लातूर -जिल्ह्यातील उदगीर, निलंगा शहर आणि परिसरात गारांसह पावसाची दमदार बॅटिंग पाहायाला मिळाली. काही मिनिटे झालेल्या या पावसाने नागरिकांची दाणदाण उडाली. अचानक बरसलेल्या पावासाने शेतमालाचं मोठं नुकसान झाले आहे. तुफान पावसामुळे शहरातील भाजी विक्रेते आणि दुकानदारांची शेतमाल सुरक्षित स्थळी नेताना तारांबळ उडाली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील उघड्यावर असलेला शेतमाल भिजल्याने बरेच नुकसान झाले आहे.
बेळगावमध्ये झाली गारपीट
बेळगाव शहरातही गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना ऐन उन्हाळ्यात सुखद गारवा अनुभवण्यास मिळाला. आज दुपारी ढगांचा गडगडाट सुरु झाला आणि पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही मिनिटांनी गाराही पडायला लागल्या. जवळपास 15 ते 20 मिनिट ही गारपीट सुरु होती.