पावसकर अयशस्वी :पाण्याच्या नावाने बोंब अन मीटरच्या नोटीसा,सुलतानी कारभार थांबवा ,जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहाल तर खबरदार…

Date:

येत्या 72 तासात एरंडवणे परिसरातील पाणी प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन उभारणार-भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचा इशारा ; जादा पाणी वापराच्या नोटिसांनी नागरिकांत तीव्र संताप
पुणे-महापालिकेने पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करणार असे गोंडस आमिष दाखवून गेली ८ वर्षे पुणेकरांकडून दरवर्षी पाणीपट्टी वाढवून वसूल केली आहे. २४ तास तर सोडाच पण अजूनही कित्येक ठिकाणी २ ते ४./५ तास पाणी,काही ठिकाणी तेही दिवसाआड,काही ठिकाणी सकाळ संध्याकाळ ३ /३ तास अशा विषम स्वरूपात कुठे जादा प्रेशरने तर कुठे अत्यंत कमीप्रेशारणे पाणीपुरवठ्याचा कारभार सुरूच आहे. पुण्याच्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवून ही महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेत काडीमात्र फरक पडलेला नाही,ह .द राव नावाचे पाणीपुरवठा प्रमुख गेल्यानंतर या विभागाची अवस्था निव्वळ खाव खुजाव बनली आहे. आजपर्यंत सत्ताधारी असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना सांभाळून या विभागाच्या प्रमुखांनी एकंदरीत तोच कारभार आता प्रशासकीय कारभारात देखील सुरु ठेवला आहे. शहराच्या उपनगरात पाण्याची बोंब होते आहेच .आता नळस्टॉप, सहकार वसाहत, पं.नेहरू वसाहत,दहा चाळ, (गणेशनगर) व एरंडवणे परिसरातील नागरिक कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठा व अपुऱ्या पुरवठयामुळे त्रस्त झाले आहेत, आणि या साठीच वारंवार आश्वासने घेऊन वैतागलेल्या सत्ताधारी भाजपच्या प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांना उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खर्डेकर यांनी सांगितले कि,’ या भागातील पाण्याच्या समस्येबाबत स्थानिक अधिकारी, कर्मचारी – “एस एन डी टी टाकीची लेव्हल राखली जात नसल्याने व एल अँड टी ची 6 इंची लाईन जोडणी पूर्ण न झाल्याने पाणी कमी दाबाने व कमी वेळ येत असल्याचे” सांगितले. याबाबत 15 दिवसापूर्वी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती,त्यांनी त्वरित प्रश्न सोडविण्याचे मान्य केले होते,मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.त्यामुळे येत्या 72 तासात पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा वा अन्य मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आम्ही दिला आहे.

जादा पाणी वापराच्या नोटीसा म्हणजे पावसरांचा तुघलकी कारभार :
एकीकडे पाण्याचीच बोंब असताना,उन्हाळा नसताना,थंडीचे दिवस असताना,धरणात मुबलक पाणी साठ असताना “तुम्ही जादा पाणी वापर करत आहात व तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल अश्या स्वरूपाच्या नोटीसा पाठविल्या जात आहेत. याबाबत अनिरुद्ध पावसकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार नागरिकांना आवाहन देखील केले आहे, मात्र याबाबत नागरिकांना घाबरवणे सोडून प्रशासनाने लोकशिक्षणावर तसेच जादा वापराची कारणे शोधण्यावर भर द्यावा अशी आग्रही मागणी ही यनिमित्ताने केली असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.

अद्याप मीटर नुसार बिलिंग नाही,पण घाबरवून सोडण्याचे पालिकेचे अण्वस्त्र

खर्डेकर पुढे म्हणाले कि,’ जादा पाणी वापराबाबत नोटीसा आल्यावर नागरिकांना केलेले आवाहन आपल्या भागात जेथे L & T च्या 24×7 योजनेअंतर्गत लाईन टाकण्यात आली आहे व जेथे मीटर बसविण्यात आले आहेत, तेथे मनपा ने trial basis वर पाणी वापराचा अभ्यास केला असता काही ठिकाणी जादा पाणी वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून अश्या मिळकतींना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. अद्याप मीटर नुसार बिलिंग केले जात नाही हे आधी समजून घ्या. भावी काळात 24×7 अस्तित्वात आल्यावर विजेप्रमाणे पाण्याचा जेवढा वापर तेवढेच बिल हे अंमलात येईल. त्यासाठी trial उपयुक्त ठरेल. आता जादा पाणी वापर म्हणजे फक्त प्यायला किंवा आंघोळीला वापरले असे होत नाही जादा पाणी वापर हा….
💧 पाण्याची टाकी जुनी असल्यास टाकीला गळती लागते व ती वरकरणी दिसत नाही तर खाली पाणी झिरपत असते.
💧 अनेक ठिकाणी बॉल कॉक नसल्याने टाक्या वाहताना दिसतात जे जादा पाणी वापराचे मुख्य कारण असू शकते
💧 कमोड च्या फ्लश मधून जादा पाणी वापर, सोसायटीतील गाड्या धुवायला पिण्याच्या पाण्याचा वापर, बागेत सर्रास पिण्याच्या पाण्याचा वापर, अशी कारणे देखील असू शकतात
तरी याबाबत महापालिकेने आपल्या स्तरावर जादा पाणी वापराचे कारण शोधावे – मनपा अन्याय करत असल्यास माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि मी असे दोघेही महापालिकेच्या विरोधात तीव्र संघर्ष करू याचे भान संबधित अधिकाऱ्यांनी ठेवावे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....