पुणे- २०२२ मध्ये महापालिका निवडणुका होतील आणि आता महापालिकेतील महापौरांसह उपमहापौर आणि सभागृहनेते अशा पदांच्या नेमणुकांना वर्षपूर्ती देखील होऊन गेली आहे. हे पदाधिकारी आता बदला अशी मागणी होत असताना भाजपचे सर्वेसर्वो असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या अखेरच्या वर्षात महापालिकेतील पदाधिकारी बदलताना मोठी विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. असे असताना गेल्या निवडणुकीत ज्यांनी भाजपाचे सुमारे ५० नगरसेवक निवडून आणले असा दावा केला जातोय ते राज्यसभेचे माजी सदस्य संजय काकडे यांचा सहभाग मात्र कमी झाल्याने हि भाजपासाठी धोक्याची घंटा ठरली तर नवल वाटणार नाही .जेवढी निष्ठा आणि भक्ती खा.गिरीश बापटांची पक्षावर आहे तेवढीच गरज निवडणुका जिंकण्यासाठी व्यूहरचना करण्याकरिता काकडे यांची लागणार आहे हे आजही कोणी नाकारू शकणारे नाही . या पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा बदल ,नव्याच्या नेमणुका येऊन घातल्याने हि दूर दूर दिसू लागलेल्या काकडे यांना जवळ आणण्याची भाजपला आयतीच संधी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नव्या नेमणुका करताना आगामी महापालिका निवडणुकीची व्यूहरचना डोळ्यापुढे ठेउनच, फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना काकडे आणि बापट या दोहोंना विश्वासात घेऊनच या नेमणुका कराव्या लागतील असा व्होरा आहे. प्रत्यक्षात फडणवीस आणि पाटील याबाबत कोणते धोरण घेणार हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बापट यांची कसबा मतदार संघावर जशी पकड आहे तसेच वर्चस्व आता भाजपचे कोथरुड असल्याचे मानले जाते .पण केवळ कसबा आणि कोथरूड म्हणजे पुणे महापलिका होणार नाही तर शहरातील अन्य परिसरासह चहुबाजूला पसरलेली उपनगरे हि विंचारात घ्यावी लागणार आहेत . बहुधा जिथे तिथे राष्ट्रवादीने आपले मजबूत स्थान निर्माण करून ठेवले आहे.दक्षिण पुण्यात खडकवासला तसेच शिवाजीनगर,पर्वती,वडगाव शेरी सह कोथरूड कसबा आणि पूर्व पुण्यात हडपसर मतदार संघ असतील अशा बहुतेक ठिकाणी काकडे यांनी निर्माण करून ठेवलेले भाजपचे वर्चस्व आता हळू हळू कमी होत चालले आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व इथे वाढू लागले आहे, जेव्हा कलमाडी आणि शरद पवार एकत्र आले होते त्या काळात देखील या दोहोंना ७८ च्या पुढे संख्या गाठता आली नव्हती. गेल्या ४० वर्षात भाजपचे २५ च्या वर नगरसेवकांची संख्या पोहोचू शकली नव्हती . पण गृहखात्याच्या माहितीवरून काकडे यांनी केलेल्या नियोजानानुसारच काकडे यांनी २०१७ च्या निवडणुकीत ९२ चा जादुई आकड्याचा दावा केला होता .सध्या काकडे पक्षात सक्रीय होण्यापासून काकडे दूर होत गेले तर केवळ बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्व मदार राहणार आहे.त्यानुसार विचार केला तर हेमंत रासने आणि दीपक पोटे यांच्या प्रभागात भाजपचे पूर्ण प्राबल्य आहे. सिंहगड रस्त्यावरील नागपुरे यांच्या मुळे त्यांच्या प्रभागात भाजपचा प्रभावी प्रभाव आहे. अन्य ठिकाणी जिथे पूर्णतः भाजपचा प्रभाव होता तिथे तो आता निम्म्यावर घसरला आहे. अशा परिस्थितीत १०० नगरसेवकांचा आकडा कायम ठेवणे भाजपसाठी मुश्कील बनणार असल्याचे स्पष्ट आहे. अशात काकडे यांची साथ सुटली तर केवळ बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष किती जागा जिंकेल यावर आता पासूनच मंथन होताना दिसते आहे.आणि या मंथनातून 50 च्या आतच संख्या वर्तविली जाते आहे. पण फडणवीस आणि पाटील पक्षाच्या हितासाठी पुन्हा २०२२ च्या निवडणुकीसाठी बापट -काकडे यांच्या नेतृत्वाची जोडी देखील वापरून घेतील अशी शक्यता नाकारता येत नाही.पण त्याची मुहूर्तमेढ आता पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकातूनच होणार आहे असे बोलले जाते आहे.