पुणे- दुसरी लाट येणार हे ठाऊक, उपचार काय करायचे हेही माहिती ,पैशांचीही कमतरता नाही,विनामंजुरी कुठूनही थेट खरेदीचे अधिकार , जंबो तसेच केअर सेंटर ,विलागीकरण कक्ष सर्वांचे नियोजन पूर्वीच केलेले असे असतानाही इंजेक्शन मिळाले नाही , ऑक्सिजन मिळाला नाही ,बेड मिळाला नाही म्हणून जे जे रुग्ण दागाव्तील अशा सार्यांची जबाबदारी महापालिकेतील सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीच असेल याची जाणीव ठेवावी असा इशारा देत कारणे देऊ नका , आणि तहान लागल्यावर विहीर खांदली ,खांद्तोय अशी आश्वासने देऊन हि जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही असा स्पष्ट दावा महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे. दुसऱ्या लातेच्ला सामोरे जाण्यासाठी जे जे करायला हवे होते तेते वेळेत न करता आता ते केले जाते आहे , आता तर तिसऱ्या लाटेची तयारी सुरु पाहिजे होती पण केवळ राज्य सरकारकडे निर्देश करत त्यांच्या नावाने बोटे मोडून महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही असे त्या म्हणाल्या .
त्या पुढे म्हणाल्या ,’पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात रोज 7 हजाराच्या वर रुग्णांची संख्या आहे. वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्या च्या मानाने महानगरपालिकेतर्फे आवश्यक ती योजना झाल्याचे दिसत नाही.प्रशासन व सत्ताधारी या संबधी अनेक उपाययोजना व निर्णय व धोरण ठरवताना दिसत नाही. परंतु प्रशासन प्रयत्न करत आहेत परंतु फारसा यश मिळत नाही. उलट अधिकच परिस्थिती गंभीर होत चाललेली दिसत आहे. बाधित रुग्णांना रेमडीसिवेर इंजेक्शन्स उपलब्ध होत नाही.ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नाही.
व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. अनेक रुग्ण बेड्स न मिळाल्यामुळे घरीच राहात आहेत. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड्स उपलब्ध होत नाही,त्यामुळे नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात उदा जम्बो कोविड सेंटर सी.ओ ई.पी, दळवी हॉस्पिटल जम्बो कोविड सेंटर बाणेर व इतर मनपाचे उभारण्यात आलेले छोटे मोठे कोविड सेंटर येथे सुमारे ९००० हजार रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सदर रुग्णांना एकही रेमडीसिवेर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. ९००० रुग्णांमधील 1200 ते 1500 रुग्णांना रेमडीसिवेर इंजेक्शनची अत्यंत आवश्यकता असून त्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही.पुणे शहरात महापालिकेतील हाॅस्पिटल मध्ये गेले 3 दिवसात एकही रेमडीसिवेर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने रुग्णांचे H.R.T.C लेव्हल 12 च्या पुढे गेले आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच सत्ताधारी व प्रशासन रेमडीसिवेर इंजेक्शन मिळवण्या संबंधी कुठलीच हालचाल करताना दिसत नाही. सत्ताधारी भाजप नागरिकांवर अन्याय करत आहेत. नागरिकांच्या व रुग्णाच्या जिवाशी ही मंडळी खेळ करत आहे.हे राजकारण कुठे तरी थांबले पाहिजे. या आधी पुणे महानगरपालिकेने अनेक वस्तू पाहिजे त्या रक्कमानी ६७/३(क) खाली कुठल्याही परवानगी शिवाय खरेदी केले आहेत, तसेच रेमडीसिवेर इंजेक्शन सुद्धा मिळेल तिथे, मिळेल त्या कंपनीकडून ६७/३(क) खाली खरेदी करून तातडीने रुग्णांपर्यंत पोहचवण्यात यावा. यासंदर्भात महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता सदर इंजेक्शन कुठेच उपलब्ध नाहीत कंपनीकडून डायरेक्ट खरेदी करण्यास प्रशासन तयार आहे. एक ते दोन दिवसात इंजेक्शन उपलब्ध होतील अशी खात्री आयुक्तांनी दिली. जर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तर या इंजेक्शन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्यास सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी भाजप असेल.