“विक्रम गोखले यांनी राजकीय गोष्टींवर काही बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करावा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मते घ्यावी. ते स्वत: मुख्यमंत्री झाले, तर याचा मलाही आनंद होईल.” अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.गोखले यांनी आता चित्रपटसोडून राजकारण प्रवेश करावा. ते मुख्यमंत्री झाले तर मला प्रचंड आनंद होईल. असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.खरे स्वातंत्र्य 1947 ला मिळाले नसून ते 2014 ला मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रनोटने केले होते. कंगनाच्या या वक्तव्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन दिले आहे. कंगना जी म्हणाली त्यावर मी सहमत असल्याची प्रतिक्रिया गोखले यांनी दिली आहे. त्यावरून आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले भाष्य केले आहे