मुंबई-
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजपने स्वतःच्या फायद्यासाठीच छगन भुजबळ यांना बाहेर काढले आहे असा थेट आरोपच राज ठाकरे यांनी केला आहे.छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईलच, आणि त्यात ते दोषी आढळले, तर त्यांना शिक्षाही होईल. मात्र कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यांना दोन वर्षे जामीन मिळतच नव्हता. हे चुकीचे आहे. भुजबळांना जामीन मिळण्यासाठी खूपच उशीर झाला आणि याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे असे म्हणत, आता मात्र भाजपच्या फायद्यासाठी भुजबळांना बाहेर काढण्यात येत आहे अशी टीका राज यांनी केली. अशा प्रकारचं राजकारण चुकीचं असल्याचेही ते म्हणाले.भाजपवर टीकास्त्र सोडताना त्यांनी, भाजपला एक्सपायरी डेट आहेच, असे म्हणत टोलाही लगावला.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजपने स्वतःच्या फायद्यासाठीच छगन भुजबळ यांना बाहेर काढले आहे असा थेट आरोपच राज ठाकरे यांनी केला आहे.छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईलच, आणि त्यात ते दोषी आढळले, तर त्यांना शिक्षाही होईल. मात्र कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यांना दोन वर्षे जामीन मिळतच नव्हता. हे चुकीचे आहे. भुजबळांना जामीन मिळण्यासाठी खूपच उशीर झाला आणि याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे असे म्हणत, आता मात्र भाजपच्या फायद्यासाठी भुजबळांना बाहेर काढण्यात येत आहे अशी टीका राज यांनी केली. अशा प्रकारचं राजकारण चुकीचं असल्याचेही ते म्हणाले.भाजपवर टीकास्त्र सोडताना त्यांनी, भाजपला एक्सपायरी डेट आहेच, असे म्हणत टोलाही लगावला.
अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना राज यांनी या विषयावर भाष्य केलं.