शेतकऱ्यांची नवीन मागणी – MSP वर सरकारने वेगळे बिल आणावे; तिन्ही कायदे परत घेतल्यानंतरच आंदोलन संपेल

Date:

नवी दिल्ली -नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे. 6 राऊडच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांना पटवून देण्याचा सरकारचा लेखी प्रयत्नही बुधवारी अपयशी ठरला. शेतकरी आता आंदोलन तीव्र करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की केवळ सरकारचा निषेध संपवण्यातच रस आहे. मात्र तिन्ही कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही. टिकैत यांनी किमान समर्थन मूल्य (MSP) वर स्वतंत्र विधेयक मागितले आहे.

‘सरकारला आंदोलन कमकुवत करायचे आहे’
देशभरातील शेतकरी महामार्गाला जाम करण्याची तयारी करीत आहेत. भारतीय शेतकरी संघटनेचे नेते मनजितसिंग म्हणाले आहेत की सरकारला आमचे आंदोलन कमकुवत करायचे आहे. पण, त्यात सहभागी होण्यासाठी बरेच शेतकरी दिल्ली येथे पोहोचत आहेत. आम्ही दिल्लीकरांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहोत.

आज आंदोलन संपण्याचे आवाहन सरकार करणार आहे
न्यूज एजेंसीने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे आंदोलन संपवून एकत्रित तोडगा काढण्यासाठी आज शेतकऱ्यांना आवाहन करतील. कृषीमंत्री पत्रकार परिषद घेतील.

केंद्रीय मंत्री म्हणाले- शेतकरी आंदोलनात चीन-पाकिस्तानचा हात
सरकार कायदा मागे न घेण्यावर ठाम असेल तर शेतकरीही ठाम आहेत. यावर मोठी मोठी वक्तव्य समोर येत आहे. केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे. दानवे म्हणाले की, CAA आणि NRC विषयी सर्वप्रथम मुस्लिमांना भडकवले. हे प्रयत्न अयशस्वी झाले तर आता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री यांनी बुधवारी हे वक्तव्य केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...