येत्या 72 तासात एरंडवणे परिसरातील पाणी प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन उभारणार-भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचा इशारा ; जादा पाणी वापराच्या नोटिसांनी नागरिकांत तीव्र संताप
पुणे-महापालिकेने पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करणार असे गोंडस आमिष दाखवून गेली ८ वर्षे पुणेकरांकडून दरवर्षी पाणीपट्टी वाढवून वसूल केली आहे. २४ तास तर सोडाच पण अजूनही कित्येक ठिकाणी २ ते ४./५ तास पाणी,काही ठिकाणी तेही दिवसाआड,काही ठिकाणी सकाळ संध्याकाळ ३ /३ तास अशा विषम स्वरूपात कुठे जादा प्रेशरने तर कुठे अत्यंत कमीप्रेशारणे पाणीपुरवठ्याचा कारभार सुरूच आहे. पुण्याच्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवून ही महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेत काडीमात्र फरक पडलेला नाही,ह .द राव नावाचे पाणीपुरवठा प्रमुख गेल्यानंतर या विभागाची अवस्था निव्वळ खाव खुजाव बनली आहे. आजपर्यंत सत्ताधारी असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना सांभाळून या विभागाच्या प्रमुखांनी एकंदरीत तोच कारभार आता प्रशासकीय कारभारात देखील सुरु ठेवला आहे. शहराच्या उपनगरात पाण्याची बोंब होते आहेच .आता नळस्टॉप, सहकार वसाहत, पं.नेहरू वसाहत,दहा चाळ, (गणेशनगर) व एरंडवणे परिसरातील नागरिक कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठा व अपुऱ्या पुरवठयामुळे त्रस्त झाले आहेत, आणि या साठीच वारंवार आश्वासने घेऊन वैतागलेल्या सत्ताधारी भाजपच्या प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांना उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खर्डेकर यांनी सांगितले कि,’ या भागातील पाण्याच्या समस्येबाबत स्थानिक अधिकारी, कर्मचारी – “एस एन डी टी टाकीची लेव्हल राखली जात नसल्याने व एल अँड टी ची 6 इंची लाईन जोडणी पूर्ण न झाल्याने पाणी कमी दाबाने व कमी वेळ येत असल्याचे” सांगितले. याबाबत 15 दिवसापूर्वी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती,त्यांनी त्वरित प्रश्न सोडविण्याचे मान्य केले होते,मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.त्यामुळे येत्या 72 तासात पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा वा अन्य मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आम्ही दिला आहे.
जादा पाणी वापराच्या नोटीसा म्हणजे पावसरांचा तुघलकी कारभार :
एकीकडे पाण्याचीच बोंब असताना,उन्हाळा नसताना,थंडीचे दिवस असताना,धरणात मुबलक पाणी साठ असताना “तुम्ही जादा पाणी वापर करत आहात व तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल अश्या स्वरूपाच्या नोटीसा पाठविल्या जात आहेत. याबाबत अनिरुद्ध पावसकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार नागरिकांना आवाहन देखील केले आहे, मात्र याबाबत नागरिकांना घाबरवणे सोडून प्रशासनाने लोकशिक्षणावर तसेच जादा वापराची कारणे शोधण्यावर भर द्यावा अशी आग्रही मागणी ही यनिमित्ताने केली असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.
अद्याप मीटर नुसार बिलिंग नाही,पण घाबरवून सोडण्याचे पालिकेचे अण्वस्त्र
खर्डेकर पुढे म्हणाले कि,’ जादा पाणी वापराबाबत नोटीसा आल्यावर नागरिकांना केलेले आवाहन आपल्या भागात जेथे L & T च्या 24×7 योजनेअंतर्गत लाईन टाकण्यात आली आहे व जेथे मीटर बसविण्यात आले आहेत, तेथे मनपा ने trial basis वर पाणी वापराचा अभ्यास केला असता काही ठिकाणी जादा पाणी वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून अश्या मिळकतींना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. अद्याप मीटर नुसार बिलिंग केले जात नाही हे आधी समजून घ्या. भावी काळात 24×7 अस्तित्वात आल्यावर विजेप्रमाणे पाण्याचा जेवढा वापर तेवढेच बिल हे अंमलात येईल. त्यासाठी trial उपयुक्त ठरेल. आता जादा पाणी वापर म्हणजे फक्त प्यायला किंवा आंघोळीला वापरले असे होत नाही जादा पाणी वापर हा….
💧 पाण्याची टाकी जुनी असल्यास टाकीला गळती लागते व ती वरकरणी दिसत नाही तर खाली पाणी झिरपत असते.
💧 अनेक ठिकाणी बॉल कॉक नसल्याने टाक्या वाहताना दिसतात जे जादा पाणी वापराचे मुख्य कारण असू शकते
💧 कमोड च्या फ्लश मधून जादा पाणी वापर, सोसायटीतील गाड्या धुवायला पिण्याच्या पाण्याचा वापर, बागेत सर्रास पिण्याच्या पाण्याचा वापर, अशी कारणे देखील असू शकतात
तरी याबाबत महापालिकेने आपल्या स्तरावर जादा पाणी वापराचे कारण शोधावे – मनपा अन्याय करत असल्यास माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि मी असे दोघेही महापालिकेच्या विरोधात तीव्र संघर्ष करू याचे भान संबधित अधिकाऱ्यांनी ठेवावे.