मुंबई-
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण विकास मंत्र्यांसोबत विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) [VB-G-RAM-G] च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान, त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला.

सरकारने 1 जुलै 2026 पासून देशभरात व्हीबी-जी-राम-जी योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय लागू करण्याचा निर्धार केला आहे, असे बैठकीला संबोधित करताना चौहान यांनी सांगितले. ही योजना देशभरात यशस्वीपणे राबविण्यात आली आहे आणि मनरेगा (MGNREGA) मधून व्हीबी-जी-राम-जी मध्ये झालेले संक्रमण सुरळीत आणि अखंडितपणे झाले आहे, हे पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत कोणतीही तांत्रिक किंवा कार्यान्वयन समस्या नोंदवली गेलेली नाही, हे त्यांनी अधोरेखित केले.

