नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता केंद्राकडून आता हालचाली सुरु झाल्या आहेत. नुकतीच राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार, अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे.बोम्मई म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची परवा (१४ डिसेंबर) बैठक बोलावली आहे” काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान, तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन साळवी, प्रियंका चतुर्वेदी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.