मुंबई, ५ डिसेंबर २०२२ – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ५ ट्रिलियन वैयक्तिक बँकिंग कर्जाचा विक्रमी टप्पा ओलांडला. बँकेने १ ट्रिलियनची वाढ केवळ १२ महिन्यांतच पार केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कामगिरी अतुलनीय मानली जात आहे. २०१५ मध्ये एसबीआयने पहिल्या ट्रिलियनचा टप्पा पार केला व त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये दुसरा, ऑगस्ट २०२० मध्ये कोविड- १९ चा उद्रेक झाला असताना तिसरा, तर नोव्हेंबर २०२१ मध्ये ४ ट्रिलियनचा टप्पा ओलांडला. या आलेखावरून बँकेच्या प्रगतीचा वेग सहजपणे लक्षात येईल.
ग्राहकांना अर्थपूर्ण सेवा देण्यात एसबीआय कायमच आघाडीवर राहिली आहे. वैयक्तिक बँक कर्जांत प्रामुख्याने वैयक्तिक कर्ज, पेन्शन कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, पी- गोल्ड कर्ज आणि इतर वैयक्तिक कर्ज उत्पादनांचा समावेश होतो.
५ ट्रिलियनचा विक्रमी टप्पा गाठल्याविषयी अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ‘एसबीआयने साध्य केलेली आणखी एक असामान्य कामगिरी जाहीर करताना मला आनंद होत आहे. बँकेने कायमच आपल्या कामातून मापदंड तयार केलेले आहेत. हा विकास साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ग्राहक आणि भागधारकांचे आम्ही ऋणी आहोत. गेल्या काही वर्षांत हाती घेण्यात आलेले धोरणात्मक आणि डिजिटल उपक्रमांनी वैयक्तिक बँकिंग कर्ज विभागाने (गृह विभाग वगळून) ५ ट्रिलियनचा टप्पा पार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. ग्राहकांसाठी बँकिंग आनंददायी बनवण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’