पुणे-स्वामी अग्निवेश यांना विरोध करून पुण्यात त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न कोणी केला तर लक्षात ठेवा गाठ संभाजी ब्रिगेड शी आहे असा इशारा आज येथे ब्रिगेड चे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी दिला आहे यासंदर्भात त्यांनी आणि संतोष शिंदे यांनी आज पुणे पोलिसांना निवेदन देवून कायदा सुव्यस्था राखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याची विनंती केली आहे .
धुमाळ यांनी या प्रकरणी म्हटले आहे कि ,शहरात पुरोगामी विचारांचे जेष्ठ हिंदू धर्मगुरू स्वामी अग्नीवेश रविवार दि. ९ सप्टेंबर रोजी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या साने गुरूजी स्मारक येथे… कार्यक्रमास येत आहेत. एक विद्रोही संत म्हणून देशाला त्यांची ओळख आहे. सर्व धर्मातील चुकीच्या अंधश्रध्दा, रूढी पंरपरा… चांगला बदल करण्याठी, व समाज सुधरण्यासाठी… अंधश्रध्दे विरोधात ते नेहमी भुमिका आपल्या कार्यातुन मांडत असतात. मात्र धर्मद्रोह्यांना हे नेहमी खुपते. ‘कर्मकांडातुन समाजाला बाहेर काढण्याचे प्रबोधनात्मक काम उल्लेखनीय आहे. म्हणून एकटे पाहून देशद्रोही मारहाण करतात.परंतु, धर्मांध व सनातनी जातियवादी शक्ती त्यांना नेहमी विरोध करतात… म्हणून पुण्यातील ब्राम्हणवादी लोकांनी आपले बंद पडलेले दुकान चालवण्यासाठी… ‘धर्माची सुपारी घेऊन स्वामी अग्नीवेश यांना पुण्यात कार्यक्रमासाठी विरोध करत आहेत.’ या देशात घटनात्मक लोकशाही आहे.
आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज व जगत् गुरू संत तुकाराम महाराज… व फुले – शाहू – आंबेडकर… यांच्या पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा विद्रोही महाराष्ट्र आहे. या क्रांतिकारी महापुरूषांच्या महाराष्ट्रात… स्वामी अग्नीवेश यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर… ‘गाठ’ संभाजी ब्रिगेड’शी असेल…’ संभाजी ब्रिगेड त्यांना संरक्षण संरक्षण देईल .आणि
पुणे पोलिसांना विनंती की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना संरक्षण द्यावे… अन्यथा सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.
याबाबतचा पूर्व इतिहासहि धुमाळ यांनी सांगितला आहे, ते म्हणाले ,
एक काळ होता याच पुण्यातील ब्राह्मण मंडळींनी आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांना प्रचंड विरोध केला होता, त्यांना जीवे मारण्यासाठी धमक्या ही दिल्या होत्या.
पण स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यातील सुधारक लोकांनी हत्ती वरून मिरवणूक काढायची ठरवली ज्याचे संरक्षण करण्यासाठी आमचा आजा महात्मा जोतीबा फुले रस्त्यावर उतरला होता.
ते पुढे म्हणाले ,ब्राह्मण महासंघाने हा इतिहास विसरू नये आणि कार्यक्रमात गोंधळ घालण्याचे धाडस ही करू नये .