‘भारतीय विद्या भवन’मध्ये 24 ऑगस्ट रोजी ‘गीत रामायण ’कार्यक्रम
पुणे :‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५२ वा कार्यक्रम आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 24 ऑगस्ट 2018 रोजी ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
विक्रम पेंढारकर प्रस्तुत या कार्यक्रमात वर्धन पेंढारकर, अथर्व बुरसे हे किशोरवयीन गायक गीत रामायणातील निवडक गीते सादर करून गदिमा आणि बाबूजींना स्वरांची मानवंदना देणार आहेत. मैत्रेयी पेंढारकर आणि वैशाली जोशी हे त्यांना साथ करणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन वैशाली जोशी करणार आहेत. प्रसाद वैद्य (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्ये), चारूशीला गोसावी (व्हायोलिन) हे साथ संगत करतील, अशी माहिती यांनी विक्रम पेंढारकर यांनी दिली.
चार वर्षांपूर्वी या कार्यक्रमास सुरूवात केली असून, आतापर्यंत 10 कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत, असे विक्रम पेंढारकर यांनी सांगितले.