Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रत्येकाच्या बोलण्यात गोडवा हवा – मुनिश्री पुलकसागर महाराज

Date:

पुणे-व्यक्तीचे व्यक्तीत्व हे त्याच्या वाणीच्या माध्यमातून कळते. वाणी अंतरंगाचे दर्पण असते. त्यामुळे बोलताना नेहमी विचारपूर्वक बोलावे. वाणीमध्ये वीणेची झनकार असली पाहिजे, मात्र आपल्या वाणीमध्ये बाण असतात. या शब्दांचे घाव इतके तीव्र असतात की ते कधीही भरू शकत नाहीत. त्यामुळेच मनात दुरावा, तिरस्कार निर्माण होतो. जी व्यक्ती ‘इट का जवाब पत्थर से’ अशी वृत्ती बाळगणारी व्यक्ती कधीही देवत्व मिळवू शकत नाही. याउलट ज्या व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा असेल, तीला सर्वत्र सन्मानपूर्वक वागणूक मिळते. त्यामुळे नर्म लहेजे से तो पत्थर भी पिघल जाते है’ ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवून त्यानुसार आचरण केले पाहिजे, अशा शब्दांत प. पु. 108 मुनिश्री पुलकसागर महाराज यांनी बोलण्यातील गोडवा ठेवण्याचा संदेश दिला.

तसेच इतरांच्या निर्णयावर अवलंबून न राहता, स्वत:ची रूची, क्षमता यांचा विचार करून स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावे आणि सुनियोजित पद्धतीने काम करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे दहावे पुष्प गुंफतांना ’मिठी जुबान का जादू’ या विषयावर ते बोलत होते. समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर. एम फाऊंडेशनच्या जानवी धारिवाल, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. उदिता शहा, उपाध्यक्ष चकोर गांधी, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, संजीव नाईक, सुदिन खोत, उत्कर्ष गांधी हे उपस्थित होते. डॉ. उदिता शहा यांच्या हस्ते मुनिश्रींना शास्त्र भेट देण्यात आली. याप्रसंगी जीएसटीचे असिस्टंट कमिशनर एस.के. पाटील यांनी मुनिश्रींचे पादप्रक्षालन करून मंगल कलशाची स्थापना केली. यानंतर जिन सेवा ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.

मुनिश्री म्हणाले, तुम्ही कितीही सौंदर्यवान असोत, कितीही श्रीमंत असोत या सर्वांपेक्षा जास्त महत्वपूर्ण असते, ते तुमचा व्यवहार. व्यवहार जर मधूर असेल तर सर्वांच्या मनात तुमच्याबाबत आदराचे स्थान निर्माण होते. वाणी ही मनाला तोडते आणि वाणीच मनाला जोडते. जगात प्रत्येक व्यक्तीला सर्वात जास्त कुठल्या गोष्टीचा हव्यास असेल तर ते प्रेमपूर्वक बोलण्याचा आहे. पारिवारिक संबंधामध्ये जर गोडवा असेल, तर कुटुंबात प्रेम, आदर आणि एकोपा वाढतो.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अपघात टाळण्यासाठी 6 हजार कोटींचा उन्नत मार्ग लवकरच कार्यान्वित होणार

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसराला भेट...

बिहारमध्ये NDA सरकार, मोदी म्हणाले- सुशासनाचा विजय

बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी...

वाचनाअभावी मुलांमध्ये मुक-कर्णबधिरता तर शिक्षकांमध्ये गतीमंदता : गिरीश प्रभुणे

बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन पुणे : पालकांनीच वाचन सोडल्यामुळे आणि दृकश्राव्य माध्यमांमुळे...

विश्वनाथाच्या रूपाने ‘मानवतेची ज्योत’ प्रज्वलीत-भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र सुनील शास्त्री यांचे विचार

विश्वधर्मी रामेश्वर (रूई) येथे ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवना’चे लोकार्पण पुणे, १४...