मुंबई-सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणावर शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. कारण गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून देशातल्या वेगवेगळ्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी केंद्र सरकारला पत्र पाठवली होती. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये विशेष लक्ष घालत रिझर्व्ह बँकेला तशा सुचना दिल्या जाव्यात. त्याचबरोबर देशातील सुरक्षेचा मुद्दा आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि पंतप्रधानांची भेट झाली असल्याचे स्पष्टीकरण देत या भेटीची पुर्व कल्पना असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. .