पुणे –कोथरूड’चे आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी घेतली भेट घेतली , यासंदर्भात ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धि मेसेज मध्ये असे म्हटले आहे की,मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाचे संरक्षण झालेच पाहिजे… यासाठी महाराष्ट्रात विविध पक्षांचे आंदोलन सुरु असून समाजाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. कारण हे लोक सभागृहात खरं बोलत नाहीत. सत्ताधारी आरक्षण देणारे हेच आणि रद्द करणारे सुद्धा हेच आहेत. कायदे विधिमंडळ करते. मंत्री निर्णय घेतात. मग विधानसभेचे पाच दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा कायदा करावा. ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव राज्यात सुरु आहे तो हाणून पाडला पाहिजे. म्हणून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत. केंद्र सरकारने सुद्धा संसदेच्या अधिवेशनामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच महाराष्ट्रात 2021-22 च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची सरसकट जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे… या मागणीसाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत, मागणी करावी. म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांची संभाजी ब्रिगेडच्या वतीने भेट घेण्यात आली महाराष्ट्रातील २८८ लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून… ‘पावसाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत आवाज उठवावा…’ संभाजी ब्रिगेडची विनंती वजा मागणी करण्यात आली.
1) मराठा आरक्षण
2) ओबीसी आरक्षणाचे रद्द करण्यापासून संरक्षण करणे.
3) OBC सह सर्व जाती निहाय जनगणना करणे.
महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड अॕक्शन मोडवर आहे. वरील मागण्यांचा तात्काळ विचार करून राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते व सर्व आमदारांनी जनतेच्या प्रश्नाचा आदर करून फक्त याच विषयावर अधिवेशनामध्ये चर्चा करावी. पक्षनेत्यांनी समोर नुसत्या मुंडे हलवू नयेत. आरक्षण रद्द झाले किंवा आरक्षण मिळालेच नाही तर पुढच्या पिढ्या बरबाद होतील… याचा धोका आत्ताच ओळखावा आणि अधिवेशनात सविस्तर चर्चा करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड ‘मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण आणि ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे…’ या विषयासाठी महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे. अशा सुचना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. कुठल्याही आमदार आणि मंत्र्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही. आमदारांनी अधिवेशनामध्ये वरील विषयांसाठी गंभीर भूमिका घ्यावी अशा प्रकारचं शपथपत्राबाबत आज पुण्याचे स्थानिक आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात सर्व आमदारांनी आवाज उठवला नाहीतर ‘संभाजी ब्रिगेड’ राज्यात अजून तिव्र आंदोलन करणार आहे… याबाबत चर्चा झाली. दादांसोबत ही आमची प्रत्यक्ष पहिलीच भेट होती. संभाजी ब्रिगेड च्या कामाची पध्दत… दादा, ओळखून आहेत. आम्ही लढा तिव्र करणार आहोत.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जि. उपाध्यक्ष महादेव मातेरे, संदीप कारेकर, सनी देशमुख आदी उपस्थित होते.