मुंबई- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पवार – मोदी भेट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाट्टोळंं असल्याचे संकेत दिले आहेत . त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. १५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”.असं दमानिया यांनी म्हटले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी कोणीही अंदाज लाऊ शकत नाही आणि विश्वास देखील ठेऊ शकत नाही अशी स्थिती दिसते आहे राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.जयंत पाटील यांनी या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं आहे तरीही या भेटी विषयी तर्क वितर्क लावले जात आहेतच