मुंबई-गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारने केलेय समिती मध्ये आदेश बांदेकर आणि मिलिंद गुणाजी यांना स्थान देण्यात आले मात्र खा.डॉ अमोल कोल्हे यांना स्थान देण्यात आलेले नसल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. मात्र स्वतः कोल्हे या समिती साठी इच्छुक नसावेत असेही सांगितले जाते आहे, मात्र या विषयावर झालेल्या पूर्वीच्या एका व्हिडिओ कॉन्फ्रेंस बैठकीस ते उपस्थित होते असे समजते आहे.
राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यांच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा या ६ किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत त्यांच्या सह एकूण २४ सदस्य यांची नियुक्ती जाहीर झाली आहे . मुख्यमंत्री , सांस्कृतिक मंत्री, पर्यटन मंत्री ,महसूल मंत्री, वन मंत्री , छत्रपती संभाजी राजे यांचा या समितीत पर्मुखा सहभाग आहे. बाकी इतर अधिकारी असून अधिकारी नसलेल्या अशा ६ सदस्यांमध्ये आदेश बांदेकर , मिलिंद गुणाजी ,ऋषिकेश यादव, माधव फडके,उमेश झिरपे, नितीन बानगुडे पाटील यांचा समावेश आहे .