पुणे-हे फक्त पत्र आहे. पुढची सगळी प्रक्रिया आम्ही करणार आहोत. अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.माध्यमांशी बोलताना त्यांनी या पत्रातल्या मागण्या आणि पत्राचा उद्देश स्पष्ट केला आहे. बेकायदेशीरपणे पैसे वसुली हाच राज्य सरकारचा कारभार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडत चालला आहे, ह्याची दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी घ्यावी असंही पाटील म्हटले.