- सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये देवळे उघडावीत व देव मुक्त करावेत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल – मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांचा इशारा
पुणे – महाराष्ट्र शासनाचा धिकार करत … आज मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेत .. पुण्यात सर्वात प्रथम ,पुण्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले कसबा गणपती चे मंदिर भाविकांसाठी खुले केले .सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये देवळे उघडावीत व देव मुक्त करावेत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल हा इशारा यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला.या आंदोलनात मनसे नेते बाबू वागसकर,विजयराव तडवलकर, प्रल्हाद गवळी , राम बोरकर ,हेमंत बत्ते, सुनील कदम , राहुल गवळी , नरेंद्र तांबोळी , प्रशांत मते ,गणेश नायकवडी ,सचिन काटकर ,राजेंद्र वेडेपाटील , किशोर चिंतामणी , गणेश भोकरे , राकेश क्षीरसागर , गोकुळ अडागळे अविनाश जाधव , अभिजित येनपुरे ,उदय गडकरी , अतुल जाधव ,अनुप जाधव , प्रवीण सिरसागर, शन्कर पवार , आकाश धोत्रे आदी मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी शिंदे म्हणाले ,’ स्वतःला हिंदुत्त्ववादी समजणारी आणि हिंदुत्त्ववाच्या नावावर मते मागणारी आणि आत्ता सत्ताधारी असलेली शिवसेना सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचे दिसत आहे.सरकारने महसुला साठी मद्यालये उघडली मात्र कोरोनचे नाव करून देवालये उघडायला घाबरते आहे; कोरोना काय फक्त देवळातच आहे का ? महाराष्ट्रातील देवालये न उघडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या वर नक्की कोणाचा दबाव आहे ? हे आता कोणी सांगण्याची गरज नाही.तथाकथित हिंदू विरोधी विचाराची दोन्ही कॉंग्रेसरुपी सहकारी आणि सत्तेसाठी मम म्हणणारी सेना हे आज च चित्र आहे .
महाराष्ट्रात सर्व व्यवसाय सुरु झाले आहेत. मद्यालये, हॉटेल , दुकाने इतकेच नाही तर जे खाऊन थुकल्या नंतर करोना होऊ शकतो पसरू शकतो तो गुटखा हि सगळी कडे मिळू लागला आहे . मात्र करोना होईल किंवा पसरेल म्हणून मंदिरे बंद ठेवण्यास सरकार भाग पडत आहे. गेल्या महिन्यातच महाराष्ट्रातील देवस्थानाची प्रमुख मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना भेटली होती. त्या नंतर राजठाकरेंनी सरकारला मंदिरे सुरु करावीत हि मागणी देखील केली होती . परंतु अंतर्गत दबावा पोटी सरकार मंदिरे उघडू देत नाही . म्हणूनच आज मनसेने पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीचे देऊळ आज उघडले व देवळात जाऊन प्रतीकात्मक होम करीत देवाला व नागरिकांना करोना मधून लवकरात लवकर मुक्त कर व करोना मुळे आलेली बेकारी व महागाई यातून जनतेची सुटका कर हे साकडे घातले. सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये देवळे उघडावीत व देव मुक्त करावेत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल हा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला.