Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

व्यर्थ आहे काय बलिदान यांचे …. ?

Date:

IndiaTve1da63_Rajiv-Indiara-Stamp

पुणे- केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशावरूनच इंदिरा व राजीव गांधी यांची टपाल तिकिटे बंद करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.याबाबत व्यर्थ आहे काय बलिदान यांचे असा सवाल करीत हेमंत बाजीराव मुळे यांनी हि तिकिटे बंद करू नये अशी कळकळीची मागणी केली आहे 
टपाल विभागाने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात २००८ मध्ये नऊ महत्त्वाच्या व्यक्तींची छायाचित्रे असलेल्या टपाल तिकिटांची मालिका सुरू केली होती. त्यात इंदिरा व राजीव गांधी यांच्यासह महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, होमी भाभा, जेआरडी टाटा व मदर तेरेसा यांचा समावेश होता. नव्या मालिकेत आता उपाध्याय, नारायण, मुखर्जी व लोहिया यांच्याव्यतिरिक्त लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, भीमसेन जोशी, विवेकानंद, भगतसिंग, पं. रविशंकर आदींची छायाचित्रे असलेल्या टपाल तिकिटांचा समावेश असेल. गेल्या वर्षी केंद्र सरकारने इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार व राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान-विज्ञान मौलिक पुस्तक लेखन पुरस्कार या पुरस्कारांचे नामांतर अनुक्रमे राजभाषा कीर्ती पुरस्कार व राजभाषा गौरव पुरस्कार असे केले होते.‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ म्हणून सर्वाना गौरवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी इंदिरा व राजीव यांच्या तिकिटांची छपाई बंद करण्याचे आदेश टपाल विभागाला देण्यात आल्याचे  ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून स्पष्ट झाले आहे.अशी बातमी प्रसिध्द झाली आहे .

दरम्यान या बातमीचा आधार घेत मुळे यांनी म्हटले आहे कि ,केंद्रात अनेक वर्षांनी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून स्थिर सरकार आले आहे . देशाच्या प्रगतीमध्ये व जनतेच्या हितासंबंधी सरकार कडून काम होईल अशी अपेक्षा होती . परंतु या मोदी सरकारने जनतेचा अपेक्षा भंग केला . विधायक विकास कामे करण्या ऐवजी भारतीय इतिहासामध्ये स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या योगदानाची दखल घ्यावी लागेल . मा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणापेक्षा इंदिरा गांधीनी दाखविलेल्या सन १९७१ मध्ये त्यांनी केलेल्या धाडशी कामाचे कौतुक करून साक्षात इंदिरा गांधी यांना दुर्गाची उपमा दिली . ऑपरेशन ब्लू स्टारच्या आदेशावर सही करताना राष्ट्रहिताचा विचार करून मी माझ्या मृत्यूच्या आदेशावर सही करत आहे . तसेच राजीव गांधी यांना श्रीलंकेत प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा आपले कार्य सुरूच ठेवले . थोडक्यात देशाच्या हिताकरिता दोघांनीही बलिदान दिले आहे .भारतीय जनता पार्टी ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असणारे व्यक्तींचा आपल्याला सत्तेच्या माध्यमातून त्यांना हद्दपार करत आहे . त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सकारात्मक कामे करावीत नकारात्मक कामे करून आपला विश्वास गमावू नये .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक...

डॉ.किरण मोघे माहिती उपसंचालक पदी रुजू

पुणे, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अहिल्यानगर...

सरहद शौर्याथॉन‌’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण

सरहद शौर्याथॉन‌’मधून शांती, एकात्मता, सद्भावनेचा संदेश : अजित पवार22...

पहलगाम हल्ल्यामागील हेतू समाज तोडणे,एकाच घरातील भावाला भावाविरुद्ध लढवणे

श्रीनगर - पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधी जम्मू आणि काश्मीरला...