पुणे : सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर रुंद करण्याच्या निर्णयानंतर रहीवाश्यांना नाेटीसा बजावण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. संभाजीनगर,सहकारनगर, पर्वती भागातील नागरीकांनी यास तीव्र विराेध दर्शविला आहे. त्याकडे लक्षवेधण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ताशा वाजवित महापािलका प्रशासनाला निवेदन सादर केले. आमच्याकडे गरज नसताना, रुंदीकरण का ? असा सवाल या रहीवाश्यांनी केला आहे.

महापािलकेतील विराेधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या उपस्थितीत नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. तत्पुर्वी महापािलकेच्या आवारातील महात्मा ज्याेतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी हे ताशा वाजवित इमारतीत घुसले. त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नगरसेविका अश्विनी कदम यांनी सुरक्षारक्षकांना आम्हाला जाऊ द्या असे बजावित, वाघमारे यांचे कार्यालय गाठले. याप्रकरणी सुनावणी घेऊन याेग्य ताे निर्णय घेतला जाईल असे आश्वासन वाघमारे यांनी उपस्थितांना दिले.
नुकतेच स्थायी समितीने शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. या निर्णयाला विराेध वाढू लागला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापािलका प्रशासनाने नाेटीस बजाविण्यास सुरवात केल्यानंतर रहीवाश्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या रहीवाश्यांना त्यांची जागा जाणार, घराबवर बुलडाेझर फिरविला जाणार याची चिंता सतावू लागली आहे. यातूनच सहकारनगर भागातील नगरसेिवका अश्विनी कदम यांनी सुमारे पावणे सहाशे रहीवाश्यांच्या हरकती महापािलका प्रशासनाला सादर केल्या आहेत. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ,पर्वती अध्यक्ष नितीन कदम, नगरसेविका प्रिया गदादे,दिलीप अरूंदेकर, अण्णा तळेकर,अनिल सातपुते, तुषार नांदे,सुशांत ढमढेरे,प्रेम गदादे, समीर पवार,डॉ.सुनिता मोरे, दिनेश खराडे, पराग थोपटे,दिगंबर कोबल,अभिजीत उंद्रे ,संग्राम वाडकर, सचिन जमदाडे, संजय दामोदरे, आदित्य उढाने, वीरेन जेधे,साईल चिकणे, तेजस मिसाळ आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.
‘‘ जेथे आवश्यकता नाही अशा ठिकाणी रुंदीकरण का केले जाते ? ठराविक बांधकाम व्यावसाियकांचे हीत जपण्यासाठी सर्वसामान्यांच्या घरावर बुलडाेझर फिरविणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत’’ -:नगरसेविका अश्विनी कदम

‘‘ सध्या काेराेनाच्या परिस्थितीमुळे अनेकांचे राेजगार गेलेत. काेराेनातून सावरत असतानाच याप्रकारे काेणाचातरी स्वार्थ साधण्यासाठी नाेटीस पाठवून नागरीकांच्या चिंतेत वाढ करू नका ’’ विराेधी पक्षनेत्या – दिपाली धुमाळ

