एका जाहिरातीने भाजपाला मोठ्ठा फटका बसणार असून या जाहिरातीने महाराष्ट्र प्रेमी नागरिकांना मनोमन नाराज करवून ठेवले आहे याबाबतची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून उमटते आहे. दरम्यान आज ‘बंद करा हि जाहिरात ‘ अशी तक्रार पुण्यातील वसंत खुटवड , राजेंद्र पवार , रवि सहाने , राजाभाऊ मुकेरकर . शैलेश बढाई, निखिल काची , सचिन समुद्रे आदी तरुणांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील हि जाहिरात महाराष्ट्राची बदनामी करणारी असल्याचे म्हटले होते .
‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’… ही काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना जाब विचारणारी भाजपची जाहिरात सध्या टिव्ही, वर्तमानपत्रांमध्ये प्रचंड गाजते आहे. पण विरोधकांना जाब विचारणाऱ्या याच भाजपने महाराष्ट्रभरात याच काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षाचे तब्बल ५१ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे भाजपचा ढोंगी चेहरा समोर आणण्यात येतो आहे .
सोशल मीडियावर सध्या अधिराज्य गाजविणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप’ने भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची याबाबतची वेदना अचूक टिपली आहे. ‘व्हॉट्सअॅप’वरून भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात केलेल्या उमेदवारांची संपूर्ण यादीच फिरवली जात आहे. यात काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे ९, मनसेचे २, शेतकरी संघटनेचा १, अपक्ष २ व समता परिषदेचा एक अश्या आयत्यावेळी पक्षात आयात केलेल्यांना , म्हणजे भाजपच्या भाषेत सांगायचे झाले तर गेली १५ वर्षे महाराष्ट्र खड्ड्यात घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच भाजपने प्रवेश देऊन तत्काळ उमेदवारी का दिली, असा सवालही केला जात आहे.
काँग्रेस मधून आलेले मनोहर बडने (धुळे ग्रामीण) सुनील देशमुख (अमरावती )समीर मेघे (हिंगणा )माधवराव किन्हाळकर (भोकर )आनंद भरोसे (परभणी) शिवाजीराव नाईक (शिराळा )अजित घोरपडे (तासगाव ),प्रशांत ठाकूर (पनवेल )राजन तेली सावंतवाडी , संजयदुधगावकर उस्मानाबाद ,शैलेश लाहोटी लातूर ,माणिकराव कोकाटे सिन्नर, बाळासाहेब मुरकुटे नेवासा ,भाऊसाहेब वाकचौरे श्रीरामपूर ,विलासराव खरात घनसावंगी ,अमोल महाडिक कोल्हापूर दक्षिण, तर राष्ट्रवादी तून भाजपात आलेले अभय नगरकर नगर, विजयकुमार गावित ,नंदुरबार संजय सावकारे भुसावळ ,योगेंद्र गोडे बुलढाणा, किसन कथोरे मुरबाड ,मंदा म्हात्रे बेलापूर , लक्ष्मण जगताप चिंचवड , बबन पाचपुते श्रीगोंदा ,शरद बुट्टे पाटील खेड ,राहुल कुल दौंड प्रताप चिखलीकर कंधार स्नेहलता कोल्हे कोपरगाव भीमराव धोंडे आष्टी मोनिका राजळे पाथर्डी ,जगदीश वळवी चोपडा शिवाजी कर्डिले राहुरी राजेंद्र पिपाडा राहाता अद्वय हिरे नांदगाव अरविंद चव्हाण जालना रमदास सदाफुले देवळाली
तर शिवसेनेतून भाजपात आलेले भगवान बोरस्ते निफाड, किशनचंद तनवाणी औरंगाबाद मध्य,
बाबासाहेब तांबे पारनेर ,विनायक हिवाळे पैठण , शरद ढमाले भोर, नेताजी डोके जुन्नर ,जयसिंग एरंडे आंबेगाव द्रकांत खाडे इगतपुरी दिलीप कुंदकर्ते नांदेड दक्षिण संगीता राजे निंबाळकर पुरंदर मनसेतून आलेले राम कदम घाटकोपर पश्चिम यांना उमेदवारी दिली आहे कन्नडसमता परिषडेचे संजय गव्हाणेअपक्ष प्रशांत बंब गंगापूर, धुळे शेतकरी संघटना मधून आलेले अनिल गोटे आणि अपक्ष शिवाजी मानकर येवला यांना उमेदवारी दिली आहे