Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पाण्याच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे – डॉ. सुहास वाणी

Date:

“शाश्वत भूजल” या विषयावरील वनराई वार्षिक विशेषांक प्रकाशन समारंभ

पुणे– पाणी मर्यादित संसाधन असल्यामुळे ते कमी जास्त होत नाही. जलचक्र कायमस्वरूपी एकच आहे. पाण्याची गरज कशी पूर्ण होईल याकडेच प्रत्येकाचे लक्ष आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये पाण्याची दरडोई उपलब्धता जास्त आहे. भारतात देशाच्या एकूण क्षेत्रफळावर सरासरी ११७० मि.मी. एवढा पाऊस पडतो. पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन काटेकोरपणे होत नसल्याने आपल्याकडे सातत्याने दुष्काळजन्य आणि तीव्र टंचाईची परिस्थिती उद्भवत असते. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ संशोधक आणि द इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी- एरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट)चे माजी संचालक डॉ. सुहास वाणी यांनी व्यक्त केले.

“शाश्वत भूजल” या विषयावरील वनराई वार्षिक विशेषांक प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन झाले तर जेष्ठ संशोधक आणि द इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी- एरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट)चे माजी संचालक डॉ. सुहास वाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. जलसंवाद मासिकाचे संपादक डॉ. दत्ता देशकर, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश खाडे यांनी केले तर आभार मंगेश काळे यांनी मानले.

डॉ. वाणी म्हणाले, पाणी उपाययोजना संदर्भात आपण वृक्ष झालो आहोत. मांसाहाराच्या तुलनेत फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवण्यासाठी कमी पाणी लागते. सगळ्यांनी शाकाहारी झाल्यास पाण्याची गरज भासणार नाही. ज्या पाण्यावर कोणाची तरी तहान भागवली जाऊ शकते असे हजारो लीटर पाणी शॉवर, बाथटब, टॉयलेट फ्लश, वॉश बेसिन इत्यादीद्वारे दररोज घराघरांतून वाया घालवले जाते. म्हणूनच केवळ धरणे बांधून आणि ग्रामीण भागात जलसंधारण करून ‘जलसुरक्षा’ साधता येणार नाही, तर शहरांमध्येसुद्धा पाण्याच्या वापरबाबत जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

चिंतामणी जोशी म्हणाले, भूजल ही नैसर्गिक आणि राष्ट्रीय संपत्ती असून, भूजलावर प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे. जागतिक भूगर्भातील पाणीसाठ्यापैकी २४ टक्के पाण्याचा उपसा आपण पाण्याची गरज भागवण्यासाठी करत आहोत. भूजल उपशाच्या बरोबरीने जलसंधारणासाठी किंबहुना भूजल पुनर्भरणासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. मृदा-जलसंधारणाच्या कामांतून गावांत जलसाठे निर्माण झाले आणि भूजल पातळीत वाढ झाली म्हणजे गावकऱ्यांची सामुदायिक जबाबदारी संपली, असे मानून चालत नाही. तर उपलब्ध पाण्याचा मुख्यत्वे भूजलाचा काटकसरीने आणि समन्यायी वापर होण्यासाठीही व्यक्तिगत आणि सामुदायिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

रवींद्र धारिया म्हणाले की, पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण करणे आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या अखेरीस ओढ्या नाल्यातून वाहून जाणारे पाणी श्रमदानातून ठिकठिकाणी अडवण्या-मुरवण्यासाठी “वनराई बंधारा” हे बांधण्यात आले. यातूनच गावागावांमध्ये मृदा, जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहिली आणि शेकडो गावे जलसमृद्ध झाली. जलसंधारणाबरोबरच जलसाक्षरतेसाठी ‘वनराई’ संस्था गेली ३६ वर्षे धोरणात्मक पातळीवर आणि तळागाळामध्ये आपले योगदान देत आहे. शिवाय लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठीही विशेष प्रयत्न करत आहे. या विशेषांकाची निर्मिती देखील त्याचाच एक भाग आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहन

पुणे, दि. २८: जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची...

पहलगाम हल्ल्यावर CM ओमर म्हणाले- सुरक्षा माझी जबाबदारी होती,माझ्याकडे शब्द नाहीत, मी माफी कशी मागू?

श्रीनगर-सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली...