पुणे- गेली ४ वर्षे पुण्यात सातत्याने पुरेसा पाउस होतो आहे, धरणे ओसंडून भरत आहेत ,पाण्याच्या वितरणासाठी जे काही व्यवस्थापन करून द्यायचे ते माजी आमदार टिळेकर यांनी त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत आणि ‘त्या’ नगरसेविकांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत उपलब्ध करून दिलेले असताना ,जिथे पाणी सलग आठवडाभर दररोज ४ तास मिळत होते तिथे गेल्या काही दीड वर्षापासून आठवड्यातून एकदा पाणीपुरवठाच बंद ठेवला जातो आहे. काही भागात तर अप्वेली कधीही मनमानेल पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो आहे . मुबलक पाणी असतांना अशा पद्धतीने अधिकारी जर मनमानी करून लोकप्रतिनिधींची गळचेपी करत असतील तर कोणाला कसा जाब विचारायचा ? पाण्याच्या प्रश्नावरून माजी आमदार टिळेकर आणि भाजपच्या ‘त्या’ नगरसेविकांनी आंदोलन केले आहे. त्यांच्या आम्ही सदैव पाठीशी राहू असे सांगत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी महापालिका आणि पोलिसी कारवाईचा निषेध केला आहे.