मुंबई-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते, त्यानंतर देखील गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून कांगावा केला ही त्यांनी हद्दच केली.अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली. शरद पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाहीच. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वापरलेला शब्द चुकीचाच होता. यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी कांगावा करत आपण सामान्य कुटुुंबातून आलो आहोत म्हणून हे सगळे सुरू ठेवले , असा राज्याच्या राजकारणात 5 वर्षे मंत्रिमंडळात मंत्री होतात पक्षाचे अध्यक्ष होतात आणि आताही मंत्री आहात आणि एखाद्या सामान्य कुटुुंबामधील व्यक्ती ही सत्तेच्या शिखरावर जाते ही काही केवळ तुमच्या बाबतीत घडलेले नाही, असे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात देता येतील, असा टोलाही त्यांनी हाणला. पण शाईफेक करणे ही भूमिका आपण कधी घेणार नाही. आपणही अशी भूमिका घेऊ नये, असे आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.