पुणे :
नऱ्हे -आंबेगाव येथे पाच मजली इमारत कोसळल्याने पुण्यातील विकासाच्या भस्मासुराशी निगडीत अनेक प्रश्न समोर आलेले असल्याने नूतन मुख्यमंत्री यांनी हा अनियंत्रित भस्मासुर रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ आणि ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ संस्थे तर्फे करण्यात आली आहे .
अतिक्रमण काढणारी यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे येणे आवश्यक आहे असे हि मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीत म्हणले आहे . राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते दीपक बिडकर आणि ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ संस्थेचे सचिव ललित राठी यांनी या मागणीबाबत माहिती दिली .
नव्याने बांधलेली, एक मजला अनधिकृत असलेली आणी कम्प्लिशन सर्टिफिकेट नसलेली पाच मजली इमारत कोसळल्यामुळे पुण्यातील वैध -अवैध बांधकामांचा वेग , त्यांना परवानग्या देणाऱ्यांची जबाबदारी ,इमारतींचे परीक्षण -गुणवत्ता नियंत्रण आणी अनियंत्रित विकासाचा भस्मासुरा संबंधी अनेक प्रश्न समोर आले आहेत
यापूर्वीही तळजाई पठार येथे अनधिकृत इमारत कोसळण्याची घटना घडलेली आहे . टेकड्यांवरील अतिक्रमण वाढत आहे . नव्याने समाविष्ट गावांमध्ये अतिक्रमण वाढत आहे . दुसरीकडे विकास आराखड्याशी संबंधित गोष्टी प्रलंबित आहेत.
जिल्हा प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्यासाठी स्वतः ची यंत्रणा नाही ती मिळविण्यासाठी ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ ने मागील सरकार कडेही प्रयत्न केले होते . ती गरज पूर्ण करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला जाणार आहे .