भाजप सरकारने शेतकऱ्यांचे नव्हे, उद्योजकांचे कर्ज केले माफ
प्रियंका यापुढे म्हणाल्या, देशात लोकशाही जिवंत ठेवणारे आणि सामान्य जनतेसाठी काम करणारे सरकार हवे आहे. भाजपचे हेतूच वाइट आहे. बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या उद्योजकांचे भले होईल अशी त्यांची धोरणे आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही. परंतु, 5 वर्षांत त्यांनी उद्योजकांचे 5.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
15 लाख अजुनही मिळाले नाहीत…
प्रियंका यांनी सांगितल्याप्रमाणे, पीएम नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये आश्वासन दिले होते, की देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. ते 15 लाख अजुनही आलेले नाहीत. आमची सत्ता आल्यास गरीबांच्या खात्यांत न्याय योजना अंतर्गत दरवर्षी प्रत्येकी 72 हजार रुपये दिले जातील. लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचावा असे आवाहन प्रियंका यांनी केले आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आली तेव्हा सर्वात पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे झाले याची आठवण प्रियंका यांनी सभेत करून दिली.