उघड्या डोळ्याने पाहू नका;
सूर्यग्रहणावेळी ग्रहांच्या या स्थितीचा अद्भूत योग सुमारे ५०० वर्षांपूर्वी आला होता
सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. काही ठिकाणी हे ग्रहण खग्रास, तर काही ठिकाणी कंकणाकृती स्वरुपात हे ग्रहण दिसेल. हे सूर्यग्रहण या वर्षातील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असेल.भारतात सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून सूर्यग्रहण लागेल आणि दुपारी 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा स्पर्श होण्यापूर्वी सुमारे 12 तास आधी वेधकाळ सुरू होतात.अनेकार्थाने यंदाचे सूर्यग्रहण अद्भूत ठरणार आहे. या सूर्यग्रहणादिनी अनेक योग तयार होत आहेत. एक म्हणजे याच दिवशी जागतिक योग दिवस, जागतिक पितृदिन आहे.
21 जूनचे आणखीन एक महत्व म्हणजे आजचा दिवस हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. सामान्यपणे दिवसातील 24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. हे सूर्यग्रहण सर्वांत मोठे सूर्यग्रहण असणार आहे.दरम्यान सूर्यग्रहणावेळी ग्रहांच्या या स्थितीचा अद्भूत योग सुमारे ५०० वर्षांपूर्वी आला होता. त्यानंतर आता तो सन २०२० मध्ये आला आहे. एका मतानुसार, हे सूर्यग्रहण मेष, सिंह, कन्या, मकर राशींना शुभफल देणारे वृषभ, तुळ, धनु, कुंभ राशींना मिश्रफल देणारे; तर, मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन राशींना प्रतिकूल ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
यंदाचे सूर्यग्रहण सकाळी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपासून होणार असून, त्याचे वेध आदल्यादिवशी रात्री म्हणजेच २० जून २०२० रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांपासून लागतील, असे सांगितले जाते.
ज्येष्ठ अमावास्येला लागणारे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण २६ डिसेंबर २०१९ प्रमाणे मोठे सूर्यग्रहण असेल, असे सांगितले जाते.यापूर्वी २५ ऑक्टोबर १९९५ रोजी अशा प्रकारचे मोठे सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहणाचा मध्य सुरू झाला, तेव्हा एवढा अंधार झाला होता की, पशू-पक्षी सूर्यास्त झाल्याचा भास झाल्यामुळे आपापल्या घरट्यांमध्ये निघून गेले होते.दुसरे म्हणजे यावर्षीच्या सूर्यग्रहणाचे विशेष म्हणजे देशाच्या काही भागातून हे ग्रहण खग्रास आणि काही भागातून कंकणाकृती प्रकाराचे दिसेल. त्याचप्रमाणे या शतकातील हे सर्वांत मोठे दुसरे सूर्यग्रहण ठरणार आहे.
यावेळी ‘कंकणाकृती अवस्था’ पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड येथून सुमारे एक मिनिट दिसणार असून, उर्वरित भारतातून ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या कुरूक्षेत्रावरून दुपारी १२.०१ ते १२.०२ या वेळेत फक्त एक मिनिट कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. कुरुक्षेत्रावर ब्रह्म सरोवर आहे.
कुरूक्षेत्र येथे १०.२१ ते १.४८ या वेळेत, जोशीमठ येथे १०.२८ ते १.५४, डेहराडून येथे १०.२४ ते १.५१ या वेळेत सूर्यग्रहण दिसणार आहे. या सर्व ठिकाणांहून सुमारे एक मिनिट ‘कंकणाकृती अवस्था’ दिसणार आहे. मुंबई १०.०१ ते १.२८, पुणे १०.०३ ते १.३१, औरंगाबाद १०.०७ ते १.३७, नाशिक १०.१८ ते १.५१, नागपूर १०.१८ ते १.५१ आणि जळगांव येथे १०.०८ ते १.४० या वेळेत ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. सूर्यग्रहण थेट पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. ग्रहण चष्म्यातूनच पाहावे. दुर्बिणीलाही योग्य फिल्टर लावूनच सूर्यग्रहण पाहावे. त्यानंतर भारतातून दिसणारी कंकणाकृती सूर्यग्रहण २१ मे २०३१, १७ फेब्रुवारी २०६४, ८ डिसेंबर २११३ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातून कंकणाकृती अवस्था दिसणारे सूर्यग्रहण खूप कालावधीनंतर ३ नोव्हेंबर २४०४ रोजी होणार आहे.
कोरोना आणि वादळामुळे लोक आधीच ग्रासलेले असताना अशी अवैज्ञानिक भाकिते चिंतेत भर टाकत आहेत. त्यामुळे ग्रहणविषयक गैरसमजुतींचे ग्रहण सुटणे आवश्यक झाले आहे.
चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतो. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहेत. प्राचीनकाळी ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते, त्यावेळी जनसामान्यांना ग्रहणांची भीती वाटणे साहजिकच होते. त्यामुळे काही प्राचीन ग्रंथांमध्ये ग्रहणकाळात पाळावयाचे नियम सांगितले गेले; परंतु विज्ञानात प्रगती झाल्यामुळे ग्रहण हा चमत्कार नसून, तो एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार आहे हे सर्वांना समजून आले आहे