‘‘रेती’’ करेल काळ्या साम्राज्याचा पोलखोल …..८ एप्रिलपासून
आजपर्यंतच्या सर्वोत्तम भुमिकांपैकी एक ठरणार असलेल्या रेतीसम्राटाच्या भुमिकेतील किशोर कदम, लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर, विद्याधर जोशी, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, संजय खापरे आदींच्या जबरजस्त अभिनयाने पॉवरपॅक झालेला, वाळुउपशाच्या काळ्या साम‘ाज्याला बेधडक भिडणारा, जगातील या विषयातील पहिला चित्रपट ‘‘रेती’’ येत्या ८ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत नवे वादळ आणण्यासाठी सज्ज झाला आहे.. या चित्रपटाचे संगीत अलीकडेच एका शानदार सोहळ्याव्दारे प्रकाशित झाले असून प्रसिध्द गायक शानने या चित्रपटाव्दारे मराठीत संगीत दिग्दर्शक म्हणून पहिले पाऊल टाकले आहे.. या चित्रपटाची खास बात म्हणजे कुठल्याही बॉलिवूडपटाला मागे टाकेल, अशा नाविन्यपूर्ण पध्दतीने या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून चित्रपट प्रारंभापासूनच पकड घेणारा झाला आहे.
देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रभर अनिर्बंधपणे सुरु असलेला वाळुउपसा, ठिकठिकाणच्या नद्यांची केली जात असलेली वाळवंटे आणि या काळ्या साम‘ाज्यातून मिळणार्या अगणित काळ्या पैशासाठी बेलगामपणे वावरत असलेली वाळूमाफिया, भ‘ष्ट सरकारी अधिकारी, पोलीस आणि राजकारण्यांची साखळी यावर प्रखर प्रकाशझोत टाकण्यात आलेल्या रेतीने प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचे औत्सुक्य कमालीचे वाढवले आहे. रेती चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद देवेन कापडनीस यांचे असून दिग्दर्शक सुहास भोसले यांनी रेतीचे काळे साम‘ाज्य अत्यंत वास्तववादी पध्दतीने प्रत्ययकारी केले आहे. रेती या चित्रपटाआधी सुहास भोसले यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कोती’ या चित्रपटाला कोल्हापूर इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये कोती हा भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठविण्यात आला होता. तर देवेन कापडनीस यांचे ‘बरड’ आणि ‘होय साहेब’ हे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. या दोन प्रतिभावंतांच्या जोडीने रेती धंद्याच्या सर्व बाजू दमदार कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे आणल्या आहेत.
वाळुउपशाच्या माध्यमातून पर्यावरणाची चाललेली अनिर्बंध लूट आणि असाहाय्य जनता हे वास्तव मांडण्यासाठी रेती चित्रपटाची निर्मिती केली, असे या चित्रपटाचे निर्माते प्रमोद गोरे यांनी सांगितले. रेती बघितलयानंतर तरुणाईत आणि संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल, जो कदाचित पर्यावरणाचा र्हास थांबवण्यासाठीच्या मोठ्या चळवळीत परावर्तित होईल, असा आशावादही निर्माते प्रमोद गोरे यांनी व्यक्त केला. या चित्रपटाचे सिनेछायाचित्रण प्रताप नायर यांनी केले असून संकलन केदार गोगटे यांनी केले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अरुण रहाणे आहेत.
नाशिकच्या मोसम नदीपात्राचे जिवंत चित्रण असलेला रेती एक नवा आशय घेऊन गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मराठी चित्रपटसृष्टीत धडकतो आहे…