पुणे : गोखलेनगर, रामोशीवाडी आदी भागाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आशानगर येथील पाण्याच्या टाकीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे व नगरसेवक आदित्य माळवे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एसएनडीटी जलकेंद्रावरून पाईपलाईन होण्याकरिता वेळ लागत असल्याने चतुःश्रृंगी कडे जाणाऱ्या पाईपलाईन मधून गोखलेनगर, रामोशीवाडी, वैदूवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी येथे पाणीपुरवठा करावा. त्यामुळे या भागाचा पाणीप्रश्न सुटेल. परन्तु हे करताना बाणेर, ओंधकडे जाणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता आशानगर येथील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करावे आणि ती टाकी चालू झाल्यावर गोखलेनगर आदी भागाच्या पाणीपुरवठ्याचा विचार व्हावा, असे शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन आमदार शिरोळे व माळवे यांनी निवेदन दिले.