टायगर ऑफ म्हैसूर नावाने ओळखला जाणारा हैदराबादचा मुस्लिम राजा टीपू सुलतानची तलावार भारतामध्ये आणण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी उद्योगपती आणि राज्यसभेचे माजी खासदार विजय मल्याने इंग्लडमध्ये जाऊन हि तलवार खरेदी केली होती . म्हैसूर संस्थानाचा 18 व्या शतकातील राजा टिपू सुलतान ‘राम’ असे नाव कोरलेली अंगठी वापरत होता असा इतिहास आहे .१७९९ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या युद्धात मारला गेल्यानंतर राजा सुलतानच्या बोटातील अंगठी काढून घेण्यात आली. या ऐतिहासीक अंगठीचा 1.45 लाख पाउंड म्हणजेच 1.43 कोटी रुपयांत लंडनमध्ये गेल्या २०१४मध्ये लिलाव करण्यात आला होता. लिलावात ही अंगठी ज्या व्यक्तिने खरेदी केली त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते. अलीकडे ही अंगठी परत भारतात आणली जावी आशी मागणी राज्यसभेत खासदार मुनव्वर सलीम यांनी केली आहे.
सेंट्रल लंडनच्या क्रिस्टी लिलावगृहाकडे असलेल्या माहितीनुसार या राम नामक टिपू सुलतानाच्या अंगठीचे वजन 41.2 ग्राम आहे. त्यावर देवनागरी लिपीत ‘राम’ नाव कोरले आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या युद्धात सन 1799 मध्ये र्शीरंगपट्टणममध्ये टिपूचा मृत्यू झाला होता. ड्यूक ऑफ वेर्लिगटन आर्थर बेलेसले नावाच्या व्यक्तिने त्यांच्या मृतदेह हाती लागल्यानंतर बोटातून ही अंगठी काढून घेतलेली होती, असे सांगण्यात येते. टिपू सुलतान यांना ‘टायगर ऑफ म्हैसूर’ या नावानेही ओळखले जाई. म्हैसूरचे सुलतान हैदर अली यांचे धाकटे पुत्र असलेले टिपू हे लढवय्या राजा, विद्वान व कवीही होते. अशा राजाचा ऐतिहासीक ठेवा देशात परत आणण्यासाठी राज्यसभेत प्रयत्न केला जात आहे.