पीएम मोदी आणि शरद पवार भेट त्यानंतर पवारांची ..प्रेस कॉन्फरन्स..
नवी दिल्ली-शरद पवार यांनी आपल्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भेटीमागचे कारण सांगितले. लक्षद्वीपचा प्रश्न आणि राज्यातील संजय राऊत यांच्यावरील कारवाई, तसेच विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा रखडलेला प्रश्न यावर चर्चा केल्याचे पवारांनी सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल हेही उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, पीएम मोदींशी आम्ही लक्षद्वीपच्या काही मुद्द्यांबाबत भेट घेऊन चर्चा केली. पवारांसह उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे खासदार फैजल म्हणाले की, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के. पटेल यांच्या नियुक्तीनंतर अनेक चुकीच्या निर्णयामुळे तेथे सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. ते म्हणाले की, लक्षद्वीपमधील नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी आम्ही पाठपुरावा करतोय. लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के. पटेल यांचे निर्णय चुकले. यामुळे तेथील 75 हजार लोकांवर बेरोजगारीचं संकट उभं राहिलं आहे. तेथील जमीन, दळणवळण, रोजगार या सर्वांवर परिणाम झाला आहे, असेही राष्ट्रवादीचे खासदार फैजल म्हणाले. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या मुद्द्यावरही चर्चा शरद पवार म्हणाले की, “माझी पंतप्रधान मोदींसाबेत मर्यादित विषयांवर चर्चा झाली. विधान परिषदेच्या प्रलंबित सदस्यांबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. राज्यपाल कोश्यारींकडे प्रलंबित असलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून बोललो. राज्यपालांनी अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही.” संजय राऊत यांच्यावरील कारवाईवरही मोदींशी चर्चा शरद पवार म्हणाले की, याशिवाय माझे राज्यसभेतील सहकारी संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही मुद्दा मांडला. या सर्वांवर पंतप्रधान मोदी निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे, असेही शरद पवार म्हणाले. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची गरज काय होती? त्यांची मालमत्ता जप्त करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. या दोन्ही मुद्द्यांवर मोदी योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचे शरद पवार म्हणाले. 5 वर्षे सत्ता पूर्ण करून पुन्हा सत्तेत येऊ महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. फक्त 5 वर्षेच नव्हे, तर पुढील 15 वर्षे हे सरकार टिकणार आहे असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. यासोबतच, महाराष्ट्र सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. या सरकारमध्ये मंत्रिमंडळ किंवा फेरबदलाचा सुद्धा काहीच विचार नाही असे यावेळी बोलताना शरद पवारांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मी राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यांची भूमिका आधी भाजपविरोधी होती, आता ते बदलले आहेत, असेही ते म्हणाले