनी केली.
काँग्रेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार विनायक निम्हण यांनी औंधमध्ये काढलेल्या पदयात्रेनंतर आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत चोंधे बोलत होते. यावेळी वसंतराव गायकवाड, सुरेश रानवडे, वसंतराव जुनवणे, सुरेश जुनवणे, दिलीप गायकवाड, निवृत्ती कलापुरे, उत्तमशेठ आसवले, भिमराज नखाते, विकास रानवडे, रुपेश जुनवणे आदी उपस्थित होते.
अॅड. चोंधे म्हण्आले, औंध हे पुणे शहराचे पश्चिमेचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे औंधच्या विकासासाठी विनायक निम्हण हे कायमच प्रयत्नशील राहिले
आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच औंध परिसर विकसित होताना दिसतोय. याचाच परिपाक म्हणून औंधमधील बहुतांश सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरीक, तरुणांनी निम्हण यांना पाठिंबा दर्शवला आहे. स्वत:च्या स्वार्थापोटी दत्ता गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले आहे. मात्र, नागरीक अशा प्रवृत्तीला थारा देणार नाहीत, असेही अॅड. चोंधे यांनी सांगितले.
स्वत:च्या हव्यासापोटी खोटे-नाटे आरोप करून नागरीकांची सहानुभूती मिळवण्याचा दत्ता गायकवाड यांचा प्रयत्न हास्यास्पद असून त्यास नागरीक बळी पडणार नाहीत, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत गायकवाड यांनी व्यक्त केला.
विलास रानवडे यांचे हि यावेळी भाषण झाले