नवी दिल्ली -आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची नवी दिल्लीत भेट झाली. जवळपास 20 मिनिटे दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. आता पूर्वीप्रमाणे गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील गँँग्वॉर तर दिसत नाही ; पण राजकीय वॉर ने मात्र सामान्य माणसांच्या व्यथांकडे दुर्लक्ष करून धुमाकूळ माजविला आहे या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांत महाराष्ट्रातील मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीवर अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही. तथापि, शरद पवार स्वत: 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीच्या कारवाया – राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमागे अंमलबजावणी संचलनालयाच्या कारवाया मोहीम स्वरूपात राबविल्या जात असून यासाठी हे दोन्ही पक्ष यासाठी भाजपला जबाबदार धरत आहेत. केंद्रीय संस्थांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप अनेकदा शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.यावरून खुद्द शरद पवार यांनीही यावरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका केलेली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची पंतप्रधान मोदींशी भेट झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मुंबईत ठाकरे सरकारने एसआयटी नेमून केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आघाडी उघडताच मंगळवारी संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली.या राजकीय वॉर च्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत मंगळवारी रात्री आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आयोजित केलेल्या प्रीतिभोजनास विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष हजेरी लावली होती.
शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी झालेल्या मेजवानीप्रसंगी संजय राऊत तसेच महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, सर्वपक्षीय आमदारांची उपस्थिती होती. विधिमंडळ नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त पवारांनी ही मेजवानी दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पवार-मोदींमध्ये नेमके काय बोलणे झाले याविषयी पवार स्वत: चार वाजता पत्रकार परिषदेत खुलासा करणार आहेत.