लोककलावंतांच्या कधीही विस्मरणातून न जाणारे विलासराव..! (लेखक-खंडूराज गायकवाड )

Date:

लोककलेचे आत्मीयतेनं जतन व्हावे आणि लोककलावंतांना सन्मानाची वागणूक समाजाकडून आणि सरकारकडून मिळावी हा निव्वळ प्रामाणिक उद्देश ! त्यामुळे त्यांच्या तळमळीला आणि सक्रियतेला लोकलावंतांच्या हृदयात नेहमी मानाचे स्थान मिळाले..! विलासराव कधी अधिकाऱ्यांवर अवलंबून सांस्कृतिक कार्य खात्याचे निर्णय घेत नव्हते. माझ्या लोककलावंतांना काय हवं आहे ? हे लक्षात घेऊन तसा निर्णय घ्या, अशी अधिकाऱ्यांना सांगण्याची धमक फक्त त्यांच्यात होती. म्हणून आजही ते कोणाच्याही विस्मरणातून जात नाहीत.
२६ मे १९४५ साली विलासराव देशमुख यांचा जन्म बाभूळगाव (जि. लातूर) येथे एक शेतकरी कुटुंबात झाला. गावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. लातूर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँक संचालक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अशी पदं भूषवित असतांना त्यांनी राज्याच्या राजकारणात आपले पाय रोवायला सुरुवात केली. १९८० ते १९९५ पर्यंत सलग तीन विधानसभा पंचवार्षिक निवडणूक लढवून त्यांनी या काळात मंत्री म्हणून त्यांनी विविध महत्वाची खाती सांभाळली. त्यापैकी सांस्कृतिक कार्य विभागाला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय दिला.
केवळ १९९५ साली त्यांना लातूर विधानसभा मतदार संघातून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पक्षाबाहेरील आणि आपल्या पक्षातील विरोधकांना आता विलासरावांची राजकीय कारकीर्द संपते की काय? असे प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र विलासराव नेहमी आपल्या भाषणात एक वाक्य बोलायचे, अन ते लोकांना खूप भावून जायचे. ते म्हणजे “समय के पहले और नसीब से ज्यादा कुछ नाही मिलता !”अगदी तसंच त्यांच्या आयुष्यात घडले सुद्धा..!
कारण पाच वर्षे राजकारणापासून दूर झालेले विलासराव देशमुख १९९९साली पुन्हा लातूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले. अन दि १८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर त्यांनी जानेवारी २००३पर्यंत मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल पूर्ण केला. पुन्हा दुसऱ्यांदा १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ या कालखंडात त्यांना मुख्यमंत्री पद भूषविण्याची संधी मिळाली. २००८ च्या ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून थेट दिल्लीच्या राजकारणात नेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. अन तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवून ही ते मात्र कधी दिल्लीच्या राजकारणात रमले नाहीत. त्यांचे सर्व लक्ष हे महाराष्ट्रातील घडामोडीकडे आणि इथल्या राजकीय हालचालीकडे असायचे. ‘घार हिंडते आकाशी मात्र चित्त तिचे पिल्लापाशी’ अशी अवस्था त्यांची झालेली असायची. दिल्लीत बसून महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी नाळ कधी त्यांनी तोडली नाही.
विलासराव म्हटलं की, एक रुबाबदारपणा डोळ्यासमोर येतो. त्यांचा कायम साधेपणा असायचा, मात्र कपड्यांची उत्तम रंगसंगती, यामुळे एक राजबिंडे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला होती. मिश्किल स्वभाव, आपल्या वक्तृत्वात सदैव मार्मिक टिप्पणी, चेहऱ्यावर हसू असलेले त्यांना कधीही राजकीय ताणतणावात दुर्मुखलेले पाहिलेले नाही.
कला आणि साहित्य क्षेत्रात त्यांचा मित्र वर्ग मोठा होता. नाट्य संमेलन आणि साहित्य संमेलनाला ते अवर्जून उपस्थित राहत. माणसं जोडायची कला त्यांच्याकडे असायची. म्हणून त्यांनी आपल्या मैत्रीत गरीब श्रीमंत, अभिनेता आणि लोककलावंत असा भेदभाव आणला नाही. त्यांना लोकलावंतांच्या हलाखीची जाण होती. म्हणून लोककलेची परंपरा जतन करण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महत्वपूर्ण निर्णय घेतले. सांस्कृतिक कार्य विभागात निर्णयाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या मिश्किल भाषेत ते शाब्दिक चिमटे घेत.
महाराष्ट्रातील लोकलावंतांसाठी आर्थिक पॅकेज, वयोवृध्द कलावंतांच्या मानधनात भरघोस वाढ, तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार हे सर्व निर्णय त्यांनी आपल्या काळात घेतले. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपला जावा याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे ११ फेब्रुवारी २००६ रोजी पहिला “विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार” कांताबाई सातारकर यांना देण्यासाठी पहिल्यादा ते नारायणगावला आले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीतील हा सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदा नारायणगावच्या इतिहासात झाला असावा.
या गावचे जागृत देवस्थान म्हणून नारायणगावच्या मुक्ताईची ओळख संपूर्ण महाराष्ट्राभर आहे. हे ग्राम मंदिर गावात आहे. मंदिराचा गाभारा ही छोटासा आहे. देवीकडे जाणारा रस्ता म्हटलं तर येवढा ऐसपैस नाही. त्यामुळे ज्यादिवशी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायणगावला येणार होते, तेंव्हा त्यांनी पाच मिनिटे तरी देवीच्या गाभाऱ्यात येऊन देवीचे दर्शन घ्यावे, अशी खूप इच्छा होती. पण तेंव्हाचे पुणे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पुरस्कार वितरण सोहळ्याच्या जागेची पाहणी करायला आलेल्या स्पेशल पोलिस पथकाने याला विरोध केला. महाराष्ट्राचे एवढे मोठे मुख्यमंत्री येवढ्या छोट्या गाभाऱ्यात कसा प्रवेश करतील, असा आक्षेप पोलिसांनी घेतला. त्यामुळे काहीसा मूड गेलेला होता. पण विलासराव कार्यक्रमाच्या एक दिवस येण्याच्या आधी सायंकाळी त्यांना मोबाईलवर संपर्क करून माझी असलेली इच्छा व्यक्त केली. यावर ते म्हणाले, उद्या नारायणगावात आल्यावर नक्की देवीचे दर्शन घेणार..!
अन कार्यक्रमाच्या दिवशी विलासरावांनी दिलेला शब्द पाळला. त्यांचे हेलिकॉप्टर नारायणगावात उतरल्यावर, ते पहिले आले ते मुक्ताईच्या दर्शनाला. त्यांच्या सोबत सांस्कृतिक कार्य मंत्री अशोकराव चव्हाण, ऊर्जा मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषद उपसभापती वसंत डावखरे, स्थानिक खासदार, आमदार, सांस्कृतिक कार्य खात्याचे सचिव संजिवनी कुट्टी यांच्या सह सारा लवाजमा अखेर मंदिरात आला. त्यामुळे व्हायचे तेच झाले, तुडुंब गर्दी पाहून पोलिसांची मात्र खरोखर तारांबळ उडालेली दिसली.
केवळ लोककलावंतांवर अपार प्रेम आणि त्यांच्याबद्दल असलेली तळमळ यामुळे विलासराव अजूनही कलावंत आणि साहित्यिकांच्या विस्मरणातून जात नाहीत.

लेखक -खंडूराज गायकवाड

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...