पुणे- देणाऱ्यांचे हाथ हजार … म्हटल्यावर घेणारा आखडणार तरी कसा ? पण जनाची नाही तर मनाची तरी वाटावी सरकारांना .. अशी स्थिती आपल्या राज्यात आहे . सुपारी च्या खांडकापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत राज्याचा वेगळा , केंद्राचा वेगळा जीएसटी घेऊन लुटमार करणाऱ्या सरकारांना स्वतः च्या पैशातून करवून देणे शक्य होत नाही आणि अन्यत्र मात्र उधळपट्टी करता येते . या सारखे दुर्दैव भारतीयांच्या नशिबी येणे साहजिकच आहे.
याच विचारांच्या पार्श्वभूमीवर ….
कोकण भुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी स्थापन केलेल्या कोंकण महामार्ग समन्वय समितीचा अभ्यासदौरा १७,१८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.या समितीत यादवराव यांच्यासह अनेक तज्ञ,निवृत्त अधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहिले. महामार्गाच्या कामांमधील त्रुटींची पाहणी करुन सविस्तर अहवाल शासनाला देऊन दर्जेदार महामार्गासाठी जनजागृती करून व्यापक जनआंदोलन उभारण्याचा हा प्रयत्न आहे .चौपदरीकरण झालेला चांगला महामार्ग कोकण वासियांना मिळाला नाही तर टोल ही मिळणार नाही’,अशी भूमिका संजय यादवराव यांनी जाहीर केली.
संजय यादवराव,यशवंत पंडित,जगदीश ठोसर,एड संदीप चिकणे,सतीश लळीत,विकास शेट्ये,राजू भाटलेकर,युयुत्सु आर्ते,पंडित रावराणे,विलास आंब्रे,राजू आंब्रे यांच्यासह अनेक मान्यवर या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले. खेड ते हातखंबा या टप्प्याचा दौरा १७ डिसेंबरला,हातखंबा ते खारेपाटण या टप्प्याचा दौरा १८ डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता.
मुंबई कोंकण महामार्गाच्या चारपदरी रुंदीकरणाचे काम गेली दहा वर्षे रखडत सुरु आहे.कोंकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा या प्रकल्पाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.यामुळे उन्हाळी सुटीत किंवा गौरीगणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांना पुणे, कोल्हापूरमार्गे कोंकणात यावे लागते.याशिवाय सद्या जे अर्धवट काम झाले आहे, त्यामुळे वारंवार अपघात होऊन निरपराध नागरिक प्राणाला मुकत आहेत.
पर्यटन आणि इतर व्यवसायांना उतरती कळा लागण्यास हा रेंगाळलेला महामार्ग आहे.दहा वर्षे रेंगाळलेल्या कोकणातील महामार्गाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी अभियानास ७ डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आला. सध्या सुरु असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकण वासियांच्या समितीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा करण्यात आला .’ कोकणात दर्जेदार कोकण हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे,असे कोकण भूमी प्रतिष्ठांनचे अध्यक्ष आणि’समृद्ध कोकण महामार्ग अभियान’चे प्रणेते संजय यादवराव यांनी सांगितले.
राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून कोकणावर अन्याय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. कोकण वासियांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावी , एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण करावा ,वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी ,असेही आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे.
खेड शिवापूर तोल नाक्याचं झालं तरी काय ?
टोलमुक्त महाराष्ट्र च्या भूमिकेचा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना विसर पडतो . मनसे ला नावे ठेवणारी राजकीय पक्ष यात आघाडीवरच असल्याचे दिसून आले आहे. रमेश वांजळे यांनी आंदोलन करून कित्येक वर्षे उलटली .. पण या आंदोलनाला यश आले का हो ? असा प्रश्न विचारला तर … ? त्यानंतरही आंदोलने झाली . खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे भेट दिली , केंदीय मंत्र्यांना फोन लावला ..वगैरे वगैरे .. पण पुढे काय .. काय झालं तरी काय खेद शिवापूर तोल नाक्याचं …
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे चा टोल बंद करण्याची भूमिका आहे कि नाही ?
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे चा टोल सुरु होऊन आता २० वर्षे होत आलीत . माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या टोल बाबत वेळोवेळी आक्षेप नोंदविले . पण या साऱ्यांचं पुढ होतं तरी काय ? हे कधीच कुणाला समजत नाही . डीएसके यांचा अपघात याच रस्त्यावर झाला होता तेव्हा त्यांनी या रस्त्याचे डिझाईन चुकीचे असल्याचा जाहीर आक्षेप घेतला होता . पण त्यावरही पुढे काही झाले नाही .बरे या रस्त्यावर सुरळीत वाहतूक सेवा देण्यासाठीच टोल आहे पण अनेकदा येथे हि वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला सर्वांनींच अनुभवला आहे. तेव्हा त्यांचा टोल तरी किमान परत केला जातो का हो ?
जबाबदाऱ्यांची पूर्तता न करता केलेली टोल वसुली म्हणजे लुटमार , वाटमारी असा निनाय कुठल्या न्यायालयाने आजवर का दिला नाही हेही कोडेच आहे. कुठल्याही टोलनाक्यावर कधीपासून टोल सुरु झाला आता जमा होणारी रक्कम कशी ..कशी वाढते आहे हे संगणकीय पद्धतीने पारदर्शक पणे दाखविणारी यंत्रणा नाहीच . सोयी सुविधाच देत नाही तर १०० /१०० रुपयांनी वाढणारा सेकंदा सेकंदाची टोल रक्कम हे तरी कशी दाखविणार म्हना… काहीही असो , पैसे योग्य घ्या .. आणि जबाबदारी हि योग्य हाताळा… किमान यावर अंकुश ठेवायला राज्यातील कुठलीही व्यवस्था विश्वासार्ह उरलेली नाही हे मात्र निश्चित .